शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

आवक वाढल्याने भाज्यांचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:16 IST

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना २ ते ६ रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना २ ते ६ रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. मेथीच्या गड्ड्या पडून राहिल्या, तर वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरच्या भाज्या मार्केटमध्ये शिल्लक राहिल्या. भाज्यांचे भाव कोसळल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.महाशिवरात्रीला सहा दिवस अवकाश असल्याने आज बाजारात आंध्र प्रदेशातून सोळा टनाचा रताळी घेऊन आलेला ट्रक मागणीअभावी बाजारात उभा राहिला. ट्रक उभा करून त्या व्यापाºयाला उद्या, परवाच्या बाजाराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येथील बाजारात बटाटा ७०० रुपये, तर कांद्याला १७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. चाकण येथील मार्केट यार्डमधील तरकारी विभागात वातावरणातील बदलामुळे भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन भाज्यांचे भाव गडगडले. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी आदी फळभाज्यांसह मेथीची बाजारात मोठी आवक झाली.>काºहाटी : पालेभाज्यांना भाव मिळत नसल्याने शेतात पिकविलेला माल कोठे विकायचा, याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. मिळेल त्या भावाने शेतमाल विकावा लागत आहे.चार-पाच वर्षांच्या दुष्काळाने होरपळून निघालेल्या भागात यंदा समाधानकारक पाऊस पडला. पाण्याच्या जोरावर शेतकºयाने शेतात जनावरांच्या चाºयाबरोबर पालेभाज्या कांदा, दोडका, मेथी, कोथिंबीर, घेवडा, हिरवी मिरची आदी पिके घेऊन कुटुंबाला आर्थिक मदतीतून बाहेर येण्यासाठी ४ पैसे कसे मिळतील, या आशेने शेतीमाल बाजारपेठेत पाठविल्यानंतर शेतकºयांच्या पदरी खर्चदेखील निघत नसल्याची चित्र आहेत.बहुतांश भागात शेतकरी शेतात पिकवलेला शेतीमाल बारामती, पुणे, हडपसर या भागात विक्रीसाठी घेऊन जातात. सध्या मेथीची पेंढी ३-४ रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे मिळणाºया पैशामध्ये गाडीचे भाडे, बियाण्यांचा खर्च, औषधफवारणी व मजुरांचा पगार यांचा ताळमेळ काढता शेतकºयाच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. निवळ बाजारभाव मिळत नसल्याने शेतकºयांपुढे शेतीमाल विकायचा कसा, पैसे कोठून आणायचे, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ज्या वेळी शेतकºयाकडे कांदा नव्हता, त्या वेळी कांद्याचे दर ७०-८० रुपयांपर्यंत गेले होते. आज शेतकºयाचा माल बाजारात येऊ लागला, तर त्याला १२-१५ रुपये दर मिळायला लागला. २० रुपयांची मेथीची पेंढी आज २-३ रुपयांना विकावी लागत आहे. या बाजारभावाच्या चढउतारांमुळे शेतकºयाचे आर्थिक गणितच विस्कटले असल्याची खंत कºहाटीचे शेतकरी बाळासाहेब वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.>भाज्यांना प्रतिकिलोस मिळालेले भाव रुपयांत असे : कोबी - २ ते ३, फ्लॉवर - २ ते ३, टोमॅटो - ४ ते ५, बीट - २ ते ४, दुधी भोपळा - ४ ते ५, वालवर - ६ ते ७, ढोबळी - १० ते १२, काकडी - १० ते १५, गाजर - १२ ते १४, वाटाणा - १५ ते २०.>तेजीत असलेल्या भाज्या रुपयांत अशा : भेंडी - २० ते २५, गवार - २५ ते ३०, शेवगा - ३० ते ३५, हिरवी मिरची - ३० ते ३५.>पालेभाज्यांचेजुडीचे भावरुपयांत असे :शेपू -२, मेथी-३, पालक - २, कोथिंबीर - २.>भाज्यांचे दर सद्य:स्थितीत सर्वसाधारण आहेत. लागवड ही मोठ्या प्रमाणात होत आहे. भविष्यात या भाज्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकºयांनी शास्त्रीय ज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमीत कमी करून उत्पादन घ्यावे. जेणेकरून भाजीपाला पिके तोट्यात जाणार नाहीत.- राजेंद्र वाघमोडे, कृषितज्ज्ञ