शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

न्यायदान यंत्रणेवरील विश्वास गमावून बसलो, तर उरते काय? माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 23:00 IST

सरकारकडून पद स्वीकारण्याचा मोह टाळावा

ठळक मुद्देनिवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर जाणार आहेत

पुणे : जे खटले वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यात न्याय मिळावा यासाठी नागरिक मोठ्या आशेने न्यायालयात येतात. परंतु, न्यायव्यवस्थेतील जबाबदार व्यक्तीने राजकीय पदाचा स्वीकार केल्याने नागरिकांच्या मनात संशय येतो. तो अयोग्य आहे, असे म्हणता येणार नाही. न्यायाधीश असे विकले जात असल्यास, याचा अर्थ या सगळ्याचा सरकारबरोबर काही संबंध आहे, असे म्हणावे लागेल. अशाने न्यायदान यंत्रणेवरील विश्वास गमावून बसलो, तर उरते काय? असा प्रश्न उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी उपस्थित केला आहे. निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून राज्यसभेवर जाणार आहेत. या संदर्भात माजी न्यायाधीश सावंत यांना विचारणा केली असता त्यांनी अशाप्रकारे पदे स्वीकारण्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘न्यायधीशाने राजकीय पदे घेऊ नयेत. निदान काही वर्षे तरी घेऊ नयेत. स्पष्टच सांगायचे झाल्यास ती घेऊच नयेत. असे माझे ठाम मत आहे. सरकारने दिलेली अशा प्रकारची पदे शक्यतो टाळावीत. लोकांनी दिलेले पद असल्यास ते एक वेळ मान्य होईल; मात्र सरकारकडून मिळालेल्या पदामुळे  वेगळ्या प्रकारचा संदेश समाजात जातो. त्याचे पडसाद नकारात्मक पद्धतीने समाजमनावर पडतात. याचा विचार संबंधित व्यक्तींनी करण्याची गरज आहे. सरकारकडून स्वीकारण्यात आलेल्या पदामुळे न्यायदान यंत्रणा ही जी स्वतंत्र व्यवस्था आहे, त्या स्वतंत्र यंत्रणेवर आघात झाल्याशिवाय राहत नाही.’’ या सगळ्यामुळे न्यायदानाबद्दल विश्वास राहत नाही. लोकांचा विश्वास हे न्यायदानाचे भांडवल आहे. तेच गमावून बसलो, तर न्यायदानात उरते काय? नि:पक्षपणे न्यायदान व्हावे, यासाठी लोक न्यायालयात येतात, हे लक्षात घ्यावे. अशामुळे न्यायपालिकेची विश्वासार्हता आणि नि:स्पृहता धोक्यात येतेच, हे समजून घ्यावे. लोकांच्या मनात न्यायदान यंत्रणेबद्दल विश्वास राहत नाही. लोक न्यायदान यंत्रणेकडे न्याय मिळावा म्हणून येतात. जे खटले वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यात न्याय मिळावा यासाठी ते मोठ्या आशेने न्यायालयात येतात. यापूर्वी अशा काही घटना घडल्या आहेत. सरकारच्या बाजूने ज्यांनी निर्णय दिले, अशा न्यायाधीशांना पदे दिली गेली आहेत. असे प्रकार सर्रास होऊ लागले, तर न्यायदान यंत्रणा ही स्वतंत्र राहिली नसून ती राजकीय पक्षांना विकली गेली आहे, असे लोकांना वाटू लागेल, अशी भीती सावंत यांनी या वेळी व्यक्त केली.

टॅग्स :PuneपुणेRanjan Gogoiरंजन गोगोईCourtन्यायालयGovernmentसरकार