शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

साेमवारपासून पूर्व भागातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 20:37 IST

दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद होता. साेमवारपासून या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे : दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्यामुळे शहराच्या पूर्व भागातील पाणी पुरवठा गेल्या दोन दिवसांपासून बंद होता.मात्र,पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून रविवारी कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे.त्यामुळे सोमवारपासून (दि.1)शहराच्या पूर्व भागातील नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठा होईल,असा दावा पालिकेच्या पाणी-पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. परंतु, काही भागात कमीदाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने अनेकांना सलग तिस-या दिवशी पाणी मिळणार नाही,असा अंदाज जाणकारांकडून वर्तविला जात आहे.

    खडकवासल्यापासून इंदापूरपर्यंत जाणारा कालवा दांडेकर पुलाजवळ फुटल्याने खडकवासला धरणातून कालव्यात सोडण्यात आलेले पाणी पूर्णपणे बंद करावे लागले. मात्र,कालव्यातून लष्कर जलशुध्दीकरण केंद्रासाठी वर्षभर पाणी पुरवठा केला जातो.कालवा बंद झाल्याने लष्कर जलशुध्दीकरण केंद्रासाठी केला जाणारा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झाला.त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोंढवा, मुंढवा, हडपसर, महमदवाडी, काळेपडळ,येरवडा, कोरेगावपार्क ,विश्रांतवाडी, टिंगरेनगर, खराडी, वडगावशेरी, चंदनगर, नगररस्ता, विमाननगर आदी भागातील पाणी पुरवठा बंद आहे.त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

   पुणेकर क्षमतेपेक्षा जास्त पाणी वापरत असल्याची टिका जलसंपदा विभागाकडून नेहमीच केली जाते.त्यात सलग दोन दिवस अनेकांच्या घरातील नळाला पाणीच आले नाही. घरात भांड्यांमध्ये व टाकीमध्ये भरून ठेवलेले पाणी दोन दिवसाच्या वापरानंतर पूर्णपणे संपले.परिणामी काही गृह निर्माण सोसायट्यांनी पाण्याचे टँकर मागवले.त्यासाठी हवी ती किंमत मोजली.तर काही नागरिकांनी कॅनॉलमध्ये साचलेल्या पाण्यात कपडे धुण्यासाठी कॅनॉलवर गर्दी केली.खडकवासला धरण ते पर्वती जलशुध्दीकरण केंद्र या दरम्यान बंद पाईप लाईन आहे.या पाईप लाईनमधून पर्वती केंद्रात आवश्यक पाणी पुरवठा गेला जातो.कालव्यातील पाणी बंद असल्यामुळे शनिवारी लष्कर येथील जलशुध्दीकरण केंद्राला पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून कालव्यामधूनच पाणी सोडण्यात आले.

     मात्र,गणेश विसर्जनानंतर कालव्यात अडथळे निर्माण झाले आहेत.कालव्यात काही ठिकाणी घाण साचली आहे.त्यामुळे पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून सोडलेले पाणी लष्कर जलशुध्दीकरण केंद्राकडे न जाता उलट दिशेने वाहू लागले.परिणामी ज्या ठिकाणाहून कालवा फुटला येथून पुन्हा एकदा पाणी वाहून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.परंतु,काही कालावधीतच पर्वती केंद्रातून सोडलेले पाणी बंद करण्यात आले.परंतु,रविवारी पुन्हा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे.

-------------------------पर्वती जलशुध्दीकरण केंद्रातून लष्कर भागासाठी कॅनॉलद्वारे पाणी सोडले आहे.त्यामुळे सोमवारपासून पूर्व भागातील पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू होईल.- प्रविण गेडाम,अधिक्षक अभियंता,पाणी-पुरवठा विभाग,पुणे महापालिका  

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाnewsबातम्या