शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Pune | पुणेकरांवरील पाणी कपात तूर्तास टळली; नवीन नळजोड देणे बंद

By निलेश राऊत | Updated: April 18, 2023 18:58 IST

खडकवासला धरण साखळीत आजमितीला १२ टीएमसी पाणीसाठा आहे...

पुणे : जलसंपदा विभाग व महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारची पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुणेकरांवरील पाणी कपात तूर्तास टळली असली तरी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हाेणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी कपातीसंदर्भात निर्णय हाेण्याची शक्यता आहे.

खडकवासला धरण साखळीत आजमितीला १२ टीएमसी पाणीसाठा आहे. या धरणांमधून शेतीकरीता उन्हाळी आवर्तन देण्यासाठी साधारणत: ५ टीएमसी पाण्याची गरज असून, पुणे शहराची तहान भागविण्यासाठी पुढील दोन महिन्यांसाइी साधारणत: ७ टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. दरम्यान उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात हाेत असल्याने अंदाजे दोन टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याचा वापर जपून करावा. अशा सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला दिल्या आहेत. अशी माहीती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जलवाहिनी दुरूस्तीचे काम ऑक्टोबर महिन्यानंतरखडकवासला ते पर्वती जलकेंद्र पर्यंत महापालिकेच्यावतीने २५ वर्षांपूर्वी बारा किलोमीटर अंतराची बंद जलवाहिनी टाकण्यात आली होती. या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गंज चढला असून, तीची काही ठिकाणी दुरूस्तीही करणे जरूरी आहे. याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली परंतु, या निविदा प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. या जलवाहीनीचे काम सुरु केल्यानंतर महापालिकेला कालव्यातून प्रति दिन तीन हजार एमएलडी इतके पाणी उचलावे लागणार आहे. आजमितीला कालव्यातून पाणी साेडण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर जलवाहिनी दुरूस्तीचे काम हाती घेतल्यावर परीणाम होऊ शकतो. त्यामुळे या जलवाहीनीच्या दुरुस्ती, रंगरंगाेटीचे काम हे ऑक्टोबर महीन्यानंतर करण्यात यावे, अशा सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केल्या आहेत.

नवीन नळजोड देणे बंद

पाण्याची उपलब्धता व वाढते ऊण लक्षात घेता, पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याच्या अपव्यय टाळण्यासाठी बांधकाम, वाहने धुण्यासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. बांधकामासाठी व वॉशिंग सेंटरवर पिण्याचा पाण्याचा वापर करण्याऐवजी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांचे नळजोड कापले जाणार आहेत. दरम्यान उन्हाळ्याच्या पुढील दीड महिन्याच्या काळात नवे नळजोड दिले जाणार नसल्याचे अनिरूध्द पावसकर यांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :water shortageपाणीकपातPuneपुणे