शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा

By राजू इनामदार | Updated: April 17, 2025 20:03 IST

रोहित पवार समर्थकांकडून अजित पवारांचं 'स्वागत', बॅनरमुळे चर्चेला उधाण

पुणे : “माझी ईडी चौकशी झाली, माझ्या कंपन्यांच्या चौकशा केल्या गेल्या. पण, आम्ही आमच्या जागेवर ठाम आहोत. आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू,” अशा शब्दांमध्ये आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या नावाने लागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतफलकाबाबत खुलासा केला. कर्जत नगरपंचायतीमधील (जि. अहिल्यानगर) सत्ताबदलावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. विधानसभेचे सभापती राम शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यात हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.उपमुख्यमंत्री पवार यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघात जाहीर कार्यक्रम होता. रोहित पवार तिथले आमदार आहेत. त्यांच्या नावाने उपमुख्यमंत्री पवार यांचे स्वागत करणारे फलक मतदारसंघात लावण्यात आले होते. रोहित यांनी सायंकाळी पुण्यात पत्रकार परिषदेत त्याचा खुलासा केला. ते उपमुख्यमंत्री आहेत, शिवाय माझे काका आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या नावाने स्वागताचे फलक लावले यात गैर काहीही नाही. याचा अर्थ मी लगेचच भूमिका बदलली असा होत नाही. कंपनीची, माझी चौकशी झाल्यानंतरही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, शरद पवार यांच्याबरोबरच आहे, मी पळून जाणाऱ्यातला नाही, असे ते म्हणाले.कर्जत पंचायतीबाबत ते म्हणाले, “हे सरकार कसे काम करीत आहे, सत्तेशिवाय त्यांना कसे काहीच दिसत नाही याचे उदाहरण कर्जत पंचायतीवरून दिसून येते. दोन वर्षांपूर्वी तिथे आमच्या विचाराच्या नगरसेवकांची सत्ता आली. भाजपचे दोनच नगरसेवक होते. तिथे अध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणला. अशा ठरावाच्या कार्यवाहीची विशिष्ट पद्धत आहे. कोणासमोर याची सुनावणी व्हावी हे निश्चित आहे; मात्र, सरकारच्या आशीर्वादाने ही पद्धतच बदलली गेली.” ‘विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पाठिंब्याने हे झाले,’ असा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यात लक्ष घातले होते, असे ते म्हणाले. पद्धतच बदलायची म्हणून त्यांनी विशेष अध्यादेश काढला, असे रोहित पवार म्हणाले.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाहीत यामागेही सरकारच आहे, सत्तेचे केंद्रीकरण व्हावे, लोकल बॉडी नसावी, असा सरकारचा विचार आहे. शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय आपले राजकारण पुढे जाणार नाही, हे भाजपच्या एका मोठ्या नेत्याला माहिती आहे. पण, त्यांना आपण फार सोज्वळ आहोत, विचारवंत आहोत, असे दाखवायचे असते. त्यामुळे त्यांनी काही जणांना पाळले आहे, ते भुंकतात. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये जात आहेत याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, अशा प्रवेशांमुळेच त्यांच्या मूळच्या लोकांना साधी मंत्रिपदे मिळाली आहेत. आशिष शेलार, गिरीश महाजन यांची उदाहरणे आहेत. त्यांनी एकदाच काय ते सर्वांना झाडुनपुसून घ्यावे, म्हणजे आम्हालाही नव्यांना संधी देता येईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.स्पर्धा परीक्षेचा निकाल व पुढची परीक्षा यात किमान ४५ ते ६० दिवसांचा कालावधी असावा, असे परीक्षार्थींचे म्हणणे होते. ते सरकारने ऐकून घेतले नाही. मुख्यमंत्री त्यांना भेटलेच नाहीत. मुले पवार साहेबांकडे गेली. साहेबांनी आयोगाला सांगितले. त्यांनी माहिती घेत, चर्चा करून मुलांचे म्हणणे मान्य केले. यात कोणाची कशाला हरकत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवार