शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

चिल्हेवाडी धरणातील पाणी जुन्नरसाठीच : आमदार अतुल बेनके यांचा खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 19:47 IST

चिल्हेवाडी धरणात उपलब्ध होणारे पाण्याचा हक्क हा जुन्नर तालुक्यासाठीच राहणार आहे.

नारायणगाव :- चिल्हेवाडी धरणातील पाणी अहमदनगर येथील अकोले व संगमनेर येथे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहे ही अफवा असून पूर्णपणे खोडसाळ व निराधार बाब आहे. धरणातील पाणी हे फक्त जुन्नर तालुक्यासाठीच सिंचन व पिण्यासाठी राखीव आहे अशी माहिती जुन्नरचेआमदार अतुल बेनके यांनी दिली.काही प्रसार माध्यमांद्वारे चिल्हेवाडी धरणातील पाणी हे केंद्र सरकारच्या नदी जोड प्रकल्प व राज्य सरकारच्या उपसा जलसिंचन योजने अंतर्गत अकोले व संगमनेर येथे नेण्याचे प्रयत्न सुरू असून यासाठी काही संघटनांनी पाठपुरावा सुरू केला आहे. याचा खुलासा करताना आमदार अतुल बेनके म्हणाले, चिल्हेवाडी धरणात उपलब्ध होणारे पाण्याचा हक्क हा जुन्नर तालुक्यासाठीच राहणार आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांद्वारे सुरू असलेली चर्चा ही निराधार असून यास कोणताही आधार नाही अशा प्रकारे पाणी नेण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर झालेला नसून काही जणांनी हा मुद्दा जाणीवपूर्वक प्रसार माध्यमांद्वारे केला आहे. सध्या चिल्हेवाडी धरणातून पाईपलाईनचे काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर या धरणाचा लाभ पुर्व पट्टयातील अनेक गावांना होवून तो भाग सुजलाम सुफलाम होणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता चिल्हेवाडीचे पाणी जुन्नर तालुक्यासाठीच राहील असा विश्वास बेनके यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, डिंभे धरण विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी माने यांनी अधिक्षक अभियंता यांना दि.५ सप्टेंबर २०२० रोजी पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या नदी जोड प्रकल्प अथवा उपसा सिंचन योजनेद्वारे, नदी जोड प्रकल्पाद्वारे, चिल्हेवाडी धरणाचे पाणी अहमदनगर जिल्हयातील अकोले व संगमनेर तालुक्यात २३ गावांना देण्याबाबत कारवाई सुरू असल्याचे वाचणात आले परंतु याविषयी या विभागास शासन स्तरावरून कोणतीही मागणी अथवा पत्र तसेच संबंधित कमिटी अथवा लोकप्रतिनिधींकडून मागणी करण्यात आलेली नाही. चिल्हेवाडी धरणाची साठवणुक क्षमता ०.९० टी.एम.सी.आहे. या धरणातून सुरू असलेल्या बंधिस्त पाईपलाईनची लांबी ३८.०८० कि.मी.-इतकी असून जुन्नर तालुक्यातील अवर्शण प्रवण गावातील ६ हजार ३७२ हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी पुर्णपणे नियोजन झालेले आहे. चिल्हेवाडी धरणात कोणतेही अतिरीक्त पाणी उपलब्ध नाही, जर भविश्यात पाणी उपलब्ध झाल्यास शासनाच्या निर्देशानुसार इतर योजनांना पाणी देणे शक्य होईल.

टॅग्स :Junnarजुन्नरWaterपाणीMLAआमदार