शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

नदीजोड प्रकल्पावरून ग्रामस्थ आक्रमक, भरपाई मिळाल्याशिवाय काम सुरू करू न देण्याची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 02:30 IST

बारामती तालुक्यातील सोनगाव ग्रामस्थ कृष्णा-भीमा जलस्थिरीकरणअंतर्गत नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पावरून आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळावी तसेच बाधित शेतीची नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय काम सुरु करु दिले जाणार नसल्याची भूमिका येथील सोनेश्वर कृती समितीने घेतली आहे.

बारामती - बारामती तालुक्यातील सोनगाव ग्रामस्थ कृष्णा-भीमा जलस्थिरीकरणअंतर्गत नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पावरून आक्रमक झाले आहेत. या प्रकल्पाची पूर्ण माहिती मिळावी तसेच बाधित शेतीची नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय काम सुरु करु दिले जाणार नसल्याची भूमिका येथील सोनेश्वर कृती समितीने घेतली आहे. या प्रकल्पाचे काम १५ दिवसांपूर्वीच शेतकरी, ग्रामस्थांनी बंद पाडले आहे. ग्रामसभेचा ठरावदेखील संमत करण्यात आला आहे.कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्प हा केंद्र आणि राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यातून हा प्रकल्प जाणार आहे. या दोन्ही तालुक्यांतील शेतीक्षेत्र या प्रकल्पामुळे बाधित होणार आहे. १५ दिवसांपूर्वी बोगद्याचे सोनगाव येथील ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी काम बंद पाडले आहे. अद्याप ते बंदच आहे. या प्रकल्पाची पूर्ण माहिती द्यावी, प्रकल्पामुळे बािधत शेतीची योग्य भरपाई द्यावी, तोपर्यंत काम सुरू करून देणार नाही असा आक्रमक पवित्रा सोनेश्वर कृती समितीने घेतला आहे.काही महिन्यांपूर्वी कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पांतर्गत नीरा-भीमा नदी बोगद्याचे काम सुरु असताना अपघात झाला. या अपघातामध्ये काम सुरु असताना वायररोप तुटून ८ कामगारांचा मृत्यू झाला. तेव्हापासुन हा प्रकल्प अधिक चर्चेत आला. त्यानंतर आता हा प्रकल्प सोनगावमध्ये विरोध होऊ लागल्यानंतर पुन्हा चर्चेत आला आहे. पैसे मिळाल्याशिवाय काम सुरु होऊ देणार नाही, अशी आक्रमक भूमिका कृती समितीने घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात शासन विरुद्ध कृती समिती असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.सोनेश्वर कृती समितीचे उपाध्यक्ष विकास माने यांनी सांगितले, की विकासकामांना आमचा विरोध नाही. मात्र, काम सुरू करू द्या, सहा महिन्यांच्या आत पैसे देऊ ही शासनाची भूमिका आहे. मात्र, या प्रकल्पातून बाधित होणाऱ्या नुकसानभरपाईचे नेमके चित्र स्पष्ट करा, अशी आमची मागणी आहे.सोनेश्वर कृती समितीचे अध्यक्ष आनंदराव देवकाते यांनी सांगितले, अद्यापपर्यंत उजनी, नीरा देवघर, वीर, भाटघर धरणे बांधून झाली. मात्र, अद्याप या प्रकल्पग्रस्तांची आंदोलने सुरु आहेत. शासनाने रेडीरेकनरच्या पाचपट दोन प्रकारे पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे अगोदर पैसे द्या, त्यानंतरच काम सुरु करा ही आमची आग्रही मागणी आहे. बंधारा बांधून झाल्यावर ज्या दिवशी बंधाºयामध्ये पाणी अडविले जाईल, त्या दिवशी संबंधितांना पैसे देऊ अशी शासनाची भूमिका आहे. ही भूमिका आम्हाला मान्य नाही. शेतकºयांच्या जमिनी पाण्याखाली जाण्यापूर्वी पैसे अगोदर द्या, ही आमची मागणी असल्याचे देवकाते म्हणाले.

टॅग्स :riverनदीPuneपुणे