शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेस धावण्यासाठी योग्यतेचा ट्रॅकच नाही; वेगवान रेल्वे प्रवासाचे स्वप्न भंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 14:08 IST

देशात येत्या ३ वर्षांत ४०० वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होतील, अशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे

प्रसाद कानडे

पुणे : देशात येत्या ३ वर्षांत ४०० वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होतील, अशी घोषणा अर्थसंकल्पात केली. मात्र भारतात बहुसंख्य ठिकाणी रेल्वे ताशी ११० किमी वेगाने धावत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ट्रकची क्षमताच ही ११० किमीचा वेग सहन करू शकेल इतकी आहे. महाराष्ट्रात देखील ११० किमी वेगाचेच ट्रॅक आहेत. ट्रॅकचे मशीनच्या साहाय्याने अपग्रेडेशन केले तरीही गाड्या १३० किमीच्या पुढे धावू शकणार नाहीत.

अद्याप वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोचचा प्रोटोटाईप तयार झालेला नाही. ऑक्टोबर महिन्यात याचा प्रोटोटाईप त्यानंतर आरडीएसओ (रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) ची मंजुरी घेतल्यावरच याचे उत्पादन सुरू होईल. मेक इन इंडियाअंतर्गतच वंदे भारत म्हणजेच टी १८ रेल्वेचे उत्पादन होणार आहे. ही रेल्वे भारतीय रेल्वेचे रुपडे पालटेल, मात्र ती धावण्यासाठी आवश्यक ती यंत्रणाच रेल्वेने अद्याप तरी उभी केली नाही. त्याचा वेग ताशी किमान १६० ते १८० किमी आहे. मात्र त्या योग्यतेचे ट्रॅकच आपल्याकडे नाहीत. त्यामुळे ती गाडी अन्य मेल, एक्स्प्रेससारख्याच गतीने धावेल. देशात बुलेट ट्रेनसाठी पायघड्या घातल्या जात आहेत. मात्र रेल्वेची गती वाढविण्यासाठी सर्वात आवश्यक असलेल्या ट्रॅककडेच दुर्लक्ष झाले आहे. रेल्वे प्रशासनाने खूप प्रयत्न केले, तरीसुद्धा ताशी १३० किमी वेगाच्या पुढे वंदे भारत एक्स्प्रेस धावणार नाही. त्यामुळे वेगवान रेल्वे प्रवासाचे स्वप्न भंगणार आहे.

मुंबई, पुण्यावरून जाणाऱ्या सुवर्ण चतुष्कोण मार्गाची हीच स्थिती 

देशातील सुवर्ण चतुष्कोण पैकी एक असलेला मुंबई-चेन्नई रेल्वे मार्ग हा पुणे स्थानकावरून जातो. हा मार्ग ताशी ११० किमी वेगासाठी फिट केला आहे. त्यामुळे आजही या मार्गावरून रेल्वे गाड्या ताशी ११० किमी वेगाने धावतात. शिवाय मुंबई-कोलकाता व्हाया भुसावळ हा मार्गदेखील ताशी ११० किमी वेगासाठी फिट केला आहे. महाराष्ट्रातील हे दोन महत्त्वाचे मार्ग आहेत. त्यांचीच स्थिती अशी आहे.

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेtourismपर्यटनGovernmentसरकार