शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

दूध उत्पादकांना प्रतीक्षा अनुदानाची, ६० दिवस उलटले तरीही लाभ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:23 IST

घोषणा फसवी : दूध संस्था अडचणीत

लासुर्णे : राज्य सरकारने दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये जाहीर केलेली अनुदानाची रक्कम ६० दिवस उलटून गेले, तरी दूध संस्थांना मिळत नसल्याने दूध संस्था अडचणीमध्ये आल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनानंतर राज्य शासनाने दुधाला प्रतिलिटर अनुदानाची घोषणा केली होती; मात्र ही घोषणा फसवी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे येथे शनिवारी (दि. २९) दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाची बैठक पार पडली. यामध्ये शासनाने शनिवारी, दि. ६ आॅक्टोबरपर्यंत अनुदानाची रक्कम जमा केली, तरच दूध संस्थांना शेतकऱ्यांना २५ रुपये दर देणे शक्य होईल अशी भूमिका घेतली होती. मंगळवारी, दि. ९ आॅक्टोबरला पुन्हा बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असा निर्णय या वेळी बैठकीत घेण्यात आला. जून महिन्यामध्ये दुधाचे दर सुमारे १७ रुपये प्रतिलिटर झाल्यामुळे राज्यातील शेतकरीवर्ग अडचणीमध्ये आला होता. याच काळामध्ये खासदार राजू शेट्टी दूध दराच्या प्रश्नावरून शासनाला कोंडीत पकडून १६ जुलैपासून, राज्यामध्ये दूध आंदोलन सुरू केले. बघता-बघता राज्यामध्ये दूध आंदोलनाचा भडका उडाला. या वेळी पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे दूध दरावर तोडगा काढण्यासाठी १९ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये दुधाचा दर २५ रुपये करण्याच्या शेतकºयांच्या मागणीवरती चर्चा झाली. या वेळी दूधसंघांनी शेतकºयांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्याची शिफारस केली होती. मात्र, शासनाला पिशवीबंद विक्री होणाºया दुधाला अनुदान द्यावयाचे नसल्यामुळे दूधसंस्थेच्या माध्यमातून शेतकºयांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून सुरू झाली आहे. यामध्ये दूधसंस्थांनी डीडीओ यांच्याकडे शेतकºयांचे बँक खाते नंबर व आधार कार्ड देणे बंधनकारक राहील, असा निर्णय घेण्यात आला होता. सर्व दूधसंस्थांनी आॅगस्ट व सप्टेंबरचा डेटा अपलोड करून ६० दिवस झाले, तरीदेखील शासन अनुदानाची रक्कम जमा करत नसल्याने राज्यातील दूधसंस्था अडचणीत आल्या आहेत....तरच दूध उत्पादकाला मिळणार अनुदानदूधसंस्थांनी शनिवारी पुणे येथे याबाबत बैठक घेतली. यामध्ये शासनाने जर दि. ६ आॅक्टोबर पर्यंत अनुदानाची रक्कम दिली तरच दूध उत्पादकाला २५ रुपये दर देणे शक्य होणार आहे. यासाठी पुन्हा दि. ९ रोजी बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ, असा निर्णय घेण्यात आला आहे.जर शासनाने दि. ६ पर्यंत अनुदानाची रक्कम जमा केली नाही, तर दूधदराचा तिढा पुन्हा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दूध संस्थेसमोरील अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एप्रिल महिन्यामध्ये दूध पावडरचे दर राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर कोसळले असल्यामुळे दूधसंघांना पावडर तयार करून व साठा तयार करणे परवडणारे नव्हते.या अडचणींमुळे अनेक दूधसंस्था दुधाचा दर १७ रुपयांपेक्षा कमी करण्याच्या विचारधीन होत्या. यावर उपाय म्हणून राज्यशासनाने १२ मे ते १३ जून या कालवधीमध्ये दुधाला प्रतिलिटर ३ रुपये अनुदान जाहीर केल्यामुळे सुमारे २० रुपये दर मिळत होता. परंतु १२ मे ते १३ जूनची प्रतिलिटर ३ रुपये व १९ जुलैची प्रतिलिटर ५ रुपये अशी अनुदानाची रक्कम शासनाने आजपर्यंत दिली नाही.दूध दरावर तोडगा काढण्यासाठी १९ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये दुधाचा दर २५ रुपये करण्याच्या शेतकºयांच्या मागणीवरती चर्चा झाली. या वेळी दूधसंघांनी शेतकºयांच्या खात्यावर थेट अनुदान जमा करण्याची शिफारस केली होती....तर मंत्र्यांना ठोकून काढणार : राजू शेट्टीसंघवाल्यांना पाच पाच वेळा शेतकºयांची बँक खाती दिली आहेत, तरीही अनुदान मिळत नसेल तर ही बाब गंभीर आहे. यामध्ये चूक शासकीय अधिकाºयांची आहे की संघवाल्यांची हे मला माहीत नाही. परंतु, या दोघांमध्ये शेतकºयाचा बळी मी जाऊ देणार नाही. यामध्ये संघाची चूक असेल तर गुन्हे दाखल करा; पण शासनाची चूक असेल तर मी दोनचार मंत्र्यांनाठोकून काढल्याशिवाय राहणारनाही.

टॅग्स :milkदूधMilk Supplyदूध पुरवठाPuneपुणे