शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

पुरंदर उपसा योजनेच्या पंपांना पाणीच पुरेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 23:13 IST

पाणी मागणीत वाढ : मात्र वेळेवर मिळेना, पिके जळाली

भुलेश्वर : पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पंपांना पाणी पुरत नसल्याने नाईलाजास्तव ही योजना वारंवार बंद करावी लागते. यामुळे पाण्याची मागणी वाढवूनदेखील वेळेवर पाणी मिळत नाही. यामुळे पिके जळाली आहेत. पंपांना लेवल येऊन ही योजना सोळा तासांनंतर सुरू झाली.

पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे तीन पंप सुरू झाल्यानंतर पुरंदर तालुक्यातील १४४५०, दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सध्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे उन्हाळी हंगामातील पाणी सुरू आहे. राज्यातील अनेक पाणीपुरवठा योजना वीजबिलाच्या थकबाकीमुळे अडचणीत आल्या आहेत. यामुळे राज्य शासन उपसा सिंचन एकूण वीजबिलाच्या ८१% भार सोसत असून, लाभार्थी शेतकऱ्यांनी १९% रक्कम भरून पाणी घेत आहे. यामुळे यंदा पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे.मुळा-मुठा नदीवर ढापे बसवणे गरजेचे४पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याची नदीवरील लेवल व्यवस्थित टिकवायची असेल तर आॅक्टोबर महिन्यात मुळा-मुठा नदीवर ढापे बसवणे गरजेचे आहे. यामुळे पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात साठवण्यात मदत झाली असती. मात्र पाणी साठवण्याचे काम उशिरा करण्यात आले. यामुळे तिसºया पंपाला मुहूर्त साधता आला नाही. यंदा दोन पंपांद्वारे पाणी देण्यात आले.४यंदा मार्च महिनाअखेरीस दोन पंपही चालणे मुश्कील झाले. पाण्याची लेवल वारंवार कमी होत असल्याने एक पंप बंद करण्यात आला, तर एकच सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी पाणी लेवल एकदम कमी झाल्याने ही योजना बंद करण्यात आली.४माळशिरस वितरिका, राजेवाडी वितरिका व दिवे वितरिकेला पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र एका पंपालादेखील पाणी पुरेल एवढाही पाणीपुरवठा नदीतून साठवण होत नाही. त्यानंतर काही तासांतच नदीवरील पाण्याची लेवल कमी झाल्याने चालू असणारा दुसरा पंपही बंद करण्यात आला. यामुळे पाणी लेवल कमी झाल्याने ही योजना बंद करण्यात आली.४पाण्याची मागणी भरमसाट वाढली असताना योजना बंद होत असल्याने पाणीवाटप करायचे कसे, हा प्रश्न अधिकारीवर्गाला पडला आहे. सोळा तासांनंतर नदीवरील पाण्याची लेवल जागेवरती आल्यानंतर ही योजना नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आली आणि शेतकऱ्यांच्या चेहºयावर हास्य फुलले.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणी