शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
5
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
6
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
7
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा...", राम गोपाल वर्मा यांचं वादग्रस्त ट्वीट, म्हणाले- "गेल्या ५० वर्षांत..."
8
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
9
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
10
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
11
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
12
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
13
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
14
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
15
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
16
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
17
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
18
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
20
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
Daily Top 2Weekly Top 5

मेक इन इंडियाचा स्थानिकांना काय फायदा? योजना उद्योगपतींसाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:31 IST

सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न केवळ उद्योगपतींसाठीच असून स्थानिक तरुण मात्र अद्यापही नोकरी व व्यवसायापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना हक्कची नोकरी मिळाली पाहिजे.

कुरुळी - सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न केवळ उद्योगपतींसाठीच असून स्थानिक तरुण मात्र अद्यापही नोकरी व व्यवसायापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना हक्कची नोकरी मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष, सोसायटीची माजी अध्यक्ष स्वामी येळवंडे यांनी केली आहे.खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी, एसीझेड परिसर मोठया प्रमाणात वाढत चालल आहे. आंतरराष्ट्रीय उद्योगांची या परिसरात मोठी गुंतवणूकष होत आहे. मात्र, प्रकल्प उभा करण्यासाठी ज्या शेतक-यांनी जमिनी दिल्या त्यापैकी अनेक शेतक-यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. तर, दुसरीकडे भुमीपुत्रांना नोक-यांमध्ये संधीच अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे त्यांची अवस्था न घर का न घाट का अशी झाली आहे. या परिसराती शेतक-यांच्या शेती ची जमीन उद्योगांसाठी सरकारने संपादित केल्या. मोबदल्यासाठी स्थानिक नेत्यांसह नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत आपला विरोध सरकार पुढे मांडला.कवडीमोल भावाने जमिनी संपादित करण्यात आल्या. हळूहळू उद्योगही या परिसरात उभे राहू लागले. हे सर्व करीत असताना स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी झाली. पण काही काळात बाहेरच्या राज्यातून या परिसरात कंपनीच्या उच्चपदवर अधिका-यांची भरती करण्यात आली. या अधिका-यांनी कंत्राट पद्धतीने सुरु करून परराज्यातील तरुणाना नोक-यांमध्ये समाविष्ट करून घेतले.जगाच्या नकाशावर असणा-या चाकण एमआयडीसीत प्रकल्पात मोठया झपाट्याने वाढ होत असताना येथील स्थानिक तरुणांना नोकरी पासून वंचित राहवे लागते आहे. याच उद्योगामध्ये परराज्यातील तरुणांना कंत्राटी पद्धतीने कमी मोबदलात रोजगार दिला जातो. मेक इन इंडियाच्या माध्यमातून परिसरातील मोठया प्रमाणात आंतरराष्ट्रीय उद्योगांनी गुंतवणूक केली.या गावांमधील स्थानिक तरुण मात्र बेरोजगारीलाच सामोरे जात आहेत.प्रकल्पबाधित स्थानिक तरुणांना येथील कंपनीत साधा प्रवेशही मिळत नाही. तरुण पिढी शैक्षणिक पात्रता असूनही बेरोजगार बनत चालली आहे. परराज्यातील तरुणांना नोकरी देत त्यांच्या कडून काम करून घेतले जाते. त्याचा मोबदलाही योग्य पद्धतीने दिला जात नाही. शेतकरी दिवसभर शेतात काम करून मोल मजुरी करून पोटाला चिमटा घेत मुलांचे शिक्षण पूर्ण करतात. उच्चशिक्षत तरुणांना दिवस भरत पडेल ते काम करावे लागते. वाढती महागाई पाहता कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न आता तरुणांना पुढे आ वासून उभा आहे.

टॅग्स :PuneपुणेMake In Indiaमेक इन इंडिया