शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मानाच्या गणपती अगोदर आम्ही निघणार; पुण्यातील १०० मंडळे सकाळी ७ ला विसर्जन मिरवणूक सुरु करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 19:35 IST

नवीन काहीतरी रूढी परंपरा आणण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार. आमचा पोलिसांशी संघर्ष झाला तरी चालेल

पुणे : पुण्यातील विसर्जन मिरवणुकीबाबत पुण्यात एक पत्रकार परिषद पार पडली आणि त्या पत्रकार परिषदेत मानाच्या पाच गणपतीनंतर अखिल मंडई मंडळ आणि त्यानंतर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ हे विसर्जन मिरवणूकीत सहभागी होतील असं सांगितलं गेलं. आणि त्यानंतर कुठंतरी पुण्यात जे अनेक वर्ष शंभर वर्षापेक्षा जास्त जुनी मंडळी आहेत. त्या मंडळामध्ये कुठंतरी नाराजी पसरली आहे. आमच्याकडे कुठंतरी दुर्लक्ष होतंय असा त्यांचा सूर आहे. त्यांनी मनाच्या गणपती अगोदर आम्ही निघणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आम्ही सकाळी ७ ला निघण्याची तयारी करणार आहे. 

कार्यकर्ते म्हणाले, परवाची प्रेस बघितल्यानंतर असं वाटायला लागलं की सामान्य मंडळाला कुठं न्याय मिळेल की नाही शंका आहे? आणि या मंडळाने जर अशा पद्धतीचा निर्णय घेतला तर बाकीच्या मंडळांनी करायचं काय? ह पण पहिल्या पाच मानाचे गणपती गेल्यानंतर ही रीतीरिवाजाप्रमाणे आम्ही सांगतोय. जर भाऊ रंगारी किंवा बाकीची मंडळी मध्ये गेले. तर रात्रीचे १२ वाजतील. आम्हाला बारा नंतर स्पीकर किंवा पथक म्हणा काहीच मिळणार नाही. शेवटी जागेवरती सगळं विसर्जन करावं लागेल. आमच्या मंडळांचे कार्यकर्ते काय करोडपती नाही ते लक्षपती नाहीत. पै ना पै गोळा करून कार्यकर्ते गणेश उत्सव साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  

पाच, सात मंडळ म्हणजे काय पुणे शहर नाही 

सामान्य मंडळाच्या मागं उभे राहा. प्रशासन पाच ते सात मंडळ घेऊन जर चालत असेल तर पुणे शहर ते मान्य करणार नाही. कुठल्या गोष्टीचं आणि पाच, सात मंडळ म्हणजे काय पुणे शहर नाही म्हणता येणार. विसर्जन मिरवणुकीचा वेळ कमी करायचा असेल तर मानाच्या गणपतींच्या उपाययोजना केल्या पाहिजे. त्यांची मिरवणूक लवकर केली पाहिजे. त्यांच्यापुढं ते तीन, चार पथक लावलेले असतात. ते प्रत्येक मंडळाला एक खेळ लावण्याची तुम्ही संधी द्या. त्यामुळं प्रत्येक मंडळ लवकर पुढे सरकेल. 

आम्ही मानाच्या गणपती नंतर जाणार

पूर्वीपासून जी प्रथा होती म्हणजे पाच - पाच मंडळं सोडली जायची ही प्रथा कधीपासून बंद पडली? ही प्रथा आजही सुरु आहे. ही प्रथा मोडण्याचा काहीजण प्रकार करत आहेत. त्याला आमचा विरोध आहे. बर ही प्रथा प्रशासनानेच केलेली आहे. आणि हा संपूर्ण दबाव प्रशासनावर येणार आहे. मानाचे गणपती मिरवणूक सुरु करतात. प्रत्येक मंडळाच्या पुढे पाच पाच पथकं असतात. हे दहा ते पाच हे लक्ष्मी रोडचा ताबा सोडत नाही. पाच नंतर समजा दगडूशेठ येतात. त्याच्यानंतर वर्षानुवर्ष गेली अनेक वर्ष लक्ष्मी रोडचे पाच मंडळ जातात. शिवाजी रोडचे विद्युत रोषणाईचे पाच मंडळ जातात. असं गुणगोविंदाने सगळे मंडळांचं एकजुटीने सगळं व्यवस्थित होतं. पण कोणीतरी येतंय पत्रकार परिषद घेतंय आणि जाहीर करतंय की, आम्ही मानाच्या गणपती नंतर जाणार आहे. 

आम्ही सकाळी ७ ला निघतो 

नवीन काहीतरी रूढी परंपरा आणण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार. आमचा पोलिसांशी संघर्ष झाला तरी चालेल. पण आम्ही या रीती ही परंपरा मोडून देणार नाही. सकाळी सातला निघायचा आमचा निर्णय झालेला आहे. सकाळी सात वाजता म्हणजेच मानाच्या गणपतीच्या अगोदर निघायची आमची तयारी आहे. आम्ही शंभर एक मंडळ सकाळी सातला निघतो. वेळ बदलला तर मानाच्या गणपतीचा मान कमी होत नाही. तुम्ही समंजस भूमिका घ्या. आपण गुण्यागोविंदाने गणेश उत्सव चांगला साजरा करू. 

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४SocialसामाजिकDagdusheth Templeदगडूशेठ मंदिर