शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

तुम्ही पीत असलेले पाणी दूषित तर नाही ना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:13 IST

पुणे : दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची संख्या खूप मोठी आहे. विशेषत: पावसाळ्यात पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण मोठे असते. दूषित ...

पुणे : दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांची संख्या खूप मोठी आहे. विशेषत: पावसाळ्यात पाण्यातून पसरणाऱ्या आजारांचे प्रमाण मोठे असते. दूषित पाण्यामुळे संसर्ग होऊन जुलाब, उलट्या, तीव्र पोटदुखी, असे त्रास उद्भवतात. विषाणूजन्य आजारांच्या प्रादुर्भावाची शक्यता वाढते. त्यामुळे पावसाळ्यात उकळून गार केलेले स्वच्छ आणि ताजे पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक ठरते.

पावसाळ्यात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार, तसेच दूषित पाण्यामुळे कावीळ, लेप्टोस्पायरोसिस, ग्रॅस्ट्रो, टायफॉइड अशा आजारांना आमंत्रण मिळते. पावसाळ्यात पाणीपुरी, भेळ, वडापाव, असे उघड्यावरील पदार्थ खाल्ल्याने पोट बिघडते, उलट्या होतात. उघड्यावरील पदार्थांसाठी वापरल्या जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे या समस्या उद्भवतात. त्यामुळे या दिवसांमध्ये उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळावे. दूषित पाण्यामधूनही अनेक आजार पसरतात. त्यामुळे ताजे आणि उकळलेले पाणी प्यावे. पावसात भिजल्याने त्वचा खूप काळ ओली राहते. त्यामुळे पुरळ येणे, त्वचेला खाज सुटणे, केस चिकट होणे, केस गळणे, असेही त्रास होतात.

दूषित पाण्याच्या सेवनामुळे अतिसार, जुलाब असा त्रास होत असल्यास रुग्णांना हलका आणि द्रवस्वरूपातील आहार देण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. आजारपणाच्या काळात तोंडाची चव जाते किंवा अन्नावरील वासनाही उडते. अशा वेळी रुग्णांना भाज्यांचे सूप, भाताची पेज, वरणावरील पाणी, असा आहार देणे लाभदायक ठरते. डाळिंबाचे दाणे खाल्ल्याने अन्नावरील वासना परत येण्यास मदत होते. संत्री, मोसंबी ही फळेही लाभदायक ठरतात.

----------------

पावसाळ्यात विषाणूजन्य आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती उत्तम राखणे आवश्यक असते. त्यामुळे आहार आणि व्यायामाची पथ्ये पाळणे आवश्यक असते. या हंगामात तेलकट, मसालेदार पदार्थ टाळावेत. हिरव्या पालेभाज्या, सलाद यांचा समावेश करावा. दररोज सकाळी अर्धा तास व्यायाम करावा. पावसामुळे घराबाहेर पडणे शक्य नसल्यास घरच्या घरी योगासने करावीत.

-डॉ. रवींद्र सबनीस, पोटविकारतज्ज्ञ

----------------------

पावसाळ्यात काय काळजी घ्यावी?

- पावसाळ्याच्या दिवसांमध्ये उकळून थंड केलेले, गाळलेले स्वच्छ पाणी प्यावे. पाणी उकळून प्यायल्याने त्यातील जंतू नष्ट होतात.

- घरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात पाणी जास्त काळ साठू देऊ नये; अन्यथा त्यामध्ये डासांची उत्पत्ती ठिकाणे वाढतात आणि डेंग्यू, मलेरिया, टायफॉइडसारख्या आजारांना आमंत्रण मिळते.

- आंघोळीच्या पाण्यात अँटिसेप्टिक लिक्विड घातल्यास दूषित पाण्यामुळे होणारे त्वचारोग टाळता येतात.

- उघड्यावरील पदार्थ तसेच अर्धवट शिजलेले पदार्थ खाणे टाळावे.