शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

राजगुरुनगरला होणारा पाणीपुरवठा पिण्यास अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : संपूर्ण राजगुरुनगरला पाणी पुरवणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्यातील पाण्याचे नमुने गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजगुरुनगर : संपूर्ण राजगुरुनगरला पाणी पुरवणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्यातील पाण्याचे नमुने गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवेच्या आरोग्य प्रयोगशाळेने तपासण्यासाठी घेतले होते. हा अहवाल नगरपरिषदेला प्राप्त झाला असून, हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल या संस्थेने दिला आहे. यामुळे राजगुरुनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणी पिण्यास योग्य नसल्याने पैसे मोजून शुद्ध पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवेच्या आरोग्य प्रयोगशाळेतर्फे ६ एप्रिलला राजगुरुनगर शहरातील विविध अशा वीस विभागांमधून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. बहुतांश ठिकाणच्या नमुन्यासाठी घेतलेल्या पाण्यातील संभाव्य सूक्ष्मजंतूंची टक्केवारीपैकी कोलिफॉर्म्सचे प्रमाण सर्व भागांमधील नमुन्यात १६ टक्केपेक्षा जास्त असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे थर्मोटॉलरंट कोलिफॉर्म्सचे प्रमाण अरिहंत रेसिडेन्सी, सुलोचना हाईट्स या दोन ठिकाणी ३ टक्केइतके आहे.. नेहरू चौक, वाडा रोड, समतानगर या तीन ठिकाणी ६ टक्के तर केदारेश्वर पाण्याची टाकी या ठिकाणी ९ टक्के असल्याचे आढळून आले आहे. इतर ठिकाणी ते प्रमाण शून्य टक्के आहे. तसेच ई. कोलायचे प्रमाण वाडा रोड पाण्याची टाकी येथे ६ टक्के, तर केदारेश्वर पाण्याची टाकी या ठिकाणी ९ टक्के असल्याचे आढळून आले आहे. इतर ठिकाणी ते प्रमाण शून्य टक्के आहे. तरी या पिण्यास अयोग्य असणाऱ्या पाण्यावर योग्य प्रमाणात क्लोरीनची प्रक्रिया केल्यानंतर व सूक्ष्मजीवीय पुनर्तपासणीनंतर पिण्यास योग्य असल्याची खात्री झाल्यानंतरच ते पाणी पिण्यासाठी नागरिकांना वापरता येईल, असे या अहवालात नमूद केले आहे.

चौकट

राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ व दुर्गंधीयुक्त पाणी झाले आहे. जलपर्णीही वाढू लागल्याने पाणी पिण्यास अयोग्य झाले होऊन शहरातील सांडपाणी भीमा नदीत सोडले जाते. तसेच ओढ्यानाल्यांना सोडलेले पाणी नदीत येऊन मिसळत आहे. त्यामुळे काही वर्षांपासून सिद्धेश्वर बंधाऱ्यातल्या नदीच्या पाण्यात जलपर्णी वाढते. तसेच गेली काही वर्षे शेवाळ्यासारख्या पाणवनस्पतीचा तवंगही येत आहे. मात्र पाणी वाहते राहत असल्याने, केदारेश्वर बंधाऱ्यात या दोन्ही वनस्पती राहत नाही. मात्र सध्या केदारेश्वर बंधाऱ्यात पाण्याखाली 'हायाड्रिला' नावाच्या पाणवनस्पतीचा थर साचला आहे.

फोटो ओळ: भीमा नदीत जलपर्णी वाढून शेवाळ साचले आहे. त्यामुळे नदीचे पाणी पिण्यास अयोग्य ठरत आहे.