शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

Pune: घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती, शिवगंगा नदी पडली कोरडी; विहिरींनी तळ गाठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 12:30 IST

या नदीला अनेक ठिकाणी छोट्या छोट्या बंधाऱ्यांमुळे नदीला पाणी नाही....

नसरापूर (पुणे) : यावर्षीच्या तीव्र उन्हामुळे तालुक्यातील विशेषत: पुणे - सातारा महामार्गाच्या ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या शिवगंगा खोऱ्याची मुख्य जीवनदायिनी असलेली शिवगंगा नदी कोरडी पडली असून वन्य प्राण्यांसह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. टंचाईमुळे परिसराला दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत. या नदीला अनेक ठिकाणी छोट्या छोट्या बंधाऱ्यांमुळे नदीला पाणी नाही.

शिवगंगेचे उगम स्थान सिंहगडावर असून शिवापूर, खोपी, शिवरे, वरवे, केळवडे, कांजळे, साळवडे हा सधन व बागायती भाग म्हणून ओळखला जातो. शिवगंगेच्या पाण्यामुळे या भागातील शेतकरी केळी, ऊस, गहू पिके , भाजीपाला घेत सुखी समाधानी जीवन जगत आहे. या नदीला भागातील ओढ्या, नाल्यांशिवाय दुसरी कोणतीही मोठी नदी जोडली गेलेली नाही. परंतु उन्हाळ्यात या नदीतून होणारा पाणीपुरवठा थांबला की या भागात कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई निर्माण होत असते. घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असते. एप्रिल महिन्यातच मे महिन्यासारखी अगोदरच कडक उन्हामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत नदी कोरडी पडली असून परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे.

अनेक ठिकाणी बोअरवेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असून जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण होऊ शकते. आजपर्यंत दुष्काळाचे फारसे चटके या परिसरातील शेतकऱ्यांना बसले नाहीत. परंतु चालू वर्षी मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़. जनावरांचा चारा, पाणी तसेच या परिसरातील असणाऱ्या गावांना होणारा जलपुरवठा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या फार गंभीर बनली आहे. पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने या परिसराची पाहणी करून उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक जनतेतून होत आहे.

पाण्याची अशीच परिस्थिती राहिली तर शासनाला या परिसरात चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील. कारण या परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात जनावरांचे प्रमाण फार मोठे आहे. प्रशासनाला तातडीने या परिसरातील दुष्काळाचा विचार करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील शेती पूर्णपणे वाढत्या तापमानामुळे करपत असून, अंजीर, पेरू, चिकू , सिताफळ, आंबा, केळी आदी पिकांच्या बागा तसेच ऊस व जनावरांचा चारा पाण्याअभावी जळून जात आहे. शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडriverनदी