टाकळीला पाणीपुरवठा योजना रखडली

By Admin | Updated: May 29, 2014 04:55 IST2014-05-29T04:55:20+5:302014-05-29T04:55:20+5:30

टाकळी (ता. दौंड) येथील पाणीपुरवठा योजना रखडल्याने ग्रामस्थांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. लाखो रुपये खर्च करून या योजनेचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात झाले

Water Supply Scheme for Talwari | टाकळीला पाणीपुरवठा योजना रखडली

टाकळीला पाणीपुरवठा योजना रखडली

राहू : टाकळी (ता. दौंड) येथील पाणीपुरवठा योजना रखडल्याने ग्रामस्थांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. लाखो रुपये खर्च करून या योजनेचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात झाले. मात्र, तीन वर्षांपासून ही योजना रखडली आहे. ही योजना नेमकी का रखडी याचा उलगडा ग्रामस्थांना होत नाही. मात्र ठेकेदाराने एकुण रकमेच्या ३० टक्के रक्कम घेऊन फक्त नावापुरते काम सुरु केले. जे काही काम केले ते ही निकृष्टदर्जाचे आहे. असे ही बोलले जात आहे. या योजनेच्या आराखडयात जलशुध्दीकरण यंत्रासह नळ जोड असे स्वरुप आहे. परंतु पाणी पुरवठा समितीने फक्त काही ठिकाणी पाईप जमीनीत रोवले आहेत. आणि ते ही निकृष्ट दर्जाचे आहे. तेव्हा ग्रामपंचायत ही योजना केव्हा पुर्ण करणार आणि ग्रामस्थांना कधी पाणी मिळणार असे ग्रामस्थातुन बोलले जात आहे. याबाबत पंचायत समितीचे पाणी पुरवठा अधिकारी ए.ए. कोकरे म्हणाले की टाकळी गाव हे हगणदारी मुक्त गाव नसल्याने त्यांना पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी उर्वरीत रक्कम देणे शासनाच्या परिप्रत्रका नुसार अडचणीचे आहे. त्यामुळे योजना रखडली आहे. परंतु ग्रामपंचायतीने दप्तरी पुर्तता केल्यास व गाव हगणदारमुक्त असल्याची अट शिथील केल्यानंतर ही योजना पुर्ण करणे शक्य आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. पाणी पुरवठाय् योजना रखडल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.(वार्ताहर)

Web Title: Water Supply Scheme for Talwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.