शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मेट्रो प्रकल्पात होणार पाण्याचा पुनर्वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: मेट्रोच्या सर्व स्थानकात, तसेच अन्य आस्थापनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या १०० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: मेट्रोच्या सर्व स्थानकात, तसेच अन्य आस्थापनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या १०० टक्के पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (डीआरडीई) या संस्थेकडून घेण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारावर मंगळवारी (दि. ५) महामेट्रोच्या कार्यालयात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, डीआरडीईच्या बायोडिझास्टर टेक्नॉलॉजीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ए. के. गोयल आणि त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते.

डॉ. दीक्षित म्हणाले, “महामेट्रोची पुण्यात ३१ स्थानके आहेत. त्याशिवाय अनेक आस्थापना आहेत. या सर्व ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या सर्व पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. डीआरडीईने त्यासाठी विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पात या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर झाला. त्यामुळे ते पुण्यातही वापरण्याचा निर्णय झाला. किमान ५ लाख नागरिकांकडून रोज महामेट्रोच्या स्थानकात पाणी वापरले जाईल, असा अंदाज घेऊन हा प्रकल्प उभारला जाईल.

त्यासाठी जमिनीखाली एका साठवूणक टाकीशिवाय वेगळी जागा लागणार नाही. यातून काही लाख लिटर पाण्याची रोजची बचत होणार आहे. तयार झालेले पाणी बागेसाठी झाडांना, वाहने, फरशी धुण्यासाठी वापरले जाणार आहे. ते पाणी पुन्हा प्रक्रियेसाठी उपलब्ध होईल. याच पद्धतीने पाण्याचे रिसायकलिंग होईल, असे डॉ. दीक्षित म्हणाले.

डॉ. गोयल यांनी सांगितले की, विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंच्या साह्याने हे पाणी वापरण्यायोग्य करण्यात येणार आहे. सर्व ठिकाणचे वापरलेले पाणी एका टाकीत जमा होईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. साधारण २४ तासांत ही प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर ते पाणी पुन्हा वापरता येईल. ‘डीआरडीई’चे हे तंत्रज्ञान आतापर्यंत विमानतळ, रेल्वेस्थानक आदी ठिकाणी वापरण्यात आले आहे.

सैन्याचा तळ, सियाचीन सारख्या उंच, दुर्गम ठिकाणी जिथे पाण्याची टंचाई असते तिथेही हे तंत्रज्ञान यशस्वीपणे राबवले असल्याचे डॉ. गोयल म्हणाले. “मेट्रोची बांधकामे सध्या सुरू आहेत. ती करतानाच पाणी पुनर्वापरासाठीची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी वेगळा खर्च होणार नाही, असे डॉ. दीक्षित यांनी सांगितले.