शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

तळातील दहा टक्क्यांचे काय? गरिबी निर्मूलनाशी भिडावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 11:50 IST

अर्थमहासत्तेलाही सतावतेय गरीब-श्रीमंत दरी

ठळक मुद्देचीनमधील अर्थसंघर्ष, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थमंदीच्या आगीत भर पडणारगरिबीच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी घट करण्याचे उद्दिष्ट

विशाल शिर्के - पुणे : आर्थिक मंदीतून जात असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आणखी हादरा बसणार आहे. त्याचा उल्लेख उद्योगपती आणि काही अर्थतज्ज्ञांनी देखील केला. त्याची प्रत्यक्ष झळ उद्योगांना जाणवू लागली आहे. असे तत्कालीक मुद्दे असले तरी, जगामधे श्रीमंत आणि गरिबांमधील वाढत्या दरीवर चिंता व्यक्त करण्यात आली. तळातील दहा टक्क्यांसाठी आपण काही करणार की नाही, असा ठाम प्रश्न देखील पुण्यात झालेल्या आशियाई देशांच्या अर्थ चर्चेत उपस्थित करण्यात आला. संख्येने सर्वाधिक गरीब असलेल्या आशियाई आणि त्यातही भारतासारख्या देशाला या प्रश्नाला भिडावे लागेल. परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने रविवारी (दि. १) तीन दिवसीय ‘एशिया इकोनॉमिक डायलॉग’ ही तीनदिवसीय परिषद पार पडली. चीन, सिंगापूर, श्रीलंका, मालदीव, डच या देशांचे प्रतिनिधी आणि जागतिक व्यापार सघंटनांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. सध्याची मंदीची स्थिती, अमेरिका आणि चीनमधील अर्थसंघर्ष, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थमंदीच्या आगीत भर पडणार असल्याकडेही अर्थतज्ज्ञांनी लक्ष वेधले. सिंगापूरच्या आशियाई संशोधन संस्थेतील प्रा. किशोर मेहबुबानी यांनी गरीब आणि श्रीमंतातील दरी गेल्या तीस वर्षांमधे वाढत असल्याचे सांगितले. अर्थमहासत्ता असलेल्या अमेरिकेतील तळातील १५ टक्के लोकांच्या दरडोई उत्पन्नामधे गेल्या काही दशकांत तब्बल ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत राजकीय रोष निर्माण झाला आहे. जगामध्ये गेल्या तीस वर्षांत जितकी गरिबी वाढली नसेल, तितकी गेल्या ३ हजार वर्षांत झाली. त्यांचे हे म्हणणे पुरेसे बोलके आहे........गरिबीच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी घट करण्याचे उद्दिष्ट

संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव कोफी अन्नान यांनी २०५० पर्यंत गरिबीच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी घट करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट देताना दक्षिण आशियाई देशात गरिबांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचाच दुसरा अर्थ भारत असाच होतो. लोकसंख्या आणि गरीब दोन्हींचा भारतातच उद्रेक आहे. त्यामुळे भारताला या प्रश्नाशी अधिक भिडावे लागेल..............

पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवताना पुढील दहा वर्षांत आपण कसे राहील याचा आडाखा भारताने ठेवला पाहिजे. जीडीपी म्हणजे उच्चश्रेणीतील १ टक्क्यांचा विकास नव्हे. तर, तळातील व्यक्तींच्या उत्पन्नातील वाढ म्हणजे विकास असल्याचे अर्थसंवादाने ठसविले.  

टॅग्स :PuneपुणेEconomyअर्थव्यवस्थाGovernmentसरकारbusinessव्यवसाय