शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
4
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
5
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
6
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
7
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
8
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
9
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
11
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
12
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
13
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
14
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
15
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
16
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
17
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
18
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
19
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
20
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न

आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 10:05 IST

आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

पुणे : राज्यात पाऊसमान कमी झाल्याने काही जिल्ह्यांत खरीप पिकांची स्थिती बिकट झाली असून येत्या महिनाभरात पाऊस न आल्यास दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागवार आढावा घेतला. त्यात पुणे विभागातील पाऊस, पाणीसाठा, चाराटंचाई यांचा आढावा घेण्यात आला. विभागातील सोलापूर जिल्ह्यात सर्वांत बिकट स्थिती असून, पाणीसाठा केवळ १३ टक्के आहे. तर पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा ९२ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे सध्या पुणे शहरावर पाण्याचे संकट नाही. तरीही आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मंगळवारी (दि. २२) बैठक घेतली. यावेळी राव यांनी विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील पावसाची स्थिती, धरणातील साठ्याची माहिती दिली. राज्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतचे गांभीर्य ओळखून टंचाईसदृश परिस्थिती आणि स्थानिक परिस्थितीनुसार त्या-त्या शहरांसह जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यावेत; तसेच शहरात पिण्याचे पाणी वापरताना शक्यतो शहरातील नागरिकांनी काटकसरीने वापरावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती यंदा बिकट आहे. गेल्यावर्षी उजनी धरणात ९९ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो १३ टक्केच आहे. पुढील महिनाअखेर पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणार होईल. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरताना जलसंपदा विभागाशी समन्वय साधून त्याचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे राव यांनी सांगितले. वनविभागाबरोबर ग्रामीण भागात ज्या ठिकाणी चारा उपलब्ध आहे त्याचा आढावा घेऊन चारा टंचाई होणार नाही; तसेच चाऱ्याअभावी पशुधन संकटात येणार नाही, याची दक्षता घेण्याचाही त्यांनी यावेळी दिल्या. पुणे विभागात सध्या १५५ टँकर सुरू आहेत. त्यापैकी ४० टँकर पुणे जिल्ह्यात सुरू आहेत. अशीच स्थिती कायम राहिल्यास टँकरची संख्या वाढवावी लागेल. त्यासाठी पुरेसे सरकारी आणि खासगी टँकर उपलब्ध करण्याचे नियोजन करावे लागेल, असेही राव यांनी सांगितले. पाणीटंचाईसदृश स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान योग्य ती पावले उचलण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थानिक परिस्थिती पाहून हा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkhadakwasala-acखडकवासलाWaterपाणी