शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पुण्यात पाणीकपातीचे पालकमंत्र्यांनी दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 01:52 IST

पुणे : दहा दिवसांतून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला, तर २० टक्के पाण्याची कमतरता भरून निघते. यासाठी शहरातील आमदार, ...

पुणे : दहा दिवसांतून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला, तर २० टक्के पाण्याची कमतरता भरून निघते. यासाठी शहरातील आमदार,खासदार, नगरसेवक एकत्र बसून योग्य ते नियोजन करतील. यामुळे पाण्याचे कोणीही राजकारण करू नये. चर्चेतून सर्वच अडचणींवर मात करता येते, असे सांगत पालक मंत्री गिरीश बापट यांनी पुण्यात पाणीकपातीचे संकेत दिले.पुण्यात महापौर बंगल्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बापट बोलत होते. ते म्हणाले की, यंदा संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. त्यात परतीचा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, हवेली या तालुक्यांत पाण्याचे गंभीर संकट उभे राहिले आहे. त्यात गतवर्षीच्या तुलनेत खडकवासला प्रकल्पात २० टक्के पाणीसाठा कमी आहे. पाण्याचे नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांसोबत चर्चा करून बेबी कॅनॉल आणि खडकवासला धरणातून सुरू होणारा उजवाकॅनॉल दुरुस्त करून गळती थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी काही दिवस दोन्ही कॅनॉल बंद ठेवावे लागतील. ही दुरुस्ती केल्यानंतर, ग्रामीण आणि शहरातील नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. सध्या धरणात असलेला पाण्याचा साठा लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे.टेमघर धरणाचे पाणी कोणालाही दिले गेले नाही. त्याचा वापर नागरिकांसाठीच करण्यात आला आहे. दुरुस्तीसाठी धरण मोकळे करण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.सध्या पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २० टक्के पाणीसाठा कमी आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरशहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शिल्लक पाणीअत्यंत जपून वापरणे गरजेचेआहे. यापुढे पुणे शहरालादररोज १३५० एमएलडी पाणी देणे शक्य नाही.।पुण्याला १३५० एमएलडी पाणी देणे शक्य नाहीपिण्यासाठी पुणे शहराला दररोज १३५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मिळावे यासाठी जलसंपदा खात्याशी महापालिका झगडत आहे. मात्र, पुण्याला १३५० एमएलडी पाणी मिळणार नाही, असे बापट यांनीच स्पष्ट केल्याने आता कपातीशिवाय पर्याय राहणार नाही. त्याच आता कालवा समिती बरखास्त झाल्याने पाण्याच्या नियोजनाचे अधिकार जलसंपदा प्राधीकरणाकडे गेले आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार पाणी दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाgirish bapatगिरीष बापट