शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

हम दोनो एकदम जुडवाँ.....पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी ‘सवाई’त उलगडले शिवहरीचे मैत्रीपर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 17:48 IST

ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पं. शिवकुमार शर्मा यांच्याशी ‘शिवहरी’च्या माध्यमातून जुळलेल्या मैत्रीबंधाचे अद्वितीय स्वरपर्व ‘सवाई’त उलगडले.

ठळक मुद्देलगता है हम दोनो एकही पेटसे बाहर आए है : हरिप्रसाद चौरसिया'धरती, आकाश, चंद्रमा, पहाडी यांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला काही महत्त्व नाही'

पुणे : आम्हाला स्वत: लाच कळत नाही ही कशाप्रकारची मैत्री आहे.. मात्र अशी मैत्री कधी पाहिली नाही ना कधी ऐकली...१९५४ पासून सुरू झालेली ही मैत्री कधी संपेल माहीत नाही.. जेव्हा कधी भेटतो तेव्हा भांडणालाच सुरूवात होते.. लगता है हम दोनो एकही पेटसे बाहर आए है, एकदम 'जुडवाँ'....अशा शब्दातं ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी गेल्या सहा दशकांहून अधिक काळ पं. शिवकुमार शर्मा यांच्याशी ‘शिवहरी’च्या माध्यमातून जुळलेल्या मैत्रीबंधाचे अद्वितीय स्वरपर्व उलगडले. पण...आता संगीत देणे बंद केले आहे. अनारकली, मुघले आझम चा काळ संपला. आता तसे विषय बनत नाहीत. त्यामुळे विश्रांती घेतली आहे..लोकांना जे करायच ते करून देत. चांगले विषय मिळाले तर परत सुरूवात करू, असे चौरसिया यांनी सांगितले. आमच्या मैत्रीचा प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय असाच आहे. ज्यावेळी मुंबईमध्ये आलो तेव्हा चित्रपटाशी आमचा दूरान्वये संबंध नव्हता. शास्त्रीय संगीताचा रियाज करणे आणि गुरू अन्नपूर्णा यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेणे इतकेच आम्ही करीत होतो. चित्रपटांचा विचार केला तर आम्हाला धक्के मारून बाहेर काढले जात होते..पण नंतर आमचे संगीत लोकांना आवडायला लागले. आम्ही ज्या पद्धतीने संगीताचा विचार करायचो उदा: ये कहा आ गये हम’ हे गाणे ऐकल्यानंतर यांना संगीत का करायला देऊ नये.जर्मन, फ्रेंच या व्यक्ती देखील माणसेच असतात, संगीत पण तसेच आहे. शास्त्रीय संगीताव्यतिरिक्त जे आधुनिक, व्यावसायिक आणि बॉलिवूड संगीत आहे ते लोकांच्या आत्म्यामध्ये  आहे. नेहमी लोक ही गाणी गुणगुणत असतात. मग का नाही  त्यांच्या हदयापर्यंत पोहोचून त्यांचा आशिर्वाद घेऊ, भगवानची कृपा झाली. नशीबानेही साथ दिली आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासमवेत काम केले. एक छान ट्यूनिंग आमच्यात जुळले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.शिवहरी यांचे संगीत पुन्हा ऐकायला मिळणार का? तर पंडितजींनी तत्काळ होकार दिला. थोडासा ब्रेक झाला आहे, झटपट पैसे मिळावे अशी लालच अनेकांना असते. आम्हाला पण आहे. पण काम करीत आहोत नव्या पिढीला काय देत आहोत, काय संदेश देत आहोत हे महत्वाचे आहे. आत्ताच्या चित्रपटात पिढीला साधे डायलॉग व्यवस्थित म्हणता येत नाहीत. इंग्रजीचा वापर वाढला आहे. फक्त त्यांना पैसे मिळवायचे आहेत्, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

संगीतात रिमिक्सचे ‘प्रदूषण’ रिमिक्सच्या जमान्यात झटपट प्रसिध्दीच्या मागे तरूण पिढी लागली आहे, एक काळ होता की संगीतासाठी साधना केली जायची मात्र आज ती साधनाच हरवली आहे, या प्रश्नाला पंडितजींनी दुजोरा दिला. आपण खूप आधुनिक आहोत, असे दाखविले जात आहे. संगीतात जशी घाणेरडी हवा आल्याने वातावरण प्रदूषित होते तसे आज काहीसे झाले आहे. मुलांचा मेंदू आणि विचार करण्याची क्षमता लुप्त तर होणार नाही ना? अशी भीती वाटते. मुलांना एकदा सांगितले की लक्षात यायचे पण आता त्यांच्या मेंदूत काहीच शिरत नाही. धरती, आकाश, चंद्रमा, पहाडी यांच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला काही महत्त्व नाही. 

टॅग्स :Puneपुणे