शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती, शिवगंगा नदी पडली कोरडी; विहिरींनी तळ गाठला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 12:30 IST

या नदीला अनेक ठिकाणी छोट्या छोट्या बंधाऱ्यांमुळे नदीला पाणी नाही....

नसरापूर (पुणे) : यावर्षीच्या तीव्र उन्हामुळे तालुक्यातील विशेषत: पुणे - सातारा महामार्गाच्या ग्रामीण भागातील अनेक गावांना पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या शिवगंगा खोऱ्याची मुख्य जीवनदायिनी असलेली शिवगंगा नदी कोरडी पडली असून वन्य प्राण्यांसह, जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. टंचाईमुळे परिसराला दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागणार आहेत. या नदीला अनेक ठिकाणी छोट्या छोट्या बंधाऱ्यांमुळे नदीला पाणी नाही.

शिवगंगेचे उगम स्थान सिंहगडावर असून शिवापूर, खोपी, शिवरे, वरवे, केळवडे, कांजळे, साळवडे हा सधन व बागायती भाग म्हणून ओळखला जातो. शिवगंगेच्या पाण्यामुळे या भागातील शेतकरी केळी, ऊस, गहू पिके , भाजीपाला घेत सुखी समाधानी जीवन जगत आहे. या नदीला भागातील ओढ्या, नाल्यांशिवाय दुसरी कोणतीही मोठी नदी जोडली गेलेली नाही. परंतु उन्हाळ्यात या नदीतून होणारा पाणीपुरवठा थांबला की या भागात कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई निर्माण होत असते. घोटभर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असते. एप्रिल महिन्यातच मे महिन्यासारखी अगोदरच कडक उन्हामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत नदी कोरडी पडली असून परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे.

अनेक ठिकाणी बोअरवेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असून जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण होऊ शकते. आजपर्यंत दुष्काळाचे फारसे चटके या परिसरातील शेतकऱ्यांना बसले नाहीत. परंतु चालू वर्षी मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़. जनावरांचा चारा, पाणी तसेच या परिसरातील असणाऱ्या गावांना होणारा जलपुरवठा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या फार गंभीर बनली आहे. पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला असून प्रशासनाने या परिसराची पाहणी करून उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक जनतेतून होत आहे.

पाण्याची अशीच परिस्थिती राहिली तर शासनाला या परिसरात चारा छावण्या उभ्या कराव्या लागतील. कारण या परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात जनावरांचे प्रमाण फार मोठे आहे. प्रशासनाला तातडीने या परिसरातील दुष्काळाचा विचार करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे या परिसरातील शेती पूर्णपणे वाढत्या तापमानामुळे करपत असून, अंजीर, पेरू, चिकू , सिताफळ, आंबा, केळी आदी पिकांच्या बागा तसेच ऊस व जनावरांचा चारा पाण्याअभावी जळून जात आहे. शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. पाणी टंचाईमुळे सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडriverनदी