शहरं
Join us  
Trending Stories
1
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
2
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
3
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
4
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
5
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
6
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
7
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
8
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
9
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
10
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
11
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
12
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
13
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
14
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
15
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
16
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
17
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
18
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
19
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
20
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  

पुस्तकाच्या गावी संमेलन अनिश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 4:04 AM

देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती होत असताना भिलारवासीयांना आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत; पण त्याचे निमंत्रण एखाद्या संस्थेने द्यायचे की शासनाने, या तांत्रिक मुद्द्याचा खोडा हाच या संमेलनाचा अडसर ठरणार असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे. त्यामुळे या वर्षी तरी भिलारला संमेलन होणार नसल्याचे बोलले जात आहे.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे - देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती होत असताना भिलारवासीयांना आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत; पण त्याचे निमंत्रण एखाद्या संस्थेने द्यायचे की शासनाने, या तांत्रिक मुद्द्याचा खोडा हाच या संमेलनाचा अडसर ठरणार असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे. त्यामुळे या वर्षी तरी भिलारला संमेलन होणार नसल्याचे बोलले जात आहे.आगामी साहित्यसंमेलन पुस्तकांच्या गावी भिलारमध्ये आयोजित करण्यात यावे, शासन संमेलनाची पूर्ण जबाबदारी उचलेल, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी बडोदा येथे झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये केले होते. साहित्यिकांसह साहित्य संस्थांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. संपूर्ण संमेलन सरकारच्या हातात गेले तर त्याचे स्वरूपच बदलेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती; मात्र गेल्या अडीच महिन्यांत अशा स्वरूपाचे कोणतेही निमंत्रण साहित्य महामंडळाकडे आलेले नाही, असे महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितले. मुळात साहित्य संमेलनाचे निमंत्रण शासन देऊ शकते का, आणि असे निमंत्रण आले तर संमेलन शासनाच्या हाती सुपूर्द करावे का, हे मुद्दे यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. आगामी साहित्य संमेलनासाठी भिलार येथून अद्याप निमंत्रण आलेले नाही.साहित्य महामंडळाची बैठक जूनमध्ये होणार आहे. त्यामध्ये स्थळांबाबत चर्चा होईल, असे श्रीपाद जोशी यांनी सांगितले.आगामी संमेलन विदर्भातसाहित्य महामंडळाचे कार्यालय नागपूर येथील विदर्भ साहित्य संघाकडे गेले, त्याला दोन वर्षे झाली आहेत. यापूर्वी डोंबिवली आणि बडोदा येथे संमेलन झाले असल्याने महामंडळाच्या कार्यकाळातील हे अखेरचे संमेलन तरी विदर्भात घेतले जावे, अशी विदर्भातील साहित्यरसिकांची अपेक्षा आहे.आजवरची साहित्य संमेलने पुणे-मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रभोवती फिरत राहिल्याने विदर्भाचा अनुशेष दूर व्हावा, या मागणीची दाखल घेत आगामी संमेलन निमंत्रण आलेल्या दोन स्थळांपैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य