शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

कोरोना लसीकरणानंतर अर्धा तास थांबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST

पुणे : कोरोना लसीकरणानंतर अनेक जण तातडीने केंद्राबाहेर पडतात. पण, असे करणे धोक्याचे ठरू शकते. काही जणांना लस घेतल्यावर ...

पुणे : कोरोना लसीकरणानंतर अनेक जण तातडीने केंद्राबाहेर पडतात. पण, असे करणे धोक्याचे ठरू शकते. काही जणांना लस घेतल्यावर लगेच चक्कर येऊन शुद्ध हरपणे, हार्ट रेट वाढणे, श्वसनाचा वेग वाढणे, तीव्र अॅलर्जी असे त्रास होऊ शकतात. त्रासाची तीव्रता वाढू नये आणि वाढल्यास त्वरित औषधोपचार करता यावेत, यासाठी अर्धा तास केंद्रावरच थांबण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. लस घेतल्यानंतर तीव्र स्वरूपाचा त्रास होण्याचे प्रमाण ०.००५ टक्के इतकेच आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून अर्धा तास वाट पाहावी, असे आवाहन लसीकरण केंद्रांवर केले जात आहे.

लसीकरण केंद्रांवर नावनोंदणी केली जाते, प्रत्यक्ष लसीकरण खोलीत लस घेतल्यावर अर्धा तास निरीक्षण खोलीमध्ये थांबण्यास सांगितले जाते. लस घेतल्यावर काही त्रास होत असल्यास निरीक्षण केले जाते. अर्धा तासाच्या कालावधीत पुरळ उठणे, ताप येणे, चक्कर येणे, ॉलर्जी येणे, रक्तदाब वाढणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार केले जाते. असा त्रास जाणवल्यास एईएफआय (अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन) किट तयार ठेवली जाते. यामध्ये आयत्या वेळी द्यायची इंजेक्शन, औषधे यांचा समावेश असतो.

लसीमुळे ॲलर्जी आल्याने रक्तसंक्रमणात बाधा निर्माण होऊन डोकेदुखी, पुरळ उठणे, लाल चट्टे पडणे, चक्कर येणे अशी लक्षणे आढळू शकतात. ॲनाफिलॅक्सिसमुळे रक्तपेशींमधील रसायने वाढतात आणि त्यामुळे रक्तदाब कमी होतो. हृदयविकाराच्या तक्रारी असलेल्यांना ॲनाफिलॅक्सिसचा धोका अधिक असतो. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अर्धा तास वाट पाहण्याचा सल्ला वैद्यकतज्ज्ञांकडून दिला जातो.

-------

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

पहिला डोस दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी 142936 92662

अत्यावश्यक सेवा 214606 89241

18-44 वयोगट 450770 21478

45-60 916631 171510

60 वरील 819966 301211

------

लस घेतल्यानंतर दुष्परिणाम होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. चक्कर येणे, शुद्ध हरपणे, श्वसनाचा वेग वाढणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, अॅलर्जी होणे असा त्रास जाणवू शकतो. यासाठी प्रत्येक केंद्रावर एएफईआय किट तयार ठेवली जाते. यामध्ये इंजेक्शन, औषधे यांचा समावेश असतो. अशा परिस्थितीत कशा प्रकारे उपचार करावेत, याचे प्रशिक्षण डॉक्टर आणि नर्सना दिलेले असते. एएफईआयचे प्रमाण ०.००५ टक्के इतकेच असले तरीही खबरदारीचा उपाय म्हणून लस घेतल्यावर घरी जाण्याची घाई न करता अर्धा तास वाट पाहावी.

- डॉ. संजय देशमुख, उपसंचालक, आरोग्य विभाग

----

लस हेच औषध

लसींची सुरक्षितता तपासण्यासाठी प्रयोगशाळेत विविध चाचण्या केल्या जातात. त्यानंतर मानवी चाचण्या करून सुरक्षितता, कार्यक्षमता आणि परिणामकारकता तपासली जाते. लसीनंतर त्रास झाल्याचे प्रमाण अत्यल्प आहे. याचाच अर्थ लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत. कोरोनाची साथ रोखण्यासाठी लस हेच एकमेव परिणामकारक औषध आहे. त्यामुळे लसीकरणाशी संबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्व नागरिकांनी लसीकरणासाठी आवर्जून पुढे यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.