शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जीबीएस रुग्ण असलेल्या परिसरातील पाणी शुद्ध; शासनाच्या प्रयोगशाळेचा अहवाल प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:47 IST

या परिसरातील पाणी शुद्ध असून, पिण्यास योग्य आहे, असे राज्य शासनाच्या प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे

- हिरा सरवदेपुणे : शहरातील सर्वाधिक गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) आजाराचे रुग्ण असलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील पाण्याच्या तपासणीचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यात या परिसरातील पाणी शुद्ध असून, पिण्यास योग्य आहे, असे राज्य शासनाच्या प्रयोगशाळेने स्पष्ट केले आहे. या अहवालामुळे नागरिकांना काहीसा दिला मिळाला आहे. दुसरीकडे शहरातील न्यूरोलॉजिस्ट डाॅक्टरांनी मात्र, हा आजार दूषित पाणी आणि अन्नामुळे होत असल्याचा दावा केल्याने नागरिकांच्या मनातील संशय कल्लोळ बळावला आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात ‘जीबीएस’ आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी नांदेड येथील विहीर व अन्य ठिकाणची पाहणी केली होती. तसेच धायरी, किरकटवाडी, नांदोशी, नऱ्हे, नांदेड या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांमधील पाण्याचे नमुने तपासण्याचे व ते राज्य शासनाच्या प्रयोगशाळेकडे पाठविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे महापालिकेने ११ ठिकाणचे पाण्याचे प्रत्येकी १०० मिलिलिटर पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा अहवाल पुणे महापालिकेला प्राप्त झाला आहे.

या अहवालानुसार किरकटवाडी येथील भैरवनाथनगर, उज्ज्वल निसर्ग सोसायटी, पंढरी निवास, ठकूबाई हगवणे निवास, आर. ओ. फिल्टर आंबेडकर सांस्कृतिक भवन जवळ, सोनवणेवस्ती, नानानगर, डीएसके विश्व जवळील जलकुंभ या सर्व ठिकाणचे पाणी पिण्यास योग्य आहे, तर कानडे इस्टेट नांदेड येथील विहिरीत साेडलेल्या खडकवासला धरणातून येणाऱ्या पाण्यात कोलीफॉर्म्स, थरमोटॉलरंट आणि ई कोलाय हे जिवाणू आढळून आल्याने हे पिण्यास योग्य नाही, मात्र, ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर हे पाणी पिण्यास योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

शासनाच्या अहवालानुसार महापालिकेच्या पाणवठ्यावरील पाणी शुद्ध असल्याचे नमूद केले आहे. तसेच महापालिकेने २७ ठिकाणांचे पाण्याचे नमुने घेतले होते, तेथील पाणी पिण्यास योग्य असल्याचेही महापालिकेच्या प्रयोगशाळेने कळविले आहे.  - रामदास तारू, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिकाजीबीएस आजार ही एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल स्थिती आहे. हा आजार दूषित पाणी व अन्नामुळे होऊ शकतो. ही स्थिती अचानक विकसित होऊ शकते आणि चार आठवड्यांपर्यंत वाढू शकते. या संसर्गामुळे जुलाब आणि पोटदुखी यासारखी लक्षणेदेखील होऊ शकतात. मात्र योग्य उपचारांनी हा बरा होऊ शकतो. - डॉ. परेश बाबेल, न्यूरोलॉजिस्ट

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWaterपाणीwater pollutionजल प्रदूषणwater transportजलवाहतूकMuncipal Corporationनगर पालिका