शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
2
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
3
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
4
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
5
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
7
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
8
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
9
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
10
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
11
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
12
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
13
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
14
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
15
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
16
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
17
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
18
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
19
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
20
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 

शहराची वाटचाल कंटेनरमुक्तीकडे

By admin | Updated: December 31, 2014 00:07 IST

ओला व सुका कचरा वेगळा करून मिळत नसल्याने महापालिकेचे अनेक बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत, यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील सर्व कंटेनर हलविले जाणार आहेत.

पुणे : ओला व सुका कचरा वेगळा करून मिळत नसल्याने महापालिकेचे अनेक बायोगॅस प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत, यावर मार्ग काढण्यासाठी शहरातील सर्व कंटेनर हलविले जाणार आहेत. त्याऐवजी पालिकेच्या घंटागाड्यांमधून व स्वच्छच्या माध्यमातून ओला व सुका कचरा गोळा केला जाणार आहे. त्याकरिता सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधील १२५० कंटेनर हलविण्याच्या दिशेने पावले उचलण्यास प्रशासनाने युद्धपातळीवर सुरुवात केली आहे.उरुळी देवाची येथे कचरा टाकण्यास तेथील ग्रामस्थांनी ३१ डिसेंबरची डेडलाइन दिली आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कचरा टाकू दिला जाणार नाही, असे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर शहरातला कचरा शहरातच जिरविण्याच्या दिशेने पावले उचलण्यास महापालिका प्रशासनाने सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील कंटेनर हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात दररोज तब्बल सोळाशे ते अठराशे टन घनकचरा तयार होतो. मात्र, त्यातील बहुतांश कचऱ्याचे वर्गीकरण झाले नसल्याने तो बायोगॅस प्रकल्पांसाठी वापरता येत नाही. शहरामध्ये २२ बायोगॅस प्रकल्प कार्यरत आहेत. मात्र, वर्गीकरण झालेला कचरा मिळत नसल्याने ते पूर्ण क्षमतेने चालू शकत नाहीत. घंटागाड्या तसेच स्वच्छ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ओला आणि सुका कचरा वेगळा जमा करण्याची योजना आखण्यात आली आहे. या पध्दतीने कचऱ्याचे वर्गीकरण झाल्यास कचऱ्याची ५० टक्के समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्यासाठी महापालिकेने एकूण १६० घंटागाड्या तैनात केल्या आहेत. विश्रामबागवाडा येथे अंमलबजावणीविश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय परिसरातील ४० कंटेनर हलवून त्याठिकाणी सुंदर रांगोळी सोमवारी काढण्यात होती. त्यानुसारच आता शहरातील सर्व १५ क्षेत्रीय कार्यालयांमधील कंटेनर हलविले जाणार आहेत. त्याचबरोबर कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी बकेटचे वाटप करणे, नागरिकांचे प्रबोधन करणे आदी मार्ग अवलंबले जाणार आहेत. (प्रतिनिधी)कचराप्रश्नावर अन्नधान्य व पालकमंत्री गिरीश बापट यांनी सकाळी ११ वाजता महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. उरूळी देवाची येथील नागरिकांनी ३१ डिसेंबरनंतर कचरा टाकण्यास मनाई केल्याच्या प्रश्नावर या बैठकीमध्ये मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या बैठकीत कचराप्रश्नावर काही मार्ग न निघाल्यास नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ग्रामस्थांकडून कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाड्या अडविण्याचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.सोसायट्यांमधील कचरा सोसायट्यांमध्येच जिरविण्यासाठी महापालिकेच्या वतीने सवलती देण्यात आल्या आहेत. त्याची कडक अंमलबजावणी यापुढील काळात केली जाणार आहे. स्वच्छ संस्थेमार्फत शहरातील ४० टक्के कचरा गोळा केला जातो आहे. आणखी जास्तीत जास्त प्रमाणात त्यांच्याकडून कचरा गोळा केला जाणार आहे. घंटागाड्यांची संख्या वाढविण्यासही प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा, याकरिता त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे.- दत्तात्रय धनकवडे, महापौर