शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

साेमवारपासून पूर्व भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 20:37 IST

दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद होता. साेमवारपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे : दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद होता.मात्र,पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून रविवारी कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे सोमवारपासून (दि.1)शहराच्या पूर्व भागातील नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठा होईल,असा दावा पालिकेच्या पाणी-पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु, काही भागात कमीदाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने अनेकांना सलग तिस-या दिवशी पाणी मिळणार नाही,असा अंदाज जाणकारांकडून वर्तविला जात आहे.

    खडकवासल्यापासून इंदापूरपर्यंत जाणारा कालवा दांडेकर पुलाजवळ फुटल्याने खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी पूर्णपणे बंद करावे लागले. मात्र,कालव्यातून लष्कर जलशुध्दीकरण केंद्रासाठी वर्षभर पाणी पुरवठा केला जातो.कालवा बंद झाल्याने लष्कर जलशुध्दीकरण केंद्रासाठी केला जाणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाला.त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोंढवा, मुंढवा, हडपसर, महमदवाडी, काळेपडळ,येरवडा, कोरेगावपार्क ,विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगावशेरी, चंदनगर, नगररस्ता, विमाननगर आदी भागातील पाणी पुरवठा बंद आहे.त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

   पुणेकर क्षमतेपेक्षा जास्त पाणी वापरत असल्याची टिका जलसंपदा विभागाकडून नेहमीच केली जाते.त्यात सलग दोन दिवस अनेकांच्या घरातील नळाला पाणीच आले नाही. घरात भांड्यांमध्ये व टाकीमध्ये भरून ठेवलेले पाणी दोन दिवसाच्या वापरानंतर पूर्णपणे संपले.परिणामी काही गृह निर्माण सोसायट्यांनी पाण्याचे टँकर मागवले.त्यासाठी हवी ती किंमत मोजली.तर काही नागरिकांनी कॅनॉलमध्ये साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी कॅनॉलवर गर्दी केली.खडकवासला धरण ते पर्वती जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यान बंद पाईप लाईन आहे.या पाईप लाईनमधून पर्वती केंद्रात आवश्यक पाणी पुरवठा गेला जातो.कालव्यातील पाणी बंद असल्यामुळे शनिवारी लष्कर येथील जलशुध्दीकरण केंद्राला पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून कालव्यामधूनच पाणी सोडण्यात आले.

     मात्र,गणेश विसर्जनानंतर कालव्यात अडथळे निर्माण झाले आहेत.कालव्यात काही ठिकाणी घाण साचली आहे.त्यामुळे पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून सोडलेले पाणी लष्कर जलशुध्दीकरण केंद्राकडे न जाता उलट दिशेने वाहू लागले.परिणामी ज्या ठिकाणाहून कालवा फुटला येथून पुन्हा एकदा पाणी वाहून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.परंतु,काही कालावधीतच पर्वती केंद्रातून सोडलेले पाणी बंद करण्यात आले.परंतु,रविवारी पुन्हा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

-------------------------पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून लष्कर भागासाठी कॅनॉलद्वारे पाणी सोडले आहे.त्यामुळे सोमवारपासून पूर्व भागातील पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू होईल.- प्रविण गेडाम,अधिक्षक अभियंता,पाणी-पुरवठा विभाग,पुणे महापालिका  

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या