शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

उजनीतून भीमा नदीत सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 01:17 IST

८१०० क्युसेक्सने विसर्ग : एकूण १० दरवाजे उघडले, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

इंदापूर : उजनी धरणातून भीमानदीला संक्रांतीच्या मुहर्तावर मंगळवारपासून ८१०० क्युसेक्सने भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. यामुळे पंढरपूर व सोलापूर शहरासाठी व नदीकाठच्या गावांसाठी पाणी सोडल्याचे उजनी धरण व्यवस्थापन उपविभाग भीमानगर यांनी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वीजनिर्मितीसाठी सोमवारी सायंकाळी ८ वाजल्यापासून १६०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते, तर नदीला मंगळवारी सकाळी ८ वाजता ६५०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे, असे एकूण ८१०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.

औज बंधाऱ्याची व पंढरपूरच्या बंधाºयाची पाणीपातळी कमालीची खालावली असून रब्बी हंगाम पण सुरू असल्याने सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना व सोलापूर शहराला पिण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पाणी सोडण्याचे प्रशासनाने चार दिवसापूर्वीच जाहीर केले होते. त्यादृष्टीने उजनी धरण व्यवस्थापन विभागाने मंगळवारी मकरसंक्रांतीच्या महूर्तावर पाणी सोडले आहे. असे असले तरी धरणाची पाणीपातळी कमालीची कमी झालेली दिसून येते. गेल्या वर्षी १५ जानेवारीला एकूण १०२ टक्के धरणात पाणी होते. आज रोजी धरणात ३९.७३ टक्केएवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे येणाºया काळात सोलापूर जिल्ह्यातील शेती पुढे मोठे संकट येऊन ठेपले आहे. त्यामुळे सोलापूरसह पुणे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.सध्या उजनी धरणामध्ये एकूण पाणीपातळी ४९३.७२० मीटर आहे, तर एकूण पाणीसाठा २४०५.६३ दलघमी आहे. त्यामध्ये उपयुक्त पाणीसाठा ६०२.८२ दलघमी असून त्याची टक्केवारी ३९.७३ टक्के आहे. उजनीमध्ये सध्या एकूण ८४.९४ टीएमसी पाणी असून त्यामध्ये केवळ २१.२९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणी