पुणेकरांनी घेतला अनेक प्रजातींचा बळी

By Admin | Updated: July 4, 2015 00:08 IST2015-07-04T00:08:31+5:302015-07-04T00:08:31+5:30

नदीसुधार योजनेसाठी केंद्र शासनाकडून पुणे महापालिकेला तब्बल ९०० कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र, गेल्या १० वर्षांत पुणेकरांनी केलेल्या प्रदूषणामुळे अनेक दुर्मिळ मासे,

The victims of many species taken by Puneites | पुणेकरांनी घेतला अनेक प्रजातींचा बळी

पुणेकरांनी घेतला अनेक प्रजातींचा बळी

सुनील राऊत, पुणे
नदीसुधार योजनेसाठी केंद्र शासनाकडून पुणे महापालिकेला तब्बल ९०० कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र, गेल्या १० वर्षांत पुणेकरांनी केलेल्या प्रदूषणामुळे अनेक दुर्मिळ मासे, वनस्पतींच्या प्रजातीच नष्ट झाल्या आहेत.
शहराच्या लोकसंख्येने २५ लाखांचा आकडा गाठला आहे. त्यामुळे शहराची पाण्याची मागणी साडेचार टीएमसीवरून थेट १६ टीएमसीवर पोहोचली.
परिणामी शहरात
निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे आज
वर्षाला निर्माण होणारे तब्बल
आठ टीएमसी पाणी थेट नदीत
सोडले जात असून त्यातील केवळ दोन ते अडीच टीएमसी पाण्यावर प्रक्रिया करणे महापालिकेस शक्य झाले आहे.
नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या या सांडपाणी तसेच राडारोडा आणि कचऱ्याने मुठा नदीच्या पोटातील जैवसृष्टीचा बळी घेतला आहे. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी मुठा नदीपात्रात पत्थर चाटू मासा तसेच मुंगूस लोच
मासा यांचे अस्तित्व संपले आहे. याशिवाय वाघ्या बेडकासह असंख्या प्रजातीही नामशेष झालेल्या आहेत.
या माशांबरोबरच ‘इक्वीसिटम’, हार्सटेल, क्रिप्टो कोरीनी, व्हँली स्कारीया या वनस्पती नष्ट झालेल्या आहेत. अनेक पक्षांचे तसेच कीटकांचे अधिवास असलेले पाणकणीस, रानटी केवडा, माती पकडून ठेवणारे आणि नदीचे पाणी शुध्द करणारे वाळूंज या वनस्पतीही नामशेष झालेल्या आहेत. तर लागरी, (पाणकोंबडी), फेजन टेल जसाना हे मुठा नदीवर दिसणारे परदेशी तसेच देशी प्रजातीचे पक्षीही नाहीसे झाले आहेत.
नदीपात्रात कचरा आणि राडारोडा टाकला जात असल्याने नदीत केवळ कावळे आणि घारीच दिसत आहेत.

२00१ पर्यंत पुणे मनपा हद्दीमध्ये ४00 एमएलडी मैलापाण्याची निर्मिती होत होती. सध्या हे प्रमाण ८५0 एमएलडीवर पोहोचलेले आहे. केवळ ३५0 एमएलडी पाण्यावरच महापालिकेस शुध्दीकरण प्रक्रीया करणे शक्य झालेले आहे. त्यामुळे उर्वरीत पाणी थेट नदीत सोडले जात आहे.

नैसर्गिक विघटन प्रक्रिया ठप्प
मुठा नदीला वर्षात पावसाळ््यातील काही दिवसच पाणी असते. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात शहरात निर्माण होणारे सांडपाणी नाले, तसेच डे्रनेज वाहिन्यांमधून थेट नदीत आल्याने नदीतील जीवसृष्टी टिकण्यासाठी आवश्यक असलेले बीओडी, सीओडी तसेच डीओचे प्रमाण प्रदूषण नियंत्रक महामंडळाने घालून दिलेल्या निकषांपेक्षा कमी आहे. त्यामुळे नदीतील मासे, तसेच इतर वनस्पतींचे अस्तित्व महापालिकेच्या हद्दीत संपुष्टात आले आहेत.

Web Title: The victims of many species taken by Puneites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.