शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सातव्या दिवशीच्या गणरायाला वाजतगाजत निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 21:53 IST

गौरीनंतर सातव्या दिवशी निरोप देण्यात येणाऱ्या गणरायाचे शहरातील विविध घाटांवर वाजगाजत विसर्जन करण्यात आले.

पुणे: गौरीनंतर सातव्या दिवशी निरोप देण्यात येणाऱ्या गणरायाचे शहरातील विविध घाटांवर वाजगाजत विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत भाविकांनी श्री गणेशाला निरोप दिला. महापालिकेने शहरातील १८ घाटांवर २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था केली असून नदीपात्र तसेच अन्य ठिकाणीही लोखंडी हौद विसर्जनासाठी म्हणून उपलब्ध करून दिले आहेत.

    विसर्जनाच्या प्रत्येक ठिकाणी महापालिकेने स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केले आहेत. घाटांवर तर पथकेच तयार ठेवण्यात आली आहे. पाचव्या दिवशी गौरीबरोबरच विसर्जीत होणाऱ्या गणपतींची संख्या जास्त असते. त्या तुलनेत सातव्या दिवशी विसर्जीत होणार गणराय संख्येने कमी असतात. त्यामुळे घाटांवर फारशी गर्दी नव्हती. बहुसंख्य गणपती घरगुती असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य वाजतगाजत घाटांवर दुपारपासूनच येत होते. गणपतीची स्वारी घाटावर विसर्जनासाठी आली की त्यांना आरती करण्यासाठी म्हणून महापालिकेने टेबलची व्यवस्था करून दिली आहे. नदीपात्रात मुर्ती विसर्जीत केल्यास नदीचे पाणी प्रदुषीत होते, प्लॅस्टर आॅफ पॅरिस पासून तयार केलेल्या मुर्तींमुळे नदीचे पाण्याती झरे बंद होतात, त्यामुळेही पर्यावरणप्रेमी मुर्तीचे नदीत विसर्जन करू नये असा प्रचार गेली काही वर्षे करत आहेत. त्याचा परिणाम दरवर्षी वाढतच चालला असल्याचे दिसते आहे.

    नदीपात्रात विसर्जीत होणाऱ्या मुर्तींची संख्या अजूनही जास्त असली तरीही हौदांमध्ये विसर्जीत करण्यालाही अनेक कुटुंबांकडून प्राधान्य देण्यात येते. वृद्धेश्वर, लकडी पूल, अष्टभूजा, सूर्य हॉस्पिटल, पटवर्धन घाट, आपटे घाट अशा बहुसंख्य घाटांवर हौदांमध्ये मुर्ती विसर्जन करण्याचा प्रतिसाद मिळत होता अशी माहिती महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक सुनिल कांबळे व सुनिल मोहिते यांनी दिली. रात्री उशीरापर्यंत विसर्जन सुरू होते असे ते म्हणाले.शहरातील सर्व विसर्जन व्यवस्थेची जबाबदारी असलेले मुकुंद कुलकर्णी म्हणाले, ‘‘कुठेही घाई गर्दी करू नये, भाविक काय म्हणतात ते नीट ऐकावे, नदीपात्राकडे लहान मुलांना जाऊ देऊ नये अशा सुचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. हौदातील विसर्जनही नीट करून घ्यावे, त्याकडे लक्ष ठेवावे असे त्यांना सांगण्यात आले आहे.’’

पालिका अखेरच्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्जमहापालिका आता अखेरच्या दिवशीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी सज्ज आहे. सर्व घाटांवरील कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्रांजवळ जीवरक्षक नियुक्त करण्यात आले आहे. सीसीटीव्हीवर विसर्जनाचे चित्रण होईल. त्यावर लक्ष ठेवण्यास स्वतंत्र कर्मचारी आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली असून रात्रीच्या वेळेसही घाटांची त्वरीत स्वच्छता करण्यात येत आहे. अखेरच्या दिवशीपर्यंत ही सर्व यंत्रणा कार्यरत राहील.- ज्ञानेश्वर मोळक, सहआयुक्त, महापालिका

टॅग्स :PuneपुणेGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ganeshotsavगणेशोत्सवnewsबातम्या