शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

धोरणाच्या प्रतीक्षेत फुटला कालवा, धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 01:02 IST

शासन धोरणात बदल करण्याची आवश्यकता

पुणे : पाटबंधारे विभागाकडून उंदीर, घुशी व खेकड्यांमुळे कालवा पोखरला जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात शासकीय धोरणच कालवा ‘पोखरत’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे कालवा दुरूस्तीसाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध झाला नाही. अखेर अनेक वर्षे तग धरून राहिलेला कालवा फुटला. त्यामुळे शासन धोरणात बदल करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

पुणे शहर परिसरातील मोठ्या लोकवस्तीतून जाणाऱ्या खकडवासला ते इंदापूरपर्यंतच्या कालव्याची दुरूस्तीची कामे करणे आवश्यक असल्याची बाब सिंचन विभागाच्या निदर्शास आली होती. त्यामुळे कालवा दुरूस्तीसाठी निधी मिळावा, यासाठी जलसंपदा विभागातर्फे शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, शासनातर्फे हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. शासकीय नियमावलीच्या चौकटीत प्रस्ताव बसत नसल्याने तो नामंजूर करण्यात आला होता. कालव्याच्या दुरूस्तीसाठी अजूनही शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आणखी किती ठिकाणी कालवा फुटून दुर्घटना घडल्यानंतर शासनाकडून निधी दिला जाणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

कृष्णा खोरे विकास महामंडळाला देण्यात आलेल्या एकूण निधीपैकी केवळ २ टक्के निधीच जलसंपदा विभागाला कालवा व इतर बाबींच्या दुरूस्तीसाठी वापरता येईल, अशी शासकीय तरतूद आहे. मात्र, खडकवासला ते इंदापूरपर्यंत असलेल्या कालव्याच्या दुरूस्तीसाठी सुमारे ३० ते ४० कोटींचा निधी लागणार आहे. हा निधी एकूण निधीच्या २ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. परिणामी कालव्याचे काम होऊ शकले नाही, असे सिंचन विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी सांगितले.गेल्या काही वर्षांत खडकवासला ते इंदापूर दरम्यान असणारा कालवा हडपसरजवळ व ग्रामीण भागात शेतकºयांच्या शेतामध्ये फुटला आहे. मात्र, दांडेकर पुलाजवळ कालवा फुटल्याने आणि त्यामुळे लोकवस्ती प्रभावित झाल्याने त्याची गंभीरता अधिकपणे लक्षात आली. मात्र, जलसंपदा विभागाने कालवा फुटणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या नाहीत, असेही बोलले जात आहे.कर्मचाºयांचा तुटवडा : गस्त पुन्हा एकदा सुरू करण्याची आवश्यकताजलसंपदा विभागातच नाही तर सर्वच शासकीय विभागात कर्मचाºयांचा तुटवडा आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पूर्वी इंदापूर, दौंड, पाटस, केडगाव, रावणगाव, लोणी आदी ठिकाणचे जलसंपदा विभागाचे कर्मचारी नियमितपणे कालव्याची तपासणी करत होते.शहरात स्वारगेट, नारायण कोठी, धायरी, खडकवासला या कार्यालयातील कर्मचारी कालव्याची गस्त घालत होते. परंतु, त्यात खंड पडल्याने कालवा फुटण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे कालव्यावरील गस्त पुन्हा एकदा नियमितपणे सुरू करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे सिंचन विभागातील अधिकाºयांकडून सांगितले जात आहे.1 कालवा बांधल्यापासून अनेक वर्षे सिंचन विभागातील कर्मचाºयांकडून कालव्याची गस्त घातली जात होती. त्यामुळे कोणत्या ठिकाणी कालव्या खचला आहे. कुठे पाणी वाहून गेली आहे. कालव्याजवळ कोणती झाडे वाढली आहेत. याबाबतची माहिती घेण्यासाठी सिंचन विभागाकडून कर्मचारी नियुक्त केले जात होते.2दूरध्वनी किंवा दुचाकी वाहने उपलब्ध नसल्याने सायकलवरून किंवा पायी कालव्याची तपासणी केली जात होती. परंतु, मोबाइल व दुचाकी व चारचाकी वाहने आल्याने कालव्याची वरचेवर केली जाणारी तपासणी बंद झाली.3कालवा फुटण्याचा दोष उंदीर, घुशी व खेकड्यांना दिला जात आहे. एका रात्रीत किंवा एका दिवसात या प्राण्यांनी कालवा पोखरला नाही. त्यामुळे कालव्याची तपासणी नियमितपणे होत नव्हती, यास दुजोरा मिळत आहे.

टॅग्स :Puneपुणे