शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

१४ लाख शेतकऱ्यांचे ५०० कोटी कधी देणार? सरकारचे आदेश डावलले : अग्रिमपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 06:10 IST

कंपन्यांकडून १८ डिसेंबरपर्यंत ३७ लाख ७ हजार ४८४ शेतकऱ्यांना १ हजार ७०७ कोटींचे अग्रिम वितरित केले आहे. अद्याप ४९८ कोटी ९९ लाखांचे अग्रिम वितरित झालेले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेतून राज्यात २४ जिल्ह्यांमधील ५० लाख शेतकऱ्यांना २२०६ कोटी रुपयांची अग्रिम नुकसानभरपाई जाहीर झाली. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे आदेश विमा कंपन्यांना दिले होते. मात्र, दिवाळीनंतर महिना लोटला तरी अद्याप १३ लाख ८६ हजार ९८३ शेतकरी ५०० कोटींच्या अग्रिमपासून वंचित आहेत. यावरून विमा कंपन्यांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट होत आहे. योजनेतील तरतुदीनुसार पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास नुकसानभरपाई मिळते. 

कंपन्यांकडून १८ डिसेंबरपर्यंत ३७ लाख ७ हजार ४८४ शेतकऱ्यांना १ हजार ७०७ कोटींचे अग्रिम वितरित केले आहे. अद्याप ४९८ कोटी ९९ लाखांचे अग्रिम वितरित झालेले नाही. 

एक हजारपेक्षा कमी अग्रिम राज्यात ९५ हजार ६२७ शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी अग्रिम रक्कम मिळाली आहे. ही रक्कम ६ कोटी ५२ लाख ५३ हजार आहे. 

आधार संलग्न नसल्याने अडकले ६८ कोटीदरम्यान, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसल्याने १ लाख ६१ हजार ३० शेतकऱ्यांना ६८ कोटी ७१ लाख ६३ हजार अग्रिम वाटण्यात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आधार क्रमांक बँक खात्याला जोडावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी