शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

साेमवारपासून पूर्व भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 20:37 IST

दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद होता. साेमवारपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे : दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद होता.मात्र,पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून रविवारी कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे सोमवारपासून (दि.1)शहराच्या पूर्व भागातील नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठा होईल,असा दावा पालिकेच्या पाणी-पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु, काही भागात कमीदाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने अनेकांना सलग तिस-या दिवशी पाणी मिळणार नाही,असा अंदाज जाणकारांकडून वर्तविला जात आहे.

    खडकवासल्यापासून इंदापूरपर्यंत जाणारा कालवा दांडेकर पुलाजवळ फुटल्याने खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी पूर्णपणे बंद करावे लागले. मात्र,कालव्यातून लष्कर जलशुध्दीकरण केंद्रासाठी वर्षभर पाणी पुरवठा केला जातो.कालवा बंद झाल्याने लष्कर जलशुध्दीकरण केंद्रासाठी केला जाणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाला.त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोंढवा, मुंढवा, हडपसर, महमदवाडी, काळेपडळ,येरवडा, कोरेगावपार्क ,विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगावशेरी, चंदनगर, नगररस्ता, विमाननगर आदी भागातील पाणी पुरवठा बंद आहे.त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

   पुणेकर क्षमतेपेक्षा जास्त पाणी वापरत असल्याची टिका जलसंपदा विभागाकडून नेहमीच केली जाते.त्यात सलग दोन दिवस अनेकांच्या घरातील नळाला पाणीच आले नाही. घरात भांड्यांमध्ये व टाकीमध्ये भरून ठेवलेले पाणी दोन दिवसाच्या वापरानंतर पूर्णपणे संपले.परिणामी काही गृह निर्माण सोसायट्यांनी पाण्याचे टँकर मागवले.त्यासाठी हवी ती किंमत मोजली.तर काही नागरिकांनी कॅनॉलमध्ये साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी कॅनॉलवर गर्दी केली.खडकवासला धरण ते पर्वती जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यान बंद पाईप लाईन आहे.या पाईप लाईनमधून पर्वती केंद्रात आवश्यक पाणी पुरवठा गेला जातो.कालव्यातील पाणी बंद असल्यामुळे शनिवारी लष्कर येथील जलशुध्दीकरण केंद्राला पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून कालव्यामधूनच पाणी सोडण्यात आले.

     मात्र,गणेश विसर्जनानंतर कालव्यात अडथळे निर्माण झाले आहेत.कालव्यात काही ठिकाणी घाण साचली आहे.त्यामुळे पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून सोडलेले पाणी लष्कर जलशुध्दीकरण केंद्राकडे न जाता उलट दिशेने वाहू लागले.परिणामी ज्या ठिकाणाहून कालवा फुटला येथून पुन्हा एकदा पाणी वाहून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.परंतु,काही कालावधीतच पर्वती केंद्रातून सोडलेले पाणी बंद करण्यात आले.परंतु,रविवारी पुन्हा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

-------------------------पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून लष्कर भागासाठी कॅनॉलद्वारे पाणी सोडले आहे.त्यामुळे सोमवारपासून पूर्व भागातील पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू होईल.- प्रविण गेडाम,अधिक्षक अभियंता,पाणी-पुरवठा विभाग,पुणे महापालिका  

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या