शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंदबरम यांनी जो कायदा आणला, त्याला मी विरोध केला, मात्र..."; शरद पवारांनी सांगितली आठवण
2
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
3
ही गुंडगिरी संपुष्टात आणण्यासाठी मीच पुढाकार घेणार; मनोज जरांगेंनी घेतली शिवराज दिवटेची भेट
4
मुकेश अंबानींचा नवा डाव! आता ऑनलाइन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ, झेप्टो-ब्लिंकिटला थेट टक्कर
5
धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
6
पाकिस्तानच्या अडचणी वाढणार! कर्ज दिल्यानंतर IMFने दिला इशारा; ११ अटींचे पालनही बंधनकारक
7
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आता केवळ या दोन नावांची चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, कधी होणार घोषणा  
8
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
9
“‘नरकातला स्वर्ग’चे श्रेय स्वप्ना पाटकरांना, संजय राऊत देशसेवेसाठी तुरुंगात गेले नव्हते”
10
ऑटो जगतात खळबळ! निस्सान भारतासह जगभरातील प्रकल्प बंद करण्याच्या तयारीत; पैकी जपानमधील दोन... 
11
भारतीय सैन्याच्या शौर्याला, धाडसाला कांदिवलीच्या नागरिकांचा सलाम; काढली 'तिरंगा पदयात्रा'
12
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
13
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
14
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
15
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
16
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
17
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
18
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
19
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
20
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी

खिशात घेऊन फिरणाऱ्या त्या ६ हजार कोटींच्या चेकचं काय? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 19:09 IST

राज्य सरकारची १२ कोटी कोरोना लसी सहा हजार कोटींच्या एकरकमी चेकने खरेदी करण्याची तयारी होती.

पुणे : राज्य सरकारची १२ कोटी कोरोना लसी सहा हजार कोटींच्या एकरकमी चेकने खरेदी करण्याची तयारी होती. मात्र,केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ वर्षांपुढील सर्वाना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ठाकरे सरकार ते सहा हजार कोटी रुपये वाचले आहेत. तो खिशात घेऊन फिरणाऱ्या सहा हजार कोटींच्या चेकचं काय? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला केला आहे. 

पुण्यात एका आयोजित कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पाटील म्हणाले,मागच्या पाच वर्षात खिशात आमदारकीचे राजीनामे घेऊन फिरणारे लोक ह्यावेळी १२ कोटी लस एकरकमी खरेदी करण्याच्या उद्देशाने सहा हजार कोटींचा चेक खिशात घेऊन फिरत होते. मात्र केंद्र सरकारने १८ वर्षांपुढील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचे ठरवल्याने आता ते ६ हजार कोटी रुपये  काय करणार? ते मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी वापरणार? चक्री वादळात नुकसान झालेल्यांना वाटणार ?की गेल्या सव्वा ते दीड वर्षात कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या दुर्बल घटकांच्या खात्यात जमा करणार असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेल्या भेटीवर आणि केलेल्या मागण्यांसंबंधी देखील पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पाटील म्हणाले,राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल मराठा समाजाच्या डोळ्यात धूळफेक सुरु आहे. केंद्र सरकारच्या हातात मराठा आरक्षणासंबंधी काहीच नाही. मात्र, राज्य सरकारला समिती स्थापन करून प्रचंड सर्व्हे करून सर्वात अगोदर मराठा समाजाला मागास ठरविण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. याच दरम्यान,राज्य सरकारने भाजपच्या सत्ताकाळात देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ज्या सवलती दिल्या होत्या त्या तरी द्यायला हव्यात. यासाठी सर्वोच्च न्यायालयाने किंवा उच्च न्यायालयाने तुमचे हात कुठे बांधलेत ? असे मत पाटील यांनी व्यक्त केले, तसेच मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत यासाठी जो खर्च येणार आहे तो ३ हजार इतकाच आहे. ते द्या ना. अजित पवार हे फार ऑन द स्पॉट निर्णय घेण्यासाठी चर्चेत असतात. मग त्यांनी तरी आता निर्णय घ्यावा. 

कोरोनाची बंधने आहेत म्हणून लोक शांत आहे. तरीदेखील आपापल्या परीने त्यांची आंदोलनेे सुरु आहेत. मात्र जर हे निर्बंध तुम्ही उठवलीत तर लोकांचा संयम सुटल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात मराठा व ओबीसी आरक्षणावरून चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

 

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार