शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

पिंपरीच्या ओढ्याला ५ वर्षांनंतर आले पाणी, पाणीप्रश्न मिटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 03:27 IST

गेल्या पाच वर्षांत तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पिंपरी गावात गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोदार पावसामुळे पिंपरी गावाच्या ओढ्याला पूर आला आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाईशी सामना करीत असलेल्या पिंपरी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे.

भुलेश्वर : गेल्या पाच वर्षांत तीव्र पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या पिंपरी गावात गुरुवारी सायंकाळी झालेल्या जोदार पावसामुळे पिंपरी गावाच्या ओढ्याला पूर आला आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाईशी सामना करीत असलेल्या पिंपरी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे.पिंपरी गावच्या सरपंच मीना शेंडकर यांनी जलपूजन केले. पूर्वी नाझरे धरणावरून पिंपरी, पांडेश्वर, जवळार्जुन, नाझरे या चार गावांत मिळून नळ पाणीपुरवठा योजना करण्यात आली. काही वर्षे ही योजना सुरळीत चालली. मात्र, या योजनेला ग्रहण लागल्याने ही योजना बंद झाली.बाकीच्या गावांनी स्वतंत्र पाणी योजना केली. मात्र, पिंपरी गावाला आजही स्वतंत्र पाणी योजना नाही. यासाठी एक कोटी ५ लाख रुपये किमतीचा नवीन आराखडा तयार करून शासनाकडे पाठवला आहे. मात्र अजूनही ही योजना प्रलंबित आहे. यामुळे पिंपरी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. येथील सरपंच मीना शेंडकर, उपसरपंच विजय थेऊरकर व ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मिळावा व पिंपरी गावाला कायमस्वरूपी स्वतंत्र पाणी योजना करण्यात यावी या मागणीसाठी पुरंदर तालुका पंचायत समिती व तहसील कार्यालय यांच्यावर हंडामोर्चा नेऊनआंदोलन केले. मात्र याचा काहीही उपयोग झाला नाही. गुरुवारी रात्री पिंपरी गावामध्ये जोरदार पाऊस झाल्याने अनेक बंधारे भरले. यामुळे सध्या तरी पिंपरी गावचा पाणीटंचाईचा प्रश्न कमी होणार आहे. या बंधाºयातील जलपूजन पिंपरी गावच्या सरपंच मीना शेंडकर, उपसरपंच विजय थेऊरकर यांनी केले. या वेळी कृषिभूषण महादेव शेंडकर, दिलीप हंबीर, अशोक लिंबोरे, विठ्ठल शेंडकर, संपत शेंडकर, सुरेखा शेंडकर, शीतल चव्हाण, सुजाता थेऊरकर, संध्या चव्हाण, कल्पना शेंडकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी