शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

पाणी, वाहतुकीचा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा

By admin | Updated: June 24, 2014 23:05 IST

माझा मतदारसंघ हीच माझी ओळख आहे. या मतदारसंघामध्ये शिक्षण, आरोग्य आणि विजेचा तीव्र प्रश्न नाही; मात्र पाण्याचे मोठे संकट आहे.

पुणो : माझा मतदारसंघ हीच माझी ओळख आहे. या मतदारसंघामध्ये शिक्षण, आरोग्य आणि विजेचा तीव्र प्रश्न नाही; मात्र पाण्याचे मोठे संकट आहे. पाणी आणि वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मला जे करता येईल, ते सर्व करणार आहे. कारण, तोच प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा आहे, असे मत  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
सुळे यांनी आज लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या म्हणाल्या, ‘‘बारामतीमधील 19 गावांमध्ये पाण्याचे तीव्र संकट आहे. त्याला वेगवेगळी कारणो आहेत. मात्र, हे प्रश्न लवकर सुटले पाहिजेत. बारामतीमध्ये एमआयडीसी आल्यास पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल. पुण्यातील वाहतूक, कचरा, रुग्णालयातील कचरा यांचाही मोठा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. खडकवासल्याच्या पाणीसाठय़ानजीक लोकवस्ती वाढल्याने पाण्यामध्ये सांडपाणी मिसळत आहे. भविष्यात हा प्रश्न भयंकर रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
नागरिकांचा आमच्या सरकारवरच राग होता. त्याचबरोबर लोकांना या असंतोषाचा फायदा घेणारे नेतृत्व हवे होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. भाजपाने जेवढा पैसा खर्च केला, तेवढे बजेट आमच्याकडे नव्हते. माध्यमातील प्रसिद्धीवरून त्यांना मते मिळाली. आमची कामे लोकांपुढे मांडण्यात आम्ही कमी पडलो. माङो वडील शरद पवार हे सत्तेपेक्षा विरोधी पक्षात अधिक काळ होते. त्यामुळे आम्ही विरोधात बसून काम करू, असे सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये अरेरावी आहे, असा आरोप होतो. तो खरा असेल तर, नेत्यांनी बदलले पाहिजे. हा बदल घेऊन आम्ही नागरिकांशी कनेक्ट होऊ. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे असेल, असे सुळे म्हणाल्या.
मुलगी वाचवा अभियानातून मी राज्यात महिलांना संघटित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलींना राजकारणात येण्यास आणखी वेळ लागेल. कारण, सुरक्षा, करिअर, लग्न यानंतरच मुली राजकारणाचा विचार करतात, असे त्या म्हणाल्या.(प्रतिनिधी)
 
भाजपाने उत्तर द्यावे
केंद्र सरकारने रेल्वेची दरवाढ केली. मुंबईसह अनेक ठिकाणी सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडणारी नाही. सुषमा स्वराज विरोधी पक्षामध्ये होत्या तेव्हा ‘प्रणवदा, आकडों से पेट नही भरता’, असे म्हणाल्या होत्या. आम्हालाही आज भाजपाला हाच प्रश्न विचारायचा आहे. भाडेवाढीसाठी आम्ही जी कारणो देत होतो, तीच आज भाजपा देत आहे, अशी टीका सुळे यांनी केली.
 
काँग्रेसला टोला
 काँग्रेस-राष्ट्रवादीतील वाद विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पूरक नाही. त्याला दोन्ही पक्षांतील नेते खतपाणी घालत आहेत. त्यामुळे नेत्यांनी आपल्या तोंडाला पट्टी लावून घेण्याची गरज आहे. राष्ट्रवादीमध्ये कोणताही वाद नाही, मुख्यमंत्र्यांचे पाय ओढण्याचे काम त्यांच्या पक्षातून होत आहे, असा टोला सुळे यांनी लगावला.
 
फुरसुंगीने महापालिकेत यावे
कचरा डेपोचा प्रश्न सोडविण्यासाठी अन्य चार ठिकाणो निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील दोन जागांचा ताबा मिळाला आहे. फुरसुंगी गावाचा प्रश्न सुटण्यासाठी त्याचा महापालिकेत समावेश होण्याची गरज आहे.
 
खासगी जीवन सर्वासारखेच
नोकरी किंवा शेती करणारी महिला यांना खूप कष्ट आहेत. त्यामुळे मी माझी जबाबदारी फार मोठी मानत नाही, असे सुळे म्हणाल्या.