शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा

By राजू इनामदार | Updated: April 17, 2025 20:03 IST

रोहित पवार समर्थकांकडून अजित पवारांचं 'स्वागत', बॅनरमुळे चर्चेला उधाण

पुणे : “माझी ईडी चौकशी झाली, माझ्या कंपन्यांच्या चौकशा केल्या गेल्या. पण, आम्ही आमच्या जागेवर ठाम आहोत. आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू,” अशा शब्दांमध्ये आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या नावाने लागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतफलकाबाबत खुलासा केला. कर्जत नगरपंचायतीमधील (जि. अहिल्यानगर) सत्ताबदलावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. विधानसभेचे सभापती राम शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यात हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.उपमुख्यमंत्री पवार यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघात जाहीर कार्यक्रम होता. रोहित पवार तिथले आमदार आहेत. त्यांच्या नावाने उपमुख्यमंत्री पवार यांचे स्वागत करणारे फलक मतदारसंघात लावण्यात आले होते. रोहित यांनी सायंकाळी पुण्यात पत्रकार परिषदेत त्याचा खुलासा केला. ते उपमुख्यमंत्री आहेत, शिवाय माझे काका आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या नावाने स्वागताचे फलक लावले यात गैर काहीही नाही. याचा अर्थ मी लगेचच भूमिका बदलली असा होत नाही. कंपनीची, माझी चौकशी झाल्यानंतरही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, शरद पवार यांच्याबरोबरच आहे, मी पळून जाणाऱ्यातला नाही, असे ते म्हणाले.कर्जत पंचायतीबाबत ते म्हणाले, “हे सरकार कसे काम करीत आहे, सत्तेशिवाय त्यांना कसे काहीच दिसत नाही याचे उदाहरण कर्जत पंचायतीवरून दिसून येते. दोन वर्षांपूर्वी तिथे आमच्या विचाराच्या नगरसेवकांची सत्ता आली. भाजपचे दोनच नगरसेवक होते. तिथे अध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणला. अशा ठरावाच्या कार्यवाहीची विशिष्ट पद्धत आहे. कोणासमोर याची सुनावणी व्हावी हे निश्चित आहे; मात्र, सरकारच्या आशीर्वादाने ही पद्धतच बदलली गेली.” ‘विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पाठिंब्याने हे झाले,’ असा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यात लक्ष घातले होते, असे ते म्हणाले. पद्धतच बदलायची म्हणून त्यांनी विशेष अध्यादेश काढला, असे रोहित पवार म्हणाले.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाहीत यामागेही सरकारच आहे, सत्तेचे केंद्रीकरण व्हावे, लोकल बॉडी नसावी, असा सरकारचा विचार आहे. शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय आपले राजकारण पुढे जाणार नाही, हे भाजपच्या एका मोठ्या नेत्याला माहिती आहे. पण, त्यांना आपण फार सोज्वळ आहोत, विचारवंत आहोत, असे दाखवायचे असते. त्यामुळे त्यांनी काही जणांना पाळले आहे, ते भुंकतात. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये जात आहेत याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, अशा प्रवेशांमुळेच त्यांच्या मूळच्या लोकांना साधी मंत्रिपदे मिळाली आहेत. आशिष शेलार, गिरीश महाजन यांची उदाहरणे आहेत. त्यांनी एकदाच काय ते सर्वांना झाडुनपुसून घ्यावे, म्हणजे आम्हालाही नव्यांना संधी देता येईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.स्पर्धा परीक्षेचा निकाल व पुढची परीक्षा यात किमान ४५ ते ६० दिवसांचा कालावधी असावा, असे परीक्षार्थींचे म्हणणे होते. ते सरकारने ऐकून घेतले नाही. मुख्यमंत्री त्यांना भेटलेच नाहीत. मुले पवार साहेबांकडे गेली. साहेबांनी आयोगाला सांगितले. त्यांनी माहिती घेत, चर्चा करून मुलांचे म्हणणे मान्य केले. यात कोणाची कशाला हरकत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवार