शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

माळीणच्या भयातून अजूनही येते मध्यरात्री जाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 06:20 IST

दुर्घटनेला पाच वर्षे पूर्ण : नव्या गावात रुळताहेत ग्रामस्थ; मात्र जुन्या जखमा ताज्याच

नीलेश काण्णव घोडेगाव (पुणे) : पाच वर्षांपूर्वी ३० जुलैला पावसाने आमच्या गावावर असा काही कहर केला की सोन्यासारखं गाव क्षणात गाडले गेले. पावसाळ्यात त्या आठवणीने अजूनही दचकून जाग येते; पण जुना गाव तो गाव होता. सुरुवातीला नवीन बांधलेल्या टुमदार घरांमध्ये करमत नव्हतं, पण आता सवय झाली आहे. फक्तउन्हाळ्यात येथे पाण्यासाठी वणवण करावी लागते अशी भावना माळीण दुर्घटनेला पाच वर्षे पूर्ण होत असताना या दुर्घटनेत आपली आई गमावलेल्या तुकाराम लेंभेयांनी व्यक्तकेली.

डोंगर कोसळून गाडल्या गेलेल्या माळीण दुर्घटनेला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या दुर्घटनेत १५१ लोक मृत्युमुखी पडले. अनेक कुटुंबे बेघर, उद्ध्वस्त झाली. त्या साऱ्या जखमा सावरत माळीण पुन्हा उभे राहिले आहे. नवीन जागेत पुनर्वसन झाले असले, तरीही काळजावर कोरलेले व्रण आणि मनातल्या वेदना अजूनही मिटलेल्या नाहीत. माळीणकरांना भेटल्यानंतर त्या दिवसाची आठवण येताच प्रत्येकाला धडकी भरते. अशीच भावना सीताबाई विरणक यांनी व्यक्तकेली, डोंगर खचून गाव गाडला, गाव गेला तेव्हा असाच मुसळधार पाऊस होता. आता पाऊस दिसला, तरी भीती वाटते. पण याला आम्ही घाबरत नाय. धडाडीने येथे राहत आहोत.माळीणमधील कमल लेंभे या महिलेच्या घराची नोंद नसल्याने तिला नवीन पुनर्वसन गावठाणात घर मिळाले नाही. दुर्घटनेतून तिचे कुटुंब बचावले, मात्र घर गेले. दुर्घटनेनंतर काही दिवसांत तिचा नवरा गेला. माळीणमध्ये सामाईक घर होते. दुर्घटनेच्या काही दिवस आधी नवीन घर बांधून पूर्ण झाले होते.या घराची नोंद ग्रामपंचायत दप्तरी घातली नव्हती. नवीन पुनर्वसन गावठाणात दिराला घर मिळाले. मात्र, तिच्या घराची नोंद नसल्याने घर नाकारण्यात आले. या महिलेला घर मिळावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.माळीण दुर्घटनेत घडलेला डोंगर, या ठिकाणी बांधलेले स्मृतिवन व ग्रामस्थांनी बांधलेले मारुतीचे मंदिर.माळीणकरांच्या अजूनही काही मागण्या अपूर्ण राहिल्या आहेत. नवीन पुनर्वसित गावात पाण्याचा प्रश्न गंभीर असून पाण्यासाठी घेण्यात आलेले बोअर, विहिरीचे स्रोत वाया गेले. उन्हाळ्यात दर वर्षी नवीन गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. माळीण फाट्यावरून पाणी वाहावे लागते. यासाठी आसाणेमध्ये झालेल्या पायरडोहचे पाणी माळीणला मिळावे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस