शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही वाचलो, पण आमची जिवाभावाची माणसं गेली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:44 IST

कोल्हापुरात मिनी बस नदीवरील पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात बालेवाडीतील केदारी कुटुंबीयांसह त्यांचे आप्तेष्ट व चालक असे १३ जण दगावले.

रहाटणी : कोल्हापुरात मिनी बस नदीवरील पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात बालेवाडीतील केदारी कुटुंबीयांसह त्यांचे आप्तेष्ट व चालक असे १३ जण दगावले. त्यातून तीन जण बचावले असून, अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेला २६ जानेवारीला एक वर्ष पूर्ण झाले. जखमींच्या भळभळत्या जखमा भरून आल्या असल्या, तरी मनावरील आघात अद्यापही कायम आहे. अपघातातून आम्ही वाचलो, पण जिवाभावाची माणसे गेली, हे शल्य मनाला बोचते आहे.पर्यटनासाठी कोकणात गेलेले केदारी, वरखडे व नांगरे कुटुंबीय २६ जानेवारीच्या रात्री कोल्हापूरला मुक्कामी निघाले. बसमध्ये चालकासह एकूण १६ जण होते. कोल्हापूरला जात असताना, त्यांची गाडी पंचगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. त्यातील १३ जणांचा अंत झाला.प्राजक्ता दिनेश नांगरे (वय १८), मनीषा संतोष वरखडे (वय ३८), मंदा भरत केदारी (वय ५४) या तिघी सुदैवाने या अपघातातून बचावल्या. जवळच्या, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींचा डोळ्यांसमोर मृत्यू झाला. या दु:खातून त्या अद्याप सावरल्या नाहीत. गौरी वरखडे (वय १६), ज्ञानेश्वरी वरखडे (वय १४), संतोष वरखडे (वय ४५), साहिल केदारी (वय १४), नीलम केदारी (वय २८), भावना केदारी (वय ३५), सचिन केदारी (वय ३४), संस्कृती केदारी (वय ८),श्रावणी केदारी (वय ११), सानिध्य केदारी (१० महिने), प्रतीक नांगरे (वय १४), छाया नांगरे (वय ४१) यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे या कुटुंबीयांच्या वारसांवर दु:खाचा डोंगर कोसळला. एकाच दिवशी निघालेल्या अंत्ययात्रेचे बालेवाडीतील हे दृश्य मन हेलावणारे होते. केवळ कुटुंबीयच नव्हे, तर राज्यातील जनतेच्या स्मृतिपटलावरून ही घटना अद्याप दूर झालेली नाही.> अपघातात मुलगी छाया नांगरे, जावई संतोष वरखेडे, मुलगा सचिन केदारी, सून नीलम केदारी, भावना केदारी यासह गौरी वरखेडे, ज्ञानेश्वरी वरखेडे, श्रावणी केदारी, संस्कृती केदारी, साहिल केदारी, प्रतीक नांगरे व सानिध्य केदारी यांच्यावर काळाने घाला घातला. घटनेनंतर अनेक राजकीय व्यक्तींनी भेट घेऊन सांत्वन केले. आर्थिक मदतीचे आश्वासन देणाºया शासनाकडून अद्याप काहीच मदत मिळाली नाही.- भरत सदाशिव केदारी>पर्यटनाच्या निमित्ताने वर्षातून एकदा एकत्रित येत असतो. अशाच प्रकारे गतवर्षी कोकण पर्यटनासाठी एकत्र जमलो. मिनी बस करून २६ जानेवारीच्या पहाटे गणपती पुळेला गेलो. तेथून रात्री जेवण करून कोल्हापूरकडे रवाना झालो. रात्री ११च्या सुमारास पंचगंगेच्या पुलावरून बस खाली कोसळली. अचानक ही दुर्घटना घडली. बेशुद्धावस्थेत रुग्णालयात होते.शुद्धीवर आले होते; परंतु दु:ख सहन करण्याची शक्ती उरली नव्हती. - मनीषा संतोष वरखडे