शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
4
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
5
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
6
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
9
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
10
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
11
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
12
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
13
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
14
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
15
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
16
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
17
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
18
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
19
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

गटारीचे पाणी पिणाऱ्या मनाेरुग्णाला पाहून अाम्ही हेलावलाे : डाॅ भरत वाटवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 18:25 IST

इनस्टीट्युट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थतर्फे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त आयोजित 'मानसिक आरोग्य आणि समाज' या विषयावरील परिसंवादाचे अायाेजन करण्यात अाले हाेते, यावेळी डाॅ. भरत वाटवानी यांनी अापले अनुभव कथन केले.

पुणे : एकदा पत्नी बरोबर एका ठिकाणी खायला गेलेलो असताना रस्त्यातील गटारीचे पाणी पिणाऱ्या मनोरुग्णाला पाहून आम्ही दोघेही हेलावलो. त्या मनोरुग्णाला घेऊन आमच्या छोट्या हाॅस्पीटलमध्ये घेऊन गेलो. त्यावेळी आम्ही दोघेच तिथे काम करत होतो. आम्हीच त्याला स्वच्छ केले,  स्वतःच्या हातांनी भरवले,  त्याच्यावर उपचार केले. तो तरूण बरा झाल्यानंतर तो आंध्र प्रदेशचा असल्याचे कळले. त्याच्या घरच्यांशी संपर्क केल्यावर त्याचे वडील त्याला घ्यायला आले. बीएसस्सी झालेला तो तरूण बरा होऊन स्वतःच्या घरी गेला, त्यावेळी जगातील सगळ्यात मोठे समाधान मला मिळाले. रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. भरत वाटवानी अापले अनुभव कथन करत हाेते. 

     इनस्टीट्युट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थतर्फे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त आयोजित 'मानसिक आरोग्य आणि समाज' या विषयावरील परिसंवादाचे अायाेजन करण्यात अाले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिष शेट्टी आणि ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्याशी मानसशास्त्रज्ञ डॉ. सुखदा चिमोटे यांनी संवाद साधला.    

    आजही आपल्या  समाजामध्ये मनोविकारांकडे सकारात्मकपणे पाहिले जात नाही. शारिरीक व्याधींप्रमाणे मानसिक आजाराकडे पाहण्याची गरज आहे. समाज हा एकाचवेळी वेगळ्या प्रकारच्या आणि वेगळ्या मानसिक पातळींवरच्या लोकांनी तयार झालेला असतो. शिवाय जीवनशैलीतील बदलाच्या वेगाचा समाजाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत समाजाने मनोरूग्णांना सकारात्मकतेने स्वीकारण्याची गरज असल्याचा सूर मनोविकार आणि मनोविकास क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर तज्ज्ञांच्या परिसंवादात उमटला.  

    वाटवानी म्हणाले, घरातले सगळे सोने विकून पाच खाटांचे छोटे हाॅस्पीटल सुरू केले. जीवनातील कोणत्याही प्रसंगात हार न मानता आपले काम करत राहण्याची चिकाटी मला स्वस्थ बसू देत नाही. हे काम करताना अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले आणि या सगळ्यात माझ्या डॉक्टर पत्नीने मला मोलाची साथ दिली. डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले की, समाज आणि आरोग्य यांच्यातील दरी सांधणारी संस्था सुरू करायची असे ठरवले. त्याकाळी आपल्याकडे मानसशास्त्र ही मर्यादित संकल्पना होती. त्यामुळे समाजाच्या अनेक स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. एकाच वाटेने न जाता, समाज जसा अनेक वाटांनी पुढे जात असतो,  त्याप्रमाणे मीही अनेक वाटांनी पुढे जात राहिलो. समाजात सौहार्दाचे पुल बांधणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. माझ्या शारिरीक व्यंगामुळे माझ्या शालेय जीवनात मी मैदानी खेळ खेळू शकलो नाही. अशा परिस्थितीत खचून न जाता आपल्या हातात असलेल्या गोष्टींच्या जोरावरही पुढे जाता येते, ही शिकवण आई-वडिलांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्याmental hospitalमनोरूग्णालय