शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

१४ लाख शेतकऱ्यांचे ५०० कोटी कधी देणार? सरकारचे आदेश डावलले : अग्रिमपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 06:10 IST

कंपन्यांकडून १८ डिसेंबरपर्यंत ३७ लाख ७ हजार ४८४ शेतकऱ्यांना १ हजार ७०७ कोटींचे अग्रिम वितरित केले आहे. अद्याप ४९८ कोटी ९९ लाखांचे अग्रिम वितरित झालेले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेतून राज्यात २४ जिल्ह्यांमधील ५० लाख शेतकऱ्यांना २२०६ कोटी रुपयांची अग्रिम नुकसानभरपाई जाहीर झाली. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे आदेश विमा कंपन्यांना दिले होते. मात्र, दिवाळीनंतर महिना लोटला तरी अद्याप १३ लाख ८६ हजार ९८३ शेतकरी ५०० कोटींच्या अग्रिमपासून वंचित आहेत. यावरून विमा कंपन्यांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट होत आहे. योजनेतील तरतुदीनुसार पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास नुकसानभरपाई मिळते. 

कंपन्यांकडून १८ डिसेंबरपर्यंत ३७ लाख ७ हजार ४८४ शेतकऱ्यांना १ हजार ७०७ कोटींचे अग्रिम वितरित केले आहे. अद्याप ४९८ कोटी ९९ लाखांचे अग्रिम वितरित झालेले नाही. 

एक हजारपेक्षा कमी अग्रिम राज्यात ९५ हजार ६२७ शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी अग्रिम रक्कम मिळाली आहे. ही रक्कम ६ कोटी ५२ लाख ५३ हजार आहे. 

आधार संलग्न नसल्याने अडकले ६८ कोटीदरम्यान, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसल्याने १ लाख ६१ हजार ३० शेतकऱ्यांना ६८ कोटी ७१ लाख ६३ हजार अग्रिम वाटण्यात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आधार क्रमांक बँक खात्याला जोडावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी