शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

शिवचरित्राच्या निर्मितीसाठी विकला भाजीपाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 03:41 IST

लहानपणापासून छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाने मन वेडावले. वडिलांनी गडकिल्ले पायी फिरून दाखविले. यामुळे इतिहास डोक्यात नव्हे तर रक्तात उतरला. तेव्हापासून शिवचरित्र लिहायच्या ध्यासाने पछाडलो गेलो.

पुणे : लहानपणापासून छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाने मन वेडावले. वडिलांनी गडकिल्ले पायी फिरून दाखविले. यामुळेइतिहास डोक्यात नव्हे तर रक्तात उतरला. तेव्हापासून शिवचरित्र लिहायच्या ध्यासाने पछाडलो गेलो. अखंड साधना, भ्रमंती यातून अनेक वर्षांच्या कष्टातून शिवचरित्र जन्माला आले. मात्र, पुढे त्याची छपाई, विक्रीसाठी पैसा उभाराहावा याकरिता पुण्याहून मुंबईला भायखळ्यातील मार्केटमध्ये कोंथिबीर विकली. त्यातून उभा राहिलो. परंतु, शिवचरित्रनिर्मितीची जिद्द सोडली नाही. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शिवचरित्र निर्मितीबद्दलच्या विविध आठवणींना उजाळा देत होते.राजहंस प्रकाशन व्यवसायाला यंदा २५ वर्षे पूर्ण झाली. या विस्ताराच्या निमित्ताने राजहंस प्रकाशन आणि अक्षरधारा बुक गॅलरी यांच्यावतीने आयोजितकरण्यात आलेल्या ‘विस्तार विशेषांकाचे’ प्रकाशनराजहंसचे संस्थापक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्तेझाले.याप्रसंगी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी ‘राजहंसी दिवस’ च्या गप्पांमधून बाबासाहेबांना बोलते के. ले. मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिरात रसिकश्रोत्यांच्या प्रचंड गर्दीत पार पडलेल्या समारंभाला विनायकराव पाटील, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर, डॉ. सदानंद बोरसे, अक्षरधाराचे रमेश राठीवडेकर, रसिका राठीवडेकर उपस्थित होते.वयाची ९६ वर्षे पूर्णकरणाऱ्या बाबासाहेबांना संकटांचा सामना करताना खचल्यासारखे झाले नाही का? यावर शिवाजीमहाराजांमुळे खचलो नाही. असे उत्तर बाबासाहेबांनी दिल्यावर रसिकांनी टाळ्यांचा क डक डाट करून त्यांच्या त्या उत्तराला मन:पूर्वक दाद दिली. याशिवाय आईचे प्रेम, शेवटपर्यंत वडिलांबरोबर जपलेले मित्रत्त्वाचे नाते यामुळे कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. काहीही झालं तरी दिलेला शब्द आणि दिलेली वेळ कधी चुकवायची नाही. हा वडिलांचा सल्ला नेहमीच पाळल्याचे नमूद केले.१ शिवचरित्राच्या निर्मितीबद्दल गाडगीळांनी विचारले असता बाबासाहेब म्हणाले, नवव्या-दहाव्या वर्षापासून लिहायला लागलो. शिवचरित्राचे वेड लहानपणापासून होते. याचे मूळ शोधायला गेल्यास आई-वडिलांचे संस्कार असे देता येईल. लहानपणी काही विलक्षण गोष्टी घडल्या. सातत्याने कानांवर प्रेरणादायी, स्फूर्तीदायी पडत होते. पुढे मोठे झाल्यावर डेक्कन महाविद्यालयात काम करत असताना यात अनेकांचे मार्गदर्शन मिळाले.२ भ्रमंती करून, गडकिल्ले फिरून ज्यावेळी शिवचरित्र पूर्ण झाले. त्यानंतर त्याची पुस्तकबांधणी, त्यासाठीचा खर्च, यात संघर्ष करावा लागला. एका मित्राच्या आत्याने १७ हजार रुपयांची मदत केली. त्या व्यक्तीला सहा महिन्यांतच ते पैसे परत केले. अशातच एका मित्राक डून फसवणुकीचा अनुभव आला. एकीकडे फसवणूक तर दुसरीकडे मदत यामुळे भारावून गेलो. यशवंतराव चव्हाणांना ज्यावेळी माझ्या शिवचरित्राबद्दल कळले तेव्हा त्यांनी शाबासकी दिली.३ आचार्य अत्रे यांनी तर आपल्या ‘मराठा’ या दैनिकात शिवचरित्रावर अग्रलेख लिहिला. आणि प्रचंड यश मिळाले. १९६८ ते साल होते. किमान २००० प्रतींची आवृत्ती होती. पुढे अवघ्या काही महिन्यांतच पहिली आवृत्ती संपून पुढील आवृत्ती सुरू करावी लागली. ‘पुरंदरेंनी शिवचरित्र महाराष्ट्रात नेले.’ या शब्दांत आचार्य अत्रेंनी लिहिलेल्या लेखात स्तुती केली होती, असे सांगताना बाबासाहेब काहीसे भावूक झाले होते.सिर सलामत तो‘पगडी’ पचास...मुलाखत ऐन रंगात आली असताना गाडगीळ यांनी बाबासाहेबांना सध्या पुणेरी पगडीवरून सुरू असलेल्या वादाविषयी काय वाटते? असा प्रश्न विचारला. यावर बाबासाहेब काय उत्तर देतात याकरिता सभागृहातील सर्वांचे कान टवकारले गेले. उत्तर देताना थोडेसे हसून ‘सिर सलामत तो पगडी पचास’ असे म्हटल्याबरोबर उपस्थितांनी त्यांना हसून दाद दिली. 

टॅग्स :Babasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेPuneपुणे