शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पुण्यात शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा; मात्र प्रकाश आंबेडकरांनी दिली वेगळीच माहिती,  म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 11:35 IST

महाविकास आघाडीच्या जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी काल शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा रंगू लागली होती.

Prakash Ambedkar Sharad Pawar Meeting ( Marathi News ) : लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी मित्रपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत समाविष्ट होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर अद्याप महाविकास आघाडीकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं नसून त्यापूर्वीच वंचित आघाडीकडून लोकसभेच्या जागावाटपाचा प्रस्तावही मांडण्यात आला. अशातच काल प्रकाश आंबेडकर हे पुण्यातील मोदी बागेत पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कारण याच मोदी बाग सोसायटीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचंही निवासस्थान आहे. मत्र मी या परिसरात राहणाऱ्या माझ्या बहिणीच्या भेटीसाठी आलो होतो, असा खुलासा आंबेडकर यांच्याकडून करण्यात आला आहे.

विरोधकांनी राष्ट्रीय स्तरावर सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला सामावून घ्यावं, अशी सूचना शरद पवार यांच्याकडून काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. त्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अजूनही अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी नुकतंच शरद पवार यांना पत्र लिहित महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांनी लोकसभेच्या प्रत्येकी १२ जागा लढाव्यात, असा प्रस्ताव मांडला आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून संजय राऊत यांनी २३ जागा लढण्याची घोषणा केलेली असताना आंबेडकर यांनी १२ जागा लढण्यााबाबत मत मांडल्याने ही नवी आघाडी अस्तित्वाद येण्याआधीच वादाला तोंड फुटलं आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी काल शरद पवारांची भेट घेतल्याची चर्चा रंगू लागली होती. मात्र आंबेडकरांनी या चर्चा फेटाळल्या आहेत.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस नेत्यांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाक् युद्ध रंगत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचितच्या राजकारणावर टीका केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यामुळे आगामी काळात वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होणार का आणि जागावाटपाचा तिढा सुटणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवारMahavikas Aghadiमहाविकास आघाडी