शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

१४ लाख शेतकऱ्यांचे ५०० कोटी कधी देणार? सरकारचे आदेश डावलले : अग्रिमपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 06:10 IST

कंपन्यांकडून १८ डिसेंबरपर्यंत ३७ लाख ७ हजार ४८४ शेतकऱ्यांना १ हजार ७०७ कोटींचे अग्रिम वितरित केले आहे. अद्याप ४९८ कोटी ९९ लाखांचे अग्रिम वितरित झालेले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेतून राज्यात २४ जिल्ह्यांमधील ५० लाख शेतकऱ्यांना २२०६ कोटी रुपयांची अग्रिम नुकसानभरपाई जाहीर झाली. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, असे आदेश विमा कंपन्यांना दिले होते. मात्र, दिवाळीनंतर महिना लोटला तरी अद्याप १३ लाख ८६ हजार ९८३ शेतकरी ५०० कोटींच्या अग्रिमपासून वंचित आहेत. यावरून विमा कंपन्यांनी सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट होत आहे. योजनेतील तरतुदीनुसार पावसाचा २१ दिवसांपेक्षा जास्त खंड व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास नुकसानभरपाई मिळते. 

कंपन्यांकडून १८ डिसेंबरपर्यंत ३७ लाख ७ हजार ४८४ शेतकऱ्यांना १ हजार ७०७ कोटींचे अग्रिम वितरित केले आहे. अद्याप ४९८ कोटी ९९ लाखांचे अग्रिम वितरित झालेले नाही. 

एक हजारपेक्षा कमी अग्रिम राज्यात ९५ हजार ६२७ शेतकऱ्यांना एक हजार रुपयांपेक्षा कमी अग्रिम रक्कम मिळाली आहे. ही रक्कम ६ कोटी ५२ लाख ५३ हजार आहे. 

आधार संलग्न नसल्याने अडकले ६८ कोटीदरम्यान, आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसल्याने १ लाख ६१ हजार ३० शेतकऱ्यांना ६८ कोटी ७१ लाख ६३ हजार अग्रिम वाटण्यात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आधार क्रमांक बँक खात्याला जोडावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी