शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

‘वॉटर बेल’चा अध्यादेश काढला; पाण्याचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 05:35 IST

शालेय विद्यार्थ्यांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये तीन वेळा ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) वाजविण्याचा अध्यादेश काढला आहे.

पुणे : शालेय विद्यार्थ्यांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये तीन वेळा ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) वाजविण्याचा अध्यादेश काढला आहे. मात्र अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या तुलनेत पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे पिण्याचे पाणी कोठून आणणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.केरळ येथील एका शाळेने राबविलेला ‘वॉटर बेल’चा उपक्रम केरळ राज्यातील सर्व शाळांमध्ये राबविला. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्याने महाराष्ट्रातील शाळांमध्ये सुद्धा वॉटर बेल व्हावी, अशी मागणी समोर आली होती. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा अध्यादेश प्रसिध्द केला.शरीरातील पाण्याची कमतरता हे अनेक आजारांचे कारण आहे. अनेक विद्यार्थी पाण्याची बाटली तशीच परत आणत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे थकवा येणे, मुतखडा, चिडचिडेपणा वाढणे आदी त्रास होण्याची शक्यता असते. बरेचदा विद्यार्थी खेळण्याच्या नादात पाणी पिण्याचे विसरून जातात. त्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी शाळांमध्ये तीन वेळा वॉटर बेल वाजविली जाणार आहे.शाळेच्या वेळापत्रकात तीनवेळा वॉटर बेल वाजविण्याबाबत मुख्याध्यापकांना वेळ निश्चित करावी लागणार आहे. पुढील काळात विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची सवय लागेल. या वेळेत विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह वापरण्याची मुभा द्यावी, असे अध्यादेशात म्हटले आहे. राज्याच्या शिक्षण आयुक्तांना वॉटर बेल उपक्रमाच्या अंमलबजावणीचा अहवाल शाळांकडून घेण्याची जबाबदारी दिली आहे. केवळ अध्यादेश काढल्याने सर्व विद्यार्थी शाळेच्या वेळेत तीन वेळा पाणी पिणार नाहीत. त्यासाठी सर्वप्रथम शाळेत पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे लागेल.मुख्याध्यापक महासंघाचे प्रवक्ते महेंद्र गणपुले म्हणाले, शाळांमधील विद्यार्थी संख्या आणि पाण्याच्या टाक्यांना असणारे नळ यांचे प्रमाण तपासावे लागेल. घरातून पाणी बॉटल आणल्यास दप्तराचे ओझे वाढेल. अनेक शाळांमध्येच लोकसहभागातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागेल.राज्यभरातील शाळांचे करणार सर्वेक्षणकिती शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था असून किती शाळांमध्ये पाणी उपलब्ध करून द्यावे लागेल, याबाबत सर्वेक्षण केले जाईल. पिण्याचे पाणी नसणाऱ्या शाळामध्ये पाणी उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. - दत्तात्रय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य. 

टॅग्स :WaterपाणीMumbaiमुंबई