शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

तळातील दहा टक्क्यांचे काय? गरिबी निर्मूलनाशी भिडावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 11:50 IST

अर्थमहासत्तेलाही सतावतेय गरीब-श्रीमंत दरी

ठळक मुद्देचीनमधील अर्थसंघर्ष, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थमंदीच्या आगीत भर पडणारगरिबीच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी घट करण्याचे उद्दिष्ट

विशाल शिर्के - पुणे : आर्थिक मंदीतून जात असलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला कोरोना विषाणूच्या फैलावामुळे आणखी हादरा बसणार आहे. त्याचा उल्लेख उद्योगपती आणि काही अर्थतज्ज्ञांनी देखील केला. त्याची प्रत्यक्ष झळ उद्योगांना जाणवू लागली आहे. असे तत्कालीक मुद्दे असले तरी, जगामधे श्रीमंत आणि गरिबांमधील वाढत्या दरीवर चिंता व्यक्त करण्यात आली. तळातील दहा टक्क्यांसाठी आपण काही करणार की नाही, असा ठाम प्रश्न देखील पुण्यात झालेल्या आशियाई देशांच्या अर्थ चर्चेत उपस्थित करण्यात आला. संख्येने सर्वाधिक गरीब असलेल्या आशियाई आणि त्यातही भारतासारख्या देशाला या प्रश्नाला भिडावे लागेल. परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या (पीआयसी) वतीने रविवारी (दि. १) तीन दिवसीय ‘एशिया इकोनॉमिक डायलॉग’ ही तीनदिवसीय परिषद पार पडली. चीन, सिंगापूर, श्रीलंका, मालदीव, डच या देशांचे प्रतिनिधी आणि जागतिक व्यापार सघंटनांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. सध्याची मंदीची स्थिती, अमेरिका आणि चीनमधील अर्थसंघर्ष, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्थमंदीच्या आगीत भर पडणार असल्याकडेही अर्थतज्ज्ञांनी लक्ष वेधले. सिंगापूरच्या आशियाई संशोधन संस्थेतील प्रा. किशोर मेहबुबानी यांनी गरीब आणि श्रीमंतातील दरी गेल्या तीस वर्षांमधे वाढत असल्याचे सांगितले. अर्थमहासत्ता असलेल्या अमेरिकेतील तळातील १५ टक्के लोकांच्या दरडोई उत्पन्नामधे गेल्या काही दशकांत तब्बल ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत राजकीय रोष निर्माण झाला आहे. जगामध्ये गेल्या तीस वर्षांत जितकी गरिबी वाढली नसेल, तितकी गेल्या ३ हजार वर्षांत झाली. त्यांचे हे म्हणणे पुरेसे बोलके आहे........गरिबीच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी घट करण्याचे उद्दिष्ट

संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव कोफी अन्नान यांनी २०५० पर्यंत गरिबीच्या प्रमाणात ५० टक्क्यांनी घट करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. हे उद्दिष्ट देताना दक्षिण आशियाई देशात गरिबांची संख्या अधिक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचाच दुसरा अर्थ भारत असाच होतो. लोकसंख्या आणि गरीब दोन्हींचा भारतातच उद्रेक आहे. त्यामुळे भारताला या प्रश्नाशी अधिक भिडावे लागेल..............

पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवताना पुढील दहा वर्षांत आपण कसे राहील याचा आडाखा भारताने ठेवला पाहिजे. जीडीपी म्हणजे उच्चश्रेणीतील १ टक्क्यांचा विकास नव्हे. तर, तळातील व्यक्तींच्या उत्पन्नातील वाढ म्हणजे विकास असल्याचे अर्थसंवादाने ठसविले.  

टॅग्स :PuneपुणेEconomyअर्थव्यवस्थाGovernmentसरकारbusinessव्यवसाय