शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान आम्हाला एक मंत्री पद मिळावे; रामदास आठवलेंची मागणी

By नितीश गोवंडे | Updated: June 29, 2023 19:09 IST

विरोधी पक्ष एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत

पुणे : मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान आम्हाला एक मंत्री पद मिळावे, विधान परिषद मध्ये जागा मिळावी आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत जागा मिळाव्यात अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच, दलित वस्ती गावात एका बाजूला असते त्यामुळे तेथील आरक्षणाची रोटेशान पद्धत बंद करून जिथे दलित वस्ती आहेत त्याठिकाणीच आरक्षण मिळावे अशी आमच्या पक्षाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. 

प्रत्येक गोष्टीला विरोध करणे चुकीचे

विरोधी पक्ष एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्याचा कोणताही परिणाम मोदींवर होणार नाही. त्यांचे नेतृत्व सक्षम असून ते जगात लोकप्रिय आहे त्यामुळेच त्यांचे अमेरिकेत जोरदार स्वागत झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत ३२५ पेक्षा अधिक जागा आम्हाला मिळतील. विरोधक जितके एकत्र येतील त्याप्रमाणात जनतेपर्यंत मोदी पोहोचतील. वेगवेगळ्या क्षेत्रात भारताने आघाडी घेतलेली असून रोजगार निर्मितीस प्राधान्य देण्यात आले आहे. दहा लाख लोकांना एका वर्षात सरकारी नोकरी देण्याचे काम केले जात आहे. खासगी उद्योगांना प्रोत्साहन दिले जात असून लोकांनी त्याचा फायदा घ्यावा. राज्यात उद्योग वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत असून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. विरोधकांनी केवळ विरोध न करता सरकारला सहकार्य करणे ही खरी लोकशाही आहे. प्रत्येक गोष्टीला विरोध करणे चुकीचे आहे, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेश मध्ये झालेला हल्ला दुर्दैवी आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. या हल्ल्याचा निषेध करतो. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी