शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

रसिकांनी अनुभवली ‘दमा’ शैली!; पुण्यात ‘उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा’ प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 12:36 IST

=अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे संयोजित आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा’ या विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देरसिकांनी घेतला ‘भानाचे भूत’ या कथेचा आस्वादमाणसातील माणूसपण जपण्यासाठी कसदार ललित साहित्याच्या निर्मितीची गरज : अच्युत गोडबोले

पुणे : कथाकथनातून डोळ्यांसमोर हुबेहूब उभी राहणारी पात्रे, ग्रामीण भाषेतील लकबीतून होणारी संवादफेक, प्रेक्षकांनी मनमुराद हसत दिलेली दाद, सभागृहात फुललेला हास्यफुलोरा अशा रंगलेल्या वातावरणात ‘भानाचे भूत’ ही कथा ‘दमा’ शैलीतून उलगडत गेली. ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांनी शेतकरी आणि गावातील लोकांची विनोदगाथा उत्तम प्रकारे कथेतून मांडली. नव्वदीच्या उंबरठ्यावर असलेले ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे ‘तारुण्य’ या वेळी उपस्थितांना थक्क करून गेले. आचार्य अत्रे सभागृहात अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे संयोजित आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा’ या विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिरासदार होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले उपस्थित होते. या वेळी द. मा. मिरासदार यांनी सांगितलेल्या ‘भानाचे भूत’ या कथेचा आस्वाद रसिकांनी घेतला. ‘बदलत्या काळातील विविध आव्हानांचा सामना सगळ्याच भाषांमधील साहित्याला करावा लागत आहे. साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे एक प्रभावी माध्यम असून समाजातील दानशूरांनी साहित्यिक उपक्रमांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे’, असे आवाहन द. मा.नी केले.रसिका राठीवडेकर यांनी प्रास्ताविक केले. सिद्धार्थ बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले. रमेश राठीवडेकर यांनी आभार मानले. 

डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, ‘साहित्य क्षेत्रात प्रचंड चढउतार सुरू असून कसदार पुस्तकांच्या आवृत्या निघणे बंद झाले आहे. मराठी प्रकाशन व्यवसायाला नवसंजीवनी आणि चैतन्य प्राप्त करून देणे गरजेचे आहे. सध्याची पिढी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून आॅनलाइन सुविधेचा लाभ घेत आहे. मात्र, त्यामुळे पुस्तकांच्या दुकानात सहकुटुंब जाऊन खरेदी करण्याचा आणि नव्या कोºया पुस्तकांचा दरवळ अनुभवण्याचा आनंद ही पिढी गमावते आहे. वाचन संस्कृती टिकवायची आणि वाढवायची असेल तर कसदार लेखक आणि कवींची फळी निर्माण करावी लागेल.’

गोडबोले म्हणाले, ‘ललित आणि विज्ञान असे साहित्याचे दोन प्रकार करून त्यामध्ये डावे-उजवे करणे ही खेदाची बाब आहे. माणसातील माणूसपण जपण्यासाठी कसदार ललित साहित्याच्या निर्मितीची गरज आहे. अस्सल ललितलेखनाची निर्मिती आणि त्याचे प्रकाशन या दोन्ही बाबतींत आग्रही राहणे गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. बदलत्या तंत्रज्ञानाचा अंगीकार साहित्य क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी केला पाहिजे.’  

टॅग्स :PuneपुणेP D Patilपी डी पाटील