शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

धोरणाच्या प्रतीक्षेत फुटला कालवा, धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 01:02 IST

शासन धोरणात बदल करण्याची आवश्यकता

पुणे : पाटबंधारे विभागाकडून उंदीर, घुशी व खेकड्यांमुळे कालवा पोखरला जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात शासकीय धोरणच कालवा ‘पोखरत’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे कालवा दुरूस्तीसाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध झाला नाही. अखेर अनेक वर्षे तग धरून राहिलेला कालवा फुटला. त्यामुळे शासन धोरणात बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

पुणे शहर परिसरातील मोठ्या लोकवस्तीतून जाणाऱ्या खकडवासला ते इंदापूरपर्यंतच्या कालव्याची दुरूस्तीची कामे करणे आवश्यक असल्याची बाब सिंचन विभागाच्या निदर्शास आली होती. त्यामुळे कालवा दुरूस्तीसाठी निधी मिळावा, यासाठी जलसंपदा विभागातर्फे शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, शासनातर्फे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. शासकीय नियमावलीच्या चौकटीत प्रस्ताव बसत नसल्याने तो नामंजूर करण्यात आला होता. कालव्याच्या दुरूस्तीसाठी अजूनही शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आणखी किती ठिकाणी कालवा फुटून दुर्घटना घडल्यानंतर शासनाकडून निधी दिला जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळाला देण्यात आलेल्या एकूण निधीपैकी केवळ २ टक्के निधीच जलसंपदा विभागाला कालवा व इतर बाबींच्या दुरूस्तीसाठी वापरता येईल, अशी शासकीय तरतूद आहे. मात्र, खडकवासला ते इंदापूरपर्यंत असलेल्या कालव्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे ३० ते ४० कोटींचा निधी लागणार आहे. हा निधी एकूण निधीच्या २ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. परिणामी कालव्याचे काम होऊ शकले नाही, असे सिंचन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी सांगितले.गेल्या काही वर्षांत खडकवासला ते इंदापूर दरम्यान असणारा कालवा हडपसरजवळ व ग्रामीण भागात शेतकºयांच्या शेतामध्ये फुटला आहे. मात्र, दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्याने आणि त्यामुळे लोकवस्ती प्रभावित झाल्याने त्याची गंभीरता अधिकपणे लक्षात आली. मात्र, जलसंपदा विभागाने कालवा फुटणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, असेही बोलले जात आहे.कर्मचाºयांचा तुटवडा : गस्त पुन्हा एकदा सुरू करण्याची आवश्यकताजलसंपदा विभागातच नाही तर सर्वच शासकीय विभागात कर्मचाºयांचा तुटवडा आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पूर्वी इंदापूर, दौंड, पाटस, केडगाव, रावणगाव, लोणी आदी ठिकाणचे जलसंपदा विभागाचे कर्मचारी नियमितपणे कालव्याची तपासणी करत होते.शहरात स्वारगेट, नारायण कोठी, धायरी, खडकवासला या कार्यालयातील कर्मचारी कालव्याची गस्त घालत होते. परंतु, त्यात खंड पडल्याने कालवा फुटण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे कालव्यावरील गस्त पुन्हा एकदा नियमितपणे सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे सिंचन विभागातील अधिकाºयांकडून सांगितले जात आहे.1 कालवा बांधल्यापासून अनेक वर्षे सिंचन विभागातील कर्मचाºयांकडून कालव्याची गस्त घातली जात होती. त्यामुळे कोणत्या ठिकाणी कालव्या खचला आहे. कुठे पाणी वाहून गेली आहे. कालव्याजवळ कोणती झाडे वाढली आहेत. याबाबतची माहिती घेण्यासाठी सिंचन विभागाकडून कर्मचारी नियुक्त केले जात होते.2दूरध्वनी किंवा दुचाकी वाहने उपलब्ध नसल्याने सायकलवरून किंवा पायी कालव्याची तपासणी केली जात होती. परंतु, मोबाइल व दुचाकी व चारचाकी वाहने आल्याने कालव्याची वरचेवर केली जाणारी तपासणी बंद झाली.3कालवा फुटण्याचा दोष उंदीर, घुशी व खेकड्यांना दिला जात आहे. एका रात्रीत किंवा एका दिवसात या प्राण्यांनी कालवा पोखरला नाही. त्यामुळे कालव्याची तपासणी नियमितपणे होत नव्हती, यास दुजोरा मिळत आहे.

टॅग्स :Puneपुणे