शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

मेक इन इंडियाचा स्थानिकांना काय फायदा? योजना उद्योगपतींसाठीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 02:31 IST

सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न केवळ उद्योगपतींसाठीच असून स्थानिक तरुण मात्र अद्यापही नोकरी व व्यवसायापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना हक्कची नोकरी मिळाली पाहिजे.

कुरुळी - सरकारचे मेक इन इंडियाचे स्वप्न केवळ उद्योगपतींसाठीच असून स्थानिक तरुण मात्र अद्यापही नोकरी व व्यवसायापासून वंचित राहिलेले आहेत. त्यामुळे भूमिपुत्रांना हक्कची नोकरी मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष, सोसायटीची माजी अध्यक्ष स्वामी येळवंडे यांनी केली आहे.खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी, एसीझेड परिसर मोठया प्रमाणात वाढत चालल आहे. आंतरराष्ट्रीय उद्योगांची या परिसरात मोठी गुंतवणूकष होत आहे. मात्र, प्रकल्प उभा करण्यासाठी ज्या शेतक-यांनी जमिनी दिल्या त्यापैकी अनेक शेतक-यांना योग्य मोबदला मिळालेला नाही. तर, दुसरीकडे भुमीपुत्रांना नोक-यांमध्ये संधीच अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे त्यांची अवस्था न घर का न घाट का अशी झाली आहे. या परिसराती शेतक-यांच्या शेती ची जमीन उद्योगांसाठी सरकारने संपादित केल्या. मोबदल्यासाठी स्थानिक नेत्यांसह नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत आपला विरोध सरकार पुढे मांडला.कवडीमोल भावाने जमिनी संपादित करण्यात आल्या. हळूहळू उद्योगही या परिसरात उभे राहू लागले. हे सर्व करीत असताना स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी झाली. पण काही काळात बाहेरच्या राज्यातून या परिसरात कंपनीच्या उच्चपदवर अधिका-यांची भरती करण्यात आली. या अधिका-यांनी कंत्राट पद्धतीने सुरु करून परराज्यातील तरुणाना नोक-यांमध्ये समाविष्ट करून घेतले.जगाच्या नकाशावर असणा-या चाकण एमआयडीसीत प्रकल्पात मोठया झपाट्याने वाढ होत असताना येथील स्थानिक तरुणांना नोकरी पासून वंचित राहवे लागते आहे. याच उद्योगामध्ये परराज्यातील तरुणांना कंत्राटी पद्धतीने कमी मोबदलात रोजगार दिला जातो. मेक इन इंडियाच्या माध्यमातून परिसरातील मोठया प्रमाणात आंतरराष्ट्रीय उद्योगांनी गुंतवणूक केली.या गावांमधील स्थानिक तरुण मात्र बेरोजगारीलाच सामोरे जात आहेत.प्रकल्पबाधित स्थानिक तरुणांना येथील कंपनीत साधा प्रवेशही मिळत नाही. तरुण पिढी शैक्षणिक पात्रता असूनही बेरोजगार बनत चालली आहे. परराज्यातील तरुणांना नोकरी देत त्यांच्या कडून काम करून घेतले जाते. त्याचा मोबदलाही योग्य पद्धतीने दिला जात नाही. शेतकरी दिवसभर शेतात काम करून मोल मजुरी करून पोटाला चिमटा घेत मुलांचे शिक्षण पूर्ण करतात. उच्चशिक्षत तरुणांना दिवस भरत पडेल ते काम करावे लागते. वाढती महागाई पाहता कुटुंब कसे चालवायचे हा प्रश्न आता तरुणांना पुढे आ वासून उभा आहे.

टॅग्स :PuneपुणेMake In Indiaमेक इन इंडिया