शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारचा पराभव करा, स्वामी अग्निवेश यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 14:15 IST

संसदीय राजकारणातून या सरकारचा पराभव करा असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी केले.

पुणे : सरकार, त्यांची धोरणे यावर टिका करणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जात आहे. सत्ताधाऱ्यांनी कितीही घाबरविण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणार नाही. याविरोधात संविधान मानणाऱ्या सर्वांनी एकत्र आले पाहिजे. संसदीय राजकारणातून या सरकारचा पराभव करा असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व सर्व भारतीय संविधान समर्थक परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने आयोजित "धार्मिक दहशतवाद व असहिष्णुता विरोधी" राज्यस्तरीय संकल्प परिषदेला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यावेळी बोलत होते. यासाठी अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्य सचिव मिलिंद देशमुख, माधव बागवे उपस्थित होते.

स्वामी अग्निवेश यांच्यावर यापूर्वी झालेले हल्ले लक्षात घेऊन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्वामी अग्निवेश म्हणाले, सत्तेत बसलेली शक्ती 'वसुधैव कुटुंबकम' च्या विरोधात काम करीत आहे. त्यांच्या विरोधात घंटी वाजली आहे. सर्व मनुष्य हा एकाच परिवाराचा भाग आहे.

जो धर्म माणसाला माणसाचा दर्जा देऊ शकत नाही, त्याला धर्म म्हणता येणार नाही. कुणाच्या अंगावर कोट्यवधी रूपयांचा कोट दिसतो तर गरिबांच्या अंगावर घालण्यासाठी सूत नाही. हा कोट कुणाच्या अंगावर होता, ते तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही असे अग्निवेश यांनी स्पष्ट केले. अंधश्रद्धेची गुलामी सर्वात घातक आहे, त्यामुळे त्यविरोधातील लढाई सर्वात महत्त्वाची असल्याचे अग्निवेश यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे