शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

तळातील दहा टक्क्यांचे काय? गरिबी निर्मूलनाशी भिडावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 11:50 IST

अर्थमहासत्तेलाही सतावतेय गरीब-श्रीमंत दरी

ठळक मुद्देचीनमधील अर्थसंघर्ष, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थमंदीच्या आगीत भर पडणारगरिबीच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी घट करण्याचे उद्दिष्ट

विशाल शिर्के - पुणे : आर्थिक मंदीतून जात असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आणखी हादरा बसणार आहे. त्याचा उल्लेख उद्योगपती आणि काही अर्थतज्ज्ञांनी देखील केला. त्याची प्रत्यक्ष झळ उद्योगांना जाणवू लागली आहे. असे तत्कालीक मुद्दे असले तरी, जगामधे श्रीमंत आणि गरिबांमधील वाढत्या दरीवर चिंता व्यक्त करण्यात आली. तळातील दहा टक्क्यांसाठी आपण काही करणार की नाही, असा ठाम प्रश्न देखील पुण्यात झालेल्या आशियाई देशांच्या अर्थ चर्चेत उपस्थित करण्यात आला. संख्येने सर्वाधिक गरीब असलेल्या आशियाई आणि त्यातही भारतासारख्या देशाला या प्रश्नाला भिडावे लागेल. परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने रविवारी (दि. १) तीन दिवसीय ‘एशिया इकोनॉमिक डायलॉग’ ही तीनदिवसीय परिषद पार पडली. चीन, सिंगापूर, श्रीलंका, मालदीव, डच या देशांचे प्रतिनिधी आणि जागतिक व्यापार सघंटनांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. सध्याची मंदीची स्थिती, अमेरिका आणि चीनमधील अर्थसंघर्ष, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थमंदीच्या आगीत भर पडणार असल्याकडेही अर्थतज्ज्ञांनी लक्ष वेधले. सिंगापूरच्या आशियाई संशोधन संस्थेतील प्रा. किशोर मेहबुबानी यांनी गरीब आणि श्रीमंतातील दरी गेल्या तीस वर्षांमधे वाढत असल्याचे सांगितले. अर्थमहासत्ता असलेल्या अमेरिकेतील तळातील १५ टक्के लोकांच्या दरडोई उत्पन्नामधे गेल्या काही दशकांत तब्बल ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत राजकीय रोष निर्माण झाला आहे. जगामध्ये गेल्या तीस वर्षांत जितकी गरिबी वाढली नसेल, तितकी गेल्या ३ हजार वर्षांत झाली. त्यांचे हे म्हणणे पुरेसे बोलके आहे........गरिबीच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी घट करण्याचे उद्दिष्ट

संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव कोफी अन्नान यांनी २०५० पर्यंत गरिबीच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी घट करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट देताना दक्षिण आशियाई देशात गरिबांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचाच दुसरा अर्थ भारत असाच होतो. लोकसंख्या आणि गरीब दोन्हींचा भारतातच उद्रेक आहे. त्यामुळे भारताला या प्रश्नाशी अधिक भिडावे लागेल..............

पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवताना पुढील दहा वर्षांत आपण कसे राहील याचा आडाखा भारताने ठेवला पाहिजे. जीडीपी म्हणजे उच्चश्रेणीतील १ टक्क्यांचा विकास नव्हे. तर, तळातील व्यक्तींच्या उत्पन्नातील वाढ म्हणजे विकास असल्याचे अर्थसंवादाने ठसविले.  

टॅग्स :PuneपुणेEconomyअर्थव्यवस्थाGovernmentसरकारbusinessव्यवसाय