शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Ashadhi Wari: बारामती तालुक्यात फुलांच्या उधळणीत तुकोबांच्या पालखीचे स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 20:05 IST

दोन वर्षानंतर पालखी सोहळा अनुभवता आल्याने समस्त वैष्णवांमध्ये मोठा उत्साह अन् आनंदाचे वातावरण

उंडवडी : पंढरीच्या वाटेवरील जगदगुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने सोमवारी (दि.२७) रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास  बारामती तालुक्यात प्रवेश केला. सकाळी प्रस्थान ठेवलेल्या सोहळ्याने वरवंड ते उंडवडी सुपे २५ किलोमीटरचा सर्वात लांबचा पल्ला पार केला. तालुक्याच्या शिवेवर गुंजखिळा येथे फुलांची उधळण करत गळाभेट घेत दोन वर्षांनंतर सोहळ्यातील वारकऱ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

दोन वर्षानंतर पालखी सोहळा अनुभवता आल्याने समस्त वैष्णवांमध्ये मोठा उत्साह, आनंदाचे वातावरण आहे. यंदा पालखी सोहळ्याचे ३३७ वे वर्ष आहे. पालखी सोहळ्याच्या सोबतीला आसंमंतात घुमणारा टाळ - मृदुंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी, टाळ- मृदुंगाचा गजर करत चिपळ्याच्या तालावर, कपाळी गंध, खांद्यावर भगवी पताका, गळ्यात टाळ, मुखाने हरिनाम अशा या वातावरणाने मंत्रमुग्ध झालेल्या लाखो वारकऱ्यांसह तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (दि.२७) रोजी सायंकाळी  बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी उंडवडी सुपे ग्रामपंचायत हद्दीतील येथील पालखी तळावर विसाव्यासाठी आगमन झाले. यावेळी  दर्शनाखाठी आलेल्या शेतकºयांनी पाऊस पडण्यासाठी तुकोबांना साकडे घातले.

गुंजखिळा येथील स्वागत आटोपून पालखी सोहळा उंडवडी सुपे येथे सायंकाळी ७.४० ला मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झाला. ग्रामपंचायत व प्रशासनाच्या वतीने भक्तीमय वातावरणात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. मंगळवारी (दि २८) सकाळी ७ वाजता पालखी सोहळ्याचे बारामती शहराकडे प्रस्थान होणार आहे.

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpurपंढरपूरsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखी