शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

गटारीचे पाणी पिणाऱ्या मनाेरुग्णाला पाहून अाम्ही हेलावलाे : डाॅ भरत वाटवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 18:25 IST

इनस्टीट्युट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थतर्फे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त आयोजित 'मानसिक आरोग्य आणि समाज' या विषयावरील परिसंवादाचे अायाेजन करण्यात अाले हाेते, यावेळी डाॅ. भरत वाटवानी यांनी अापले अनुभव कथन केले.

पुणे : एकदा पत्नी बरोबर एका ठिकाणी खायला गेलेलो असताना रस्त्यातील गटारीचे पाणी पिणाऱ्या मनोरुग्णाला पाहून आम्ही दोघेही हेलावलो. त्या मनोरुग्णाला घेऊन आमच्या छोट्या हाॅस्पीटलमध्ये घेऊन गेलो. त्यावेळी आम्ही दोघेच तिथे काम करत होतो. आम्हीच त्याला स्वच्छ केले,  स्वतःच्या हातांनी भरवले,  त्याच्यावर उपचार केले. तो तरूण बरा झाल्यानंतर तो आंध्र प्रदेशचा असल्याचे कळले. त्याच्या घरच्यांशी संपर्क केल्यावर त्याचे वडील त्याला घ्यायला आले. बीएसस्सी झालेला तो तरूण बरा होऊन स्वतःच्या घरी गेला, त्यावेळी जगातील सगळ्यात मोठे समाधान मला मिळाले. रॅमन मॅगसेसे पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. भरत वाटवानी अापले अनुभव कथन करत हाेते. 

     इनस्टीट्युट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थतर्फे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त आयोजित 'मानसिक आरोग्य आणि समाज' या विषयावरील परिसंवादाचे अायाेजन करण्यात अाले हाेते, त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी मनोविकारतज्ज्ञ डॉ. हरिष शेट्टी आणि ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्याशी मानसशास्त्रज्ञ डॉ. सुखदा चिमोटे यांनी संवाद साधला.    

    आजही आपल्या  समाजामध्ये मनोविकारांकडे सकारात्मकपणे पाहिले जात नाही. शारिरीक व्याधींप्रमाणे मानसिक आजाराकडे पाहण्याची गरज आहे. समाज हा एकाचवेळी वेगळ्या प्रकारच्या आणि वेगळ्या मानसिक पातळींवरच्या लोकांनी तयार झालेला असतो. शिवाय जीवनशैलीतील बदलाच्या वेगाचा समाजाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होताना दिसतो आहे. अशा परिस्थितीत समाजाने मनोरूग्णांना सकारात्मकतेने स्वीकारण्याची गरज असल्याचा सूर मनोविकार आणि मनोविकास क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर तज्ज्ञांच्या परिसंवादात उमटला.  

    वाटवानी म्हणाले, घरातले सगळे सोने विकून पाच खाटांचे छोटे हाॅस्पीटल सुरू केले. जीवनातील कोणत्याही प्रसंगात हार न मानता आपले काम करत राहण्याची चिकाटी मला स्वस्थ बसू देत नाही. हे काम करताना अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागले आणि या सगळ्यात माझ्या डॉक्टर पत्नीने मला मोलाची साथ दिली. डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले की, समाज आणि आरोग्य यांच्यातील दरी सांधणारी संस्था सुरू करायची असे ठरवले. त्याकाळी आपल्याकडे मानसशास्त्र ही मर्यादित संकल्पना होती. त्यामुळे समाजाच्या अनेक स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. एकाच वाटेने न जाता, समाज जसा अनेक वाटांनी पुढे जात असतो,  त्याप्रमाणे मीही अनेक वाटांनी पुढे जात राहिलो. समाजात सौहार्दाचे पुल बांधणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. माझ्या शारिरीक व्यंगामुळे माझ्या शालेय जीवनात मी मैदानी खेळ खेळू शकलो नाही. अशा परिस्थितीत खचून न जाता आपल्या हातात असलेल्या गोष्टींच्या जोरावरही पुढे जाता येते, ही शिकवण आई-वडिलांनी दिली. 

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्याmental hospitalमनोरूग्णालय