शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
4
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
5
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
6
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
7
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
8
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
9
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
10
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
11
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
12
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
13
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
14
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
15
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
16
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
17
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
18
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
19
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
20
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका

आम्ही वाचलो, पण आमची जिवाभावाची माणसं गेली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:44 IST

कोल्हापुरात मिनी बस नदीवरील पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात बालेवाडीतील केदारी कुटुंबीयांसह त्यांचे आप्तेष्ट व चालक असे १३ जण दगावले.

रहाटणी : कोल्हापुरात मिनी बस नदीवरील पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात बालेवाडीतील केदारी कुटुंबीयांसह त्यांचे आप्तेष्ट व चालक असे १३ जण दगावले. त्यातून तीन जण बचावले असून, अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेला २६ जानेवारीला एक वर्ष पूर्ण झाले. जखमींच्या भळभळत्या जखमा भरून आल्या असल्या, तरी मनावरील आघात अद्यापही कायम आहे. अपघातातून आम्ही वाचलो, पण जिवाभावाची माणसे गेली, हे शल्य मनाला बोचते आहे.पर्यटनासाठी कोकणात गेलेले केदारी, वरखडे व नांगरे कुटुंबीय २६ जानेवारीच्या रात्री कोल्हापूरला मुक्कामी निघाले. बसमध्ये चालकासह एकूण १६ जण होते. कोल्हापूरला जात असताना, त्यांची गाडी पंचगंगा नदीच्या पुलावरून खाली कोसळली. त्यातील १३ जणांचा अंत झाला.प्राजक्ता दिनेश नांगरे (वय १८), मनीषा संतोष वरखडे (वय ३८), मंदा भरत केदारी (वय ५४) या तिघी सुदैवाने या अपघातातून बचावल्या. जवळच्या, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींचा डोळ्यांसमोर मृत्यू झाला. या दु:खातून त्या अद्याप सावरल्या नाहीत. गौरी वरखडे (वय १६), ज्ञानेश्वरी वरखडे (वय १४), संतोष वरखडे (वय ४५), साहिल केदारी (वय १४), नीलम केदारी (वय २८), भावना केदारी (वय ३५), सचिन केदारी (वय ३४), संस्कृती केदारी (वय ८),श्रावणी केदारी (वय ११), सानिध्य केदारी (१० महिने), प्रतीक नांगरे (वय १४), छाया नांगरे (वय ४१) यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे या कुटुंबीयांच्या वारसांवर दु:खाचा डोंगर कोसळला. एकाच दिवशी निघालेल्या अंत्ययात्रेचे बालेवाडीतील हे दृश्य मन हेलावणारे होते. केवळ कुटुंबीयच नव्हे, तर राज्यातील जनतेच्या स्मृतिपटलावरून ही घटना अद्याप दूर झालेली नाही.> अपघातात मुलगी छाया नांगरे, जावई संतोष वरखेडे, मुलगा सचिन केदारी, सून नीलम केदारी, भावना केदारी यासह गौरी वरखेडे, ज्ञानेश्वरी वरखेडे, श्रावणी केदारी, संस्कृती केदारी, साहिल केदारी, प्रतीक नांगरे व सानिध्य केदारी यांच्यावर काळाने घाला घातला. घटनेनंतर अनेक राजकीय व्यक्तींनी भेट घेऊन सांत्वन केले. आर्थिक मदतीचे आश्वासन देणाºया शासनाकडून अद्याप काहीच मदत मिळाली नाही.- भरत सदाशिव केदारी>पर्यटनाच्या निमित्ताने वर्षातून एकदा एकत्रित येत असतो. अशाच प्रकारे गतवर्षी कोकण पर्यटनासाठी एकत्र जमलो. मिनी बस करून २६ जानेवारीच्या पहाटे गणपती पुळेला गेलो. तेथून रात्री जेवण करून कोल्हापूरकडे रवाना झालो. रात्री ११च्या सुमारास पंचगंगेच्या पुलावरून बस खाली कोसळली. अचानक ही दुर्घटना घडली. बेशुद्धावस्थेत रुग्णालयात होते.शुद्धीवर आले होते; परंतु दु:ख सहन करण्याची शक्ती उरली नव्हती. - मनीषा संतोष वरखडे