शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

Raosaheb Danve: पंतप्रधान मोदींनी आणलेल्या लोकोपयोगी योजनांच्या जोरावर विधानसभा जिंकू; रावसाहेब दानवेंचा विश्वास

By श्रीकिशन काळे | Updated: July 21, 2024 13:10 IST

विरोधकांनी खोटे बोलून लोकांना फसवलं, चुकीचा नरेटिव्ह समोर ठेवला तरी देखील मोदींचे सरकार पुन्हा आले

पुणे : देशात पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले आहेत. त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मी मांडतो. मोदींनी गेल्या काही वर्षांत अनेक लोकोपयोगी योजना आणल्या आहेत. त्यामुळे त्याच योजनांच्या जोरावर आपण विधानसभा जिंकू, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला. भाजपचे अधिवेशन आज बालेवाडीत सुरू आहे. त्यामध्ये दानवे यांनी मोदींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर ते बोलत होते. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. 

दानवे म्हणाले, आपण १० कोटी लोकांना मोफत गॅस दिलाय. हर घर जल योजना आणली. १४ कोटी लोकांना नळाचे पाणी दिले. शेतकरी यांच्या खात्यात १२ हजार रूपये टाकले जात आहेत. लोकोपयोगी योजना करूनही लोकसभेत आपल्याला पराभव मिळाला. आज सर्व पक्ष एकत्र आले आणि मोदींचा मुकाबला करत आहेत. ते सर्व एकत्र आले तरी मोदी हेच पंतप्रधान आहेत. त्यांचे प्रधानमंत्री सांगू शकले नाही. त्यांच्याकडे नेता नाहीय. आज मोदींचे सरकार आले आहे. 

मोदी यांनी आपली अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर आणली. आता लवकरच तिसरा क्रमांक पटकावू. विरोधकांनी खोटे बोलून लोकांना फसवलं. चुकीचा नरेटिव्ह समोर ठेवला. पण तरी देखील मोदींचे सरकार पुन्हा आलेय. जगातले लोकं आपली तारीफ करतात आणि राहुल गांधी लंडनला जाऊन भारतात कायद सुव्यवस्था बिघडली असे म्हणतात. खरं तर यापुर्वी त्यांच्या सरकारने देशात आणीबाणी आणली होती आणि अराजकता पसरवली. या निवडणुकीत त्यांच्याकडे मुद्दाच नव्हता. मग ते म्हणतात संविधान बदलणार. पण भाजप संविधान बदलणार नाही. ते खोटं बोल पण रेटून बोल असं करत आहेत. भारतीय राज्यघटनेचा मूळ ढाचा बदलू शकत नाही. आम्ही तो कधीच बदलणार नाही‌. आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. तयारीला लागा. आपल्याला जिंकायचे आहे.

टॅग्स :Puneपुणेraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाPoliticsराजकारणMahayutiमहायुतीNarendra Modiनरेंद्र मोदी