शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा

By राजू इनामदार | Updated: April 17, 2025 20:03 IST

रोहित पवार समर्थकांकडून अजित पवारांचं 'स्वागत', बॅनरमुळे चर्चेला उधाण

पुणे : “माझी ईडी चौकशी झाली, माझ्या कंपन्यांच्या चौकशा केल्या गेल्या. पण, आम्ही आमच्या जागेवर ठाम आहोत. आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू,” अशा शब्दांमध्ये आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या नावाने लागलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतफलकाबाबत खुलासा केला. कर्जत नगरपंचायतीमधील (जि. अहिल्यानगर) सत्ताबदलावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. विधानसभेचे सभापती राम शिंदे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यात हात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.उपमुख्यमंत्री पवार यांचा कर्जत-जामखेड मतदारसंघात जाहीर कार्यक्रम होता. रोहित पवार तिथले आमदार आहेत. त्यांच्या नावाने उपमुख्यमंत्री पवार यांचे स्वागत करणारे फलक मतदारसंघात लावण्यात आले होते. रोहित यांनी सायंकाळी पुण्यात पत्रकार परिषदेत त्याचा खुलासा केला. ते उपमुख्यमंत्री आहेत, शिवाय माझे काका आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या नावाने स्वागताचे फलक लावले यात गैर काहीही नाही. याचा अर्थ मी लगेचच भूमिका बदलली असा होत नाही. कंपनीची, माझी चौकशी झाल्यानंतरही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, शरद पवार यांच्याबरोबरच आहे, मी पळून जाणाऱ्यातला नाही, असे ते म्हणाले.कर्जत पंचायतीबाबत ते म्हणाले, “हे सरकार कसे काम करीत आहे, सत्तेशिवाय त्यांना कसे काहीच दिसत नाही याचे उदाहरण कर्जत पंचायतीवरून दिसून येते. दोन वर्षांपूर्वी तिथे आमच्या विचाराच्या नगरसेवकांची सत्ता आली. भाजपचे दोनच नगरसेवक होते. तिथे अध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास ठराव आणला. अशा ठरावाच्या कार्यवाहीची विशिष्ट पद्धत आहे. कोणासमोर याची सुनावणी व्हावी हे निश्चित आहे; मात्र, सरकारच्या आशीर्वादाने ही पद्धतच बदलली गेली.” ‘विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या पाठिंब्याने हे झाले,’ असा गंभीर आरोपही रोहित पवार यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही यात लक्ष घातले होते, असे ते म्हणाले. पद्धतच बदलायची म्हणून त्यांनी विशेष अध्यादेश काढला, असे रोहित पवार म्हणाले.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नाहीत यामागेही सरकारच आहे, सत्तेचे केंद्रीकरण व्हावे, लोकल बॉडी नसावी, असा सरकारचा विचार आहे. शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय आपले राजकारण पुढे जाणार नाही, हे भाजपच्या एका मोठ्या नेत्याला माहिती आहे. पण, त्यांना आपण फार सोज्वळ आहोत, विचारवंत आहोत, असे दाखवायचे असते. त्यामुळे त्यांनी काही जणांना पाळले आहे, ते भुंकतात. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये जात आहेत याकडे लक्ष वेधले असता पवार म्हणाले, अशा प्रवेशांमुळेच त्यांच्या मूळच्या लोकांना साधी मंत्रिपदे मिळाली आहेत. आशिष शेलार, गिरीश महाजन यांची उदाहरणे आहेत. त्यांनी एकदाच काय ते सर्वांना झाडुनपुसून घ्यावे, म्हणजे आम्हालाही नव्यांना संधी देता येईल, असे रोहित पवार यांनी सांगितले.स्पर्धा परीक्षेचा निकाल व पुढची परीक्षा यात किमान ४५ ते ६० दिवसांचा कालावधी असावा, असे परीक्षार्थींचे म्हणणे होते. ते सरकारने ऐकून घेतले नाही. मुख्यमंत्री त्यांना भेटलेच नाहीत. मुले पवार साहेबांकडे गेली. साहेबांनी आयोगाला सांगितले. त्यांनी माहिती घेत, चर्चा करून मुलांचे म्हणणे मान्य केले. यात कोणाची कशाला हरकत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवार