शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

पाणीवापरावर पुन्हा घसरले जलसंपदामंत्री, काटकसरीचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 04:24 IST

माणशी १५५ लिटर पाणी योग्य आहे. पुणेकरांना मात्र माणशी ३३५ लिटर पाणी मिळते. महापालिकेला ११.५० टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी आहे; प्रत्यक्षात मात्र १७.५० टीएमसी पाणी घेतले जाते, अशी टीका करीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा पुणेकरांना पाण्यावरून टोकले.

पुणे - माणशी १५५ लिटर पाणी योग्य आहे. पुणेकरांना मात्र माणशी ३३५ लिटर पाणी मिळते. महापालिकेला ११.५० टीएमसी पाणी उचलण्यास मंजुरी आहे; प्रत्यक्षात मात्र १७.५० टीएमसी पाणी घेतले जाते, अशी टीका करीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा पुणेकरांना पाण्यावरून टोकले.भविष्यात पाण्यावरून युद्धे होणार आहेत; त्यामुळे आतापासूनच पाणी जपून वापरा, असा सल्लाही त्यांनी दिला. महापालिकेने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात उभारलेल्या ५०० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण महाजन यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थानिक नगरसेवक शंकर पवार, अनिता कदम तसेच अन्य नगरसेवक, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली आदी या वेळी उपस्थित होते.वॉटर आॅडिट करण्याची गरजही महाजन यांनी या वेळी व्यक्त केली. शुद्ध पाणी देणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. त्यामुळे हे जलशुद्धीकरण केंद्र पुणेकरांची शुद्ध पाण्याची गरज भागविणार, हे चांगलेच आहे. मात्र, त्याचबरोबर पाणी वाचविण्यासाठीचे सर्व उपायही महापालिकेने करावेत, अशी अपेक्षा महाजन यांनी व्यक्त केली.महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिकेच्या विविध योजनांचा आढावा घेतला. पुणेकरांना व्यवस्थित पाणी मिळवून देऊ, हे आश्वासन या केंद्राच्या माध्यमातून पूर्ण करीत आहोत; २४ तास पाणी मिळण्याच्या योजनेचाच हा एक भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.केंद्राच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे महापालिका, महावितरण तसेच अन्य खात्यांतील अधिकाऱ्यांचा या वेळी महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हरीश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. धेंडे यांनी आभार मानलेबेसुमार वापर थांबवायला हवापुणेकरांनी पाणी जपून वापरावे. बोगदा करून त्यातून खडकवासला ते पर्वती पाणी आणले, तर किमान ३ टीएमसी पाण्याची बचत होईल. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पिण्यासाठी, शेतीसाठी व मग उद्योगांसाठी, असा पाण्याचा प्राधान्यक्रम आहे. त्याप्रमाणे निर्णय घेतला तर शेतकरी नाराज होतात. त्यातून संघर्ष उभा राहतो. सुदैवाने मागील वर्षी पाऊस चांगला झाला; त्यामुळे सध्या तरी स्थिती चांगली आहे. मात्र, पाण्याचा बेसुमार वापर थांबायला हवा. - गिरीश महाजन, जलसंपदामंत्रींमहापौर नाशिकच्या!महाजन यांनी बोलताना मुक्ता टिळक यांचा ‘नाशिकच्या महापौर’, तर त्यानंतर काही वेळाने सौरभ राव यांचा ‘नागपूरचे आयुक्त’ असा उल्लेख केला. दोन्ही वेळा प्रेक्षागृहात हशा झाला. दुसºया वेळी ‘पुणे-पुणे’ असे सांगत व्यासपीठावरील काहींनी दुरुस्ती केली. महाजन यांनी त्यावर ‘मी नाशिकचा पालकमंत्री असल्यामुळे नाशिकचे नाव येते व राव काही वर्षांपूर्वी नागपूरला होते; त्यामुळे त्यांचा तसा उल्लेख झाला,’ असे स्पष्ट केले.खासदार शिरोळे यांनी, ‘पुणे महापालिकेची अनेक कामे जलसंपदाकडे आहेत. ती त्यांना मंजूर करावीत,’ अशी मागणी केली. आमदार मिसाळ यांनी, ‘पुणेकरांच्या पाण्यावर ते जास्त पाणी वापरतात म्हणून टीका होते; मात्र पाण्याची गळती किती तरी जास्त प्रमाणात होते व प्रत्यक्षात पुणेकरांना अपेक्षित पाणी मिळतच नाही,’ असे सांगितले. भिमाले यांनी नदीकाठसंवर्धन तसेच महापालिकेच्या अन्य काही योजनांसाठी जलसंपदाचे ना हरकत प्रमाणपत्र हवे आहे, ते महाजन यांनी मिळवून द्यावे, अशी मागणी केली.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई