शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
मिचेल स्टार्कचा 'Spark'! ट्रॅव्हिस हेडचा भन्नाट चेंडूवर उडवला त्रिफळा, Video 
3
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
4
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
5
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
6
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
7
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
8
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
9
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
10
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
11
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
12
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
13
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
14
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
15
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
16
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
17
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
18
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
19
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
20
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...

वैष्णवांचा मेळा पुणे जिल्ह्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 4:58 AM

‘पुंडलिक वरदे, हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ च्या गजरात, वैष्णवांचा मेळा आज आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषीनगरीत दाखल झाला.

वाल्हे : ‘पुंडलिक वरदे, हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ च्या गजरात, वैष्णवांचा मेळा आज आद्य रामायणकार महर्षी वाल्मीकी ऋषीनगरीत दाखल झाला. श्री विठ्ठल-रुक्मिणी समिती पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरहून आळंदीकडे श्री ज्ञानेश्वरमहाराज समाधी सोहळ््यासाठी निघालेला श्री पांडुरंग व नामदेवमहाराज पालखी सोहळा बुधवारी वाल्हेनगरीत मुक्कामी विसावला.सातारा जिल्ह्यातील सुरवडी मुक्कामानंतर पालखी सोहळा पंढरपूरकरडे मार्गक्रमण करताना पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवरील दत्तघाटावर पांडुरंगांच्या पादुकांना शाही स्नान घालण्यात आले. तदनंतर संध्याकाळी पावणेसात पालखी सोहळा वाल्हेनजीक माळवाडी येथील पालखीतळावर विसावला. तदनंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत नयनरम्य अश्वांचा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर समाज आरती झाल्यानंतर दर्शनाच्या रांगा लागल्या.समाजआरंतीनंतर वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच कल्पना गोळे, उपसरपंच पोपटनाना पवार, सूर्यकांत पवार, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, वंदना गायकवाड, मीनाक्षी कुंभार, दादा मदने, गावकामगार तलाठी नीलेश पाटील उपस्थित होते.पालखी सोहळ्यामिनित्त वाल्हे ग्रामपंचायतीच्या वतीने माळवाडी येथील पालखीतळाची स्वच्छता करून संपूर्ण पालखीतळावर ठिकठिकाणी लाईट, तसेच पिण्याच्या पाण्याची, पाण्याचे टँॅकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलीस दूरक्षेत्राचे दीपक वारूळे, संदीप पवार, गणेश कुतवळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.नीरा : श्री संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पादुका मागील चार वर्षांपासून आळंदीला जात आहेत. आज बुधवारी पांडुरंगाच्या पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तीर्थात मोठ्या भक्तिमय वातावरणात स्नान घालण्यात आले. सातारा जिल्ह्यातील मुक्काम आटोपून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला.पंढरपूरच्या पांडुरंगाचे सेवेकरी कै. तात्यासाहेब वासकर यांनी संजीवन समाधीला पांडुरंगाच्या पादुका आळंदीला घेऊन जाण्याची मागणी केली होती. प्रत्यक्ष पांडुरंग समाधी सोहळ्यासाठी हजर असतात, अशी वारकºयांची श्रद्धा आहे. वासकरांचे म्हणणे मागील काळात विठ्ठल मंदिर समितीने मान्य करून सोहळा सुरू केल्याचे विठ्ठलराव (दादासाहेब) वासकरमहाराज यांनी सांगितले.यावर्षी सोहळ्यासोबत रथाच्या पुढे १४ व रथामागे ८ दिंड्या चालत आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, तसेच कर्नाटकातील वारकरी पांडुरंगाच्या वारीत सहभागी झाले आहेत. सुमारे पंधरा हजार वारकरी सोहळ्यात सहभागी असल्याची माहिती सोहळाप्रमुख मयूर ननवरे यांनी दिली.कार्तिकी पौर्णिमेला पांडुरंगाचा पालखी सोहळा पंढरपूर येथून निघाला आहे. अष्टमीला आळंदीला दाखल होणार आहे.सातारा जिल्ह्यातील तरडगाव येथील मुक्काम आटोपून सकाळी लोणंद येथे न्याहरी घेऊन दुपारच्या विसाव्यासाठी नीरा नदीतील प्रसिद्ध दत्तघाटावर सकाळी अकरा वाजता दाखल झाला. या वेळी रथातील पालखी दत्त मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. पालखीतील पांडुरंगाच्या पादुकांना मोठ्या भक्तिमय वातावरणात नीरा नदीच्या पवित्र तीर्थात स्नान घालण्यात आले.