शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

मेक इन इंडियाचा स्थानिकांना काय फायदा? योजना उद्योगपतींसाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:31 IST

सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न केवळ उद्योगपतींसाठीच असून स्थानिक तरुण मात्र अद्यापही नोकरी व व्यवसायापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना हक्कची नोकरी मिळाली पाहिजे.

कुरुळी - सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न केवळ उद्योगपतींसाठीच असून स्थानिक तरुण मात्र अद्यापही नोकरी व व्यवसायापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना हक्कची नोकरी मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष, सोसायटीची माजी अध्यक्ष स्वामी येळवंडे यांनी केली आहे.खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी, एसीझेड परिसर मोठया प्रमाणात वाढत चालल आहे. आंतरराष्ट्रीय उद्योगांची या परिसरात मोठी गुंतवणूकष होत आहे. मात्र, प्रकल्प उभा करण्यासाठी ज्या शेतक-यांनी जमिनी दिल्या त्यापैकी अनेक शेतक-यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. तर, दुसरीकडे भुमीपुत्रांना नोक-यांमध्ये संधीच अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे त्यांची अवस्था न घर का न घाट का अशी झाली आहे. या परिसराती शेतक-यांच्या शेती ची जमीन उद्योगांसाठी सरकारने संपादित केल्या. मोबदल्यासाठी स्थानिक नेत्यांसह नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत आपला विरोध सरकार पुढे मांडला.कवडीमोल भावाने जमिनी संपादित करण्यात आल्या. हळूहळू उद्योगही या परिसरात उभे राहू लागले. हे सर्व करीत असताना स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी झाली. पण काही काळात बाहेरच्या राज्यातून या परिसरात कंपनीच्या उच्चपदवर अधिका-यांची भरती करण्यात आली. या अधिका-यांनी कंत्राट पद्धतीने सुरु करून परराज्यातील तरुणाना नोक-यांमध्ये समाविष्ट करून घेतले.जगाच्या नकाशावर असणा-या चाकण एमआयडीसीत प्रकल्पात मोठया झपाट्याने वाढ होत असताना येथील स्थानिक तरुणांना नोकरी पासून वंचित राहवे लागते आहे. याच उद्योगामध्ये परराज्यातील तरुणांना कंत्राटी पद्धतीने कमी मोबदलात रोजगार दिला जातो. मेक इन इंडियाच्या माध्यमातून परिसरातील मोठया प्रमाणात आंतरराष्ट्रीय उद्योगांनी गुंतवणूक केली.या गावांमधील स्थानिक तरुण मात्र बेरोजगारीलाच सामोरे जात आहेत.प्रकल्पबाधित स्थानिक तरुणांना येथील कंपनीत साधा प्रवेशही मिळत नाही. तरुण पिढी शैक्षणिक पात्रता असूनही बेरोजगार बनत चालली आहे. परराज्यातील तरुणांना नोकरी देत त्यांच्या कडून काम करून घेतले जाते. त्याचा मोबदलाही योग्य पद्धतीने दिला जात नाही. शेतकरी दिवसभर शेतात काम करून मोल मजुरी करून पोटाला चिमटा घेत मुलांचे शिक्षण पूर्ण करतात. उच्चशिक्षत तरुणांना दिवस भरत पडेल ते काम करावे लागते. वाढती महागाई पाहता कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न आता तरुणांना पुढे आ वासून उभा आहे.

टॅग्स :PuneपुणेMake In Indiaमेक इन इंडिया