शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

पुण्याला १०० टक्के पुनर्वसनानंतरच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 1:19 AM

भामा आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या वाटाघाटी गेल्या महिनाभरापासून जोरात सुरू असून बुधवारी राजगुरुनगरला झालेल्या बैैठकीत प्रकल्पग्रस्तांनी १०० टक्के पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत पुण्याला पाणी जाऊ देणार नसल्याचे पुनरुच्चार केला.

राजगुरुनगर : भामा आसखेड धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या वाटाघाटी गेल्या महिनाभरापासून जोरात सुरू असून बुधवारी राजगुरुनगरला झालेल्या बैैठकीत प्रकल्पग्रस्तांनी १०० टक्के पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत पुण्याला पाणी जाऊ देणार नसल्याचे पुनरुच्चार केला. यावर ४०३ प्रकल्पबाधितांना १६/२ च्या नोटिसा देऊन पुनर्वसन केले जाईल, असे अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी यावेळी आश्वासन दिले.राजगुरुनगर येथे प्रकल्पग्रस्तांच्या समस्या निवारणासाठी शिबिर आयोजिले होते. शिबिरात २३ गावचे धरणग्रस्त, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात धरणग्रस्तांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आमदार सुरेश गोरे व अपर जिल्हाधिकारी काळे यांनी समर्पकपणे उत्तरे दिली.दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, बन्सू होले, बळवंत डांगले, सत्यवान नवले, दत्ता होले, लक्ष्मण जाधव, देविदास बांदल आदींनी प्रश्न उपस्थित केले.भामा आसखेड धरणग्रस्तांचे १०० टक्के पुनर्वसन होत नाही, तोपर्यंत पुण्याला पाणी जाऊ देणार नाही, धरणातील ३ टीएमसी पाणी धरणात राखीव ठेवून धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावावेत, तोपर्यंत पुण्याला पाणी जाऊ देणार नाही, असा इशारा आमदार सुरेश गोरे यांनी दिला.या वेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी सांगितले, की धरणग्रस्तांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासन गांभीर्याने प्रयत्न करीत आहे. १६/२ च्या नोटिसा उर्वरित सर्व धरणग्रस्तांना येत्या २० दिवसांत वाटप केल्या जातील. त्यानंतर ६५ टक्के रकमा धरणग्रस्तांनी भराव्यात. धरणग्रस्तांना वर्ग दोनच्या जमिनी घेताना कसलाही त्रास नसून प्रशासन सर्व माहिती देत आहे. जमिनीबाबत चुकीचे झाले असल्यास माहिती द्या, तत्काळ दिलेली जमीन सरकारजमा केली जाईल, असे काळे यांनी स्पष्टपणे सांगितले.धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज प्रशासनाने सकारात्मक धोरण घेतले असून विविध प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय झाले. मात्र ज्या वेगाने पुण्याला पाणी नेण्यासाठी जॅकवेल व पाइपलाइनचे काम सुरू आहे, त्याच वेगाने पुनर्वसनाचे काम करावे, अशी अपेक्षा सत्यवान नवले यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी उत्तम पाटील, खेडचे प्रांताधिकारी आयुष प्रसाद, राज्य धरणग्रस्त परिषदेचे उपाध्यक्ष लक्ष्मण पासलकर, तहसीलदार सुनील जोशी, पुनर्वसन विभागाच्या तहसीलदार कल्पना ढवळे, कार्यकारी अभियंता गौतम लोंढे, भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे, नायब तहसीलदार राजेश कानसकर उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणी