शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

‘वॉटर बेल’चा अध्यादेश काढला; पाण्याचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 05:35 IST

शालेय विद्यार्थ्यांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये तीन वेळा ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) वाजविण्याचा अध्यादेश काढला आहे.

पुणे : शालेय विद्यार्थ्यांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये तीन वेळा ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) वाजविण्याचा अध्यादेश काढला आहे. मात्र अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या तुलनेत पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी कोठून आणणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.केरळ येथील एका शाळेने राबविलेला ‘वॉटर बेल’चा उपक्रम केरळ राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविला. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने महाराष्ट्रातील शाळांमध्ये सुद्धा वॉटर बेल व्हावी, अशी मागणी समोर आली होती. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा अध्यादेश प्रसिध्द केला.शरीरातील पाण्याची कमतरता हे अनेक आजारांचे कारण आहे. अनेक विद्यार्थी पाण्याची बाटली तशीच परत आणत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा येणे, मुतखडा, चिडचिडेपणा वाढणे आदी त्रास होण्याची शक्यता असते. बरेचदा विद्यार्थी खेळण्याच्या नादात पाणी पिण्याचे विसरून जातात. त्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळांमध्ये तीन वेळा वॉटर बेल वाजविली जाणार आहे.शाळेच्या वेळापत्रकात तीनवेळा वॉटर बेल वाजविण्याबाबत मुख्याध्यापकांना वेळ निश्चित करावी लागणार आहे. पुढील काळात विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागेल. या वेळेत विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह वापरण्याची मुभा द्यावी, असे अध्यादेशात म्हटले आहे. राज्याच्या शिक्षण आयुक्तांना वॉटर बेल उपक्रमाच्या अंमलबजावणीचा अहवाल शाळांकडून घेण्याची जबाबदारी दिली आहे. केवळ अध्यादेश काढल्याने सर्व विद्यार्थी शाळेच्या वेळेत तीन वेळा पाणी पिणार नाहीत. त्यासाठी सर्वप्रथम शाळेत पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे लागेल.मुख्याध्यापक महासंघाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले म्हणाले, शाळांमधील विद्यार्थी संख्या आणि पाण्याच्या टाक्यांना असणारे नळ यांचे प्रमाण तपासावे लागेल. घरातून पाणी बॉटल आणल्यास दप्तराचे ओझे वाढेल. अनेक शाळांमध्येच लोकसहभागातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल.राज्यभरातील शाळांचे करणार सर्वेक्षणकिती शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था असून किती शाळांमध्ये पाणी उपलब्ध करून द्यावे लागेल, याबाबत सर्वेक्षण केले जाईल. पिण्याचे पाणी नसणाऱ्या शाळामध्ये पाणी उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. - दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य. 

टॅग्स :WaterपाणीMumbaiमुंबई