शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

जरांगेंशी आपली भेट किंवा बोलणेही नाही, जबाबदार व्यक्तींनी केलेले पोरकट आरोप- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 10:58 IST

मार्केट यार्ड येथील एका कार्यालयात शरद पवार यांनी मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांची दिवसभर बैठक घेतली...

पुणे : यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेकांना मी पाहिले आहे, मात्र जबाबदार पदावरील व्यक्तीने असे पोरकट आरोप केलेले मी याआधी कधीही पाहिलेले नाही, अशा शब्दांमध्ये ‘जरांगे शरद पवार यांची स्क्रिप्ट बोलतात’ या आरोपाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. हे आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मार्केट यार्ड येथील एका कार्यालयात शरद पवार यांनी मंगळवारी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील कार्यकर्त्यांची दिवसभर बैठक घेतली. खासदार सुप्रिया सुळे याही त्यांच्यासमवेत होत्या. बैठका संपल्यानंतर सायंकाळी पत्रकारांबरोबर बोलताना पवार यांनी त्यांच्यावरील आरोपांना उत्तर दिले. ते म्हणाले, “जरांगे यांनी अगदी सुरुवातीला उपोषण केले, त्यावेळी त्यांची भेट घेणारा मी पहिलाच होते. त्याही वेळी मी त्यांना राज्याच्या सामाजिक ऐक्याला धक्का लागेल असे काही करू नका, हेच सांगितले होते. त्यानंतर त्यांची व माझी आजतागायत भेटही नाही व बोलणेही नाही.”

देशातील लोकांना पर्याय हवा आहे हे स्पष्ट दिसते आहे. अशा वेळी राजकीय पक्ष म्हणून आमची पर्याय देण्याची नैतिक जबाबदारी आहे, असे मला वाटते. तसे होताना दिसत आहे. प्रकाश आंबेडकर यांची आज सभा होती, त्यांची अडचण जेन्यूईन होती, त्यामुळे ते नव्हते, मात्र इंडिया फ्रंटचे जागावाटप व्यवस्थित होईल, असे पवार यांनी सांगितले. केजरीवाल यांना त्रास दिला जातो, हे सगळा देश पाहतो आहे, आमचा त्यांना पाठिंबा आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, सर्वोच्च न्यायालय त्यांच्या संदर्भात योग्य तो निर्णय देईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातून अनेक कार्यकर्ते आज आले होते. त्यांना त्रास दिल्याच्या, नोकरी घालवण्याच्या तक्रारी दिल्या जात आहेत, असे काहीही झालेले आढळले तर माझ्याकडे येऊन सांगा, असे मी त्यांना सांगितले. सुनेत्रा पवार बारामतीमधून उभ्या राहत असतील तर लोकशाहीत कोणालाही कुठूनही उभे राहण्याचा अधिकार आहे, इतकेच उत्तर देत पवार यांनी कौटुंबिक प्रश्न विचारू नका असे सांगितले.

कधी अडकून पडलो सांगा

तुम्हाला बारामतीत अडकून ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे का? यावर पवार यांनी मिस्कीलपणे सांगितले की, आतापर्यंत मी १४ निवडणुका लढवल्या, त्यातील ७ लोकसभेच्या होत्या. कधी अडकून पडलो तुम्हीच सांगा. मग आता काय अडकून पडणार? सरकारने मराठा आरक्षण दिले आहे, ते न्यायालयात टिकले तर आनंदच आहे, मात्र न्यायालयाच्या निर्णयाचा आतापर्यंतचा इतिहास तसा नाही, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण