शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

Pune: घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती, शिवगंगा नदी पडली कोरडी; विहिरींनी तळ गाठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 12:30 IST

या नदीला अनेक ठिकाणी छोट्या छोट्या बंधाऱ्यांमुळे नदीला पाणी नाही....

नसरापूर (पुणे) : यावर्षीच्या तीव्र उन्हामुळे तालुक्यातील विशेषत: पुणे - सातारा महामार्गाच्या ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या शिवगंगा खोऱ्याची मुख्य जीवनदायिनी असलेली शिवगंगा नदी कोरडी पडली असून वन्य प्राण्यांसह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. टंचाईमुळे परिसराला दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत. या नदीला अनेक ठिकाणी छोट्या छोट्या बंधाऱ्यांमुळे नदीला पाणी नाही.

शिवगंगेचे उगम स्थान सिंहगडावर असून शिवापूर, खोपी, शिवरे, वरवे, केळवडे, कांजळे, साळवडे हा सधन व बागायती भाग म्हणून ओळखला जातो. शिवगंगेच्या पाण्यामुळे या भागातील शेतकरी केळी, ऊस, गहू पिके , भाजीपाला घेत सुखी समाधानी जीवन जगत आहे. या नदीला भागातील ओढ्या, नाल्यांशिवाय दुसरी कोणतीही मोठी नदी जोडली गेलेली नाही. परंतु उन्हाळ्यात या नदीतून होणारा पाणीपुरवठा थांबला की या भागात कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई निर्माण होत असते. घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असते. एप्रिल महिन्यातच मे महिन्यासारखी अगोदरच कडक उन्हामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत नदी कोरडी पडली असून परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे.

अनेक ठिकाणी बोअरवेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असून जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण होऊ शकते. आजपर्यंत दुष्काळाचे फारसे चटके या परिसरातील शेतकऱ्यांना बसले नाहीत. परंतु चालू वर्षी मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़. जनावरांचा चारा, पाणी तसेच या परिसरातील असणाऱ्या गावांना होणारा जलपुरवठा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या फार गंभीर बनली आहे. पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने या परिसराची पाहणी करून उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक जनतेतून होत आहे.

पाण्याची अशीच परिस्थिती राहिली तर शासनाला या परिसरात चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील. कारण या परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात जनावरांचे प्रमाण फार मोठे आहे. प्रशासनाला तातडीने या परिसरातील दुष्काळाचा विचार करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील शेती पूर्णपणे वाढत्या तापमानामुळे करपत असून, अंजीर, पेरू, चिकू , सिताफळ, आंबा, केळी आदी पिकांच्या बागा तसेच ऊस व जनावरांचा चारा पाण्याअभावी जळून जात आहे. शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडriverनदी