शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 10:05 IST

आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

पुणे : राज्यात पाऊसमान कमी झाल्याने काही जिल्ह्यांत खरीप पिकांची स्थिती बिकट झाली असून येत्या महिनाभरात पाऊस न आल्यास दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागवार आढावा घेतला. त्यात पुणे विभागातील पाऊस, पाणीसाठा, चाराटंचाई यांचा आढावा घेण्यात आला. विभागातील सोलापूर जिल्ह्यात सर्वांत बिकट स्थिती असून, पाणीसाठा केवळ १३ टक्के आहे. तर पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा ९२ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे सध्या पुणे शहरावर पाण्याचे संकट नाही. तरीही आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मंगळवारी (दि. २२) बैठक घेतली. यावेळी राव यांनी विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील पावसाची स्थिती, धरणातील साठ्याची माहिती दिली. राज्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतचे गांभीर्य ओळखून टंचाईसदृश परिस्थिती आणि स्थानिक परिस्थितीनुसार त्या-त्या शहरांसह जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यावेत; तसेच शहरात पिण्याचे पाणी वापरताना शक्यतो शहरातील नागरिकांनी काटकसरीने वापरावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती यंदा बिकट आहे. गेल्यावर्षी उजनी धरणात ९९ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो १३ टक्केच आहे. पुढील महिनाअखेर पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणार होईल. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरताना जलसंपदा विभागाशी समन्वय साधून त्याचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे राव यांनी सांगितले. वनविभागाबरोबर ग्रामीण भागात ज्या ठिकाणी चारा उपलब्ध आहे त्याचा आढावा घेऊन चारा टंचाई होणार नाही; तसेच चाऱ्याअभावी पशुधन संकटात येणार नाही, याची दक्षता घेण्याचाही त्यांनी यावेळी दिल्या. पुणे विभागात सध्या १५५ टँकर सुरू आहेत. त्यापैकी ४० टँकर पुणे जिल्ह्यात सुरू आहेत. अशीच स्थिती कायम राहिल्यास टँकरची संख्या वाढवावी लागेल. त्यासाठी पुरेसे सरकारी आणि खासगी टँकर उपलब्ध करण्याचे नियोजन करावे लागेल, असेही राव यांनी सांगितले. पाणीटंचाईसदृश स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान योग्य ती पावले उचलण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थानिक परिस्थिती पाहून हा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkhadakwasala-acखडकवासलाWaterपाणी