शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांकडून पाण्याचे राजकारण - रघुनाथदादा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 04:47 IST

 बऱ्यापैकी पाऊस होऊनदेखील राज्याच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवतो. दरवेळी काही जिल्ह्यांमध्ये पाणी नाही, अशी ओरड होते. ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे तिथून ज्या भागात तुटवडा आहे तिथे पाणी पोहोचविणे शहाणपणाचे आहे.

पुणे - बऱ्यापैकी पाऊस होऊनदेखील राज्याच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवतो. दरवेळी काही जिल्ह्यांमध्ये पाणी नाही, अशी ओरड होते. ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे तिथून ज्या भागात तुटवडा आहे तिथे पाणी पोहोचविणे शहाणपणाचे आहे. यापूर्वी पाण्याचे राजकारण करणाºया राज्यकर्त्यांना कसे निवडून दिले, याचे विशेष वाटते, अशी अप्रत्यक्ष टीका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली.महाराष्ट्र विकास केंद्र व ग्लोबल सेंटर फॉर वॉटर सायन्स रिसर्च अँड टेक्नॉलॉजी यांच्यावतीने जलमित्र पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. माजी मंत्री अ‍ॅड. बी. जे. खताळ पाटील, मदत व पुनर्वसन याचे संयुक्त सचिव अरुण उन्हाळे, तेलंगणा जलसंंपदा विकास महामंडळाचे अध्यक्ष व्ही. प्रकाश राव, महाराष्ट्र विकास केंद्राचे अनिल पाटील, जलमित्र पुरस्कार समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.धुळे येथील देशबंधू अँड मंजू गुप्ता फाउंडेशनला यावर्षीच्या जलमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, दहा हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते. रावसाहेब बढे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.पाटील म्हणाले, की बदलत्या काळानुसार पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून त्याकरिता व्यापक चळवळ उभारणे गरजेचे आहे. पाण्याविषयी राजकारण व त्यावरून वाद घालून तो प्रश्न सुटण्याऐवजी आणखी भरकटत जाईल. व्ही. प्रकाश राव म्हणाले, की तेलंगणामध्ये ज्या पद्धतीने पाणी अडविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी. मिशन भगिरथासारखे उपक्रम देशातील विविध दुष्काळग्रस्त भागांकरिता मार्गदर्शक ठरेल.अनिल पाटील म्हणाले, ‘‘केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाºया महाराष्ट्रात पाण्याविषयी मोठ्या प्रमाणावर जल चळवळ उभी राहण्याची गरज आहे.गेल्या अनेक वर्षांपासून जलमित्र म्हणून काम करीत असताना राज्यातील पाणी प्रश्नाच्या वस्तुस्थितीविषयी जाणीव आहे. त्यात सुधारणा घडून आणण्याकरिता शासकीय नव्हे तर नागरिकांचा सहभागदेखील आवश्यक आहे.

टॅग्स :agricultureशेतीWaterपाणीPoliticsराजकारण