शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 10:05 IST

आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

पुणे : राज्यात पाऊसमान कमी झाल्याने काही जिल्ह्यांत खरीप पिकांची स्थिती बिकट झाली असून येत्या महिनाभरात पाऊस न आल्यास दृष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागवार आढावा घेतला. त्यात पुणे विभागातील पाऊस, पाणीसाठा, चाराटंचाई यांचा आढावा घेण्यात आला. विभागातील सोलापूर जिल्ह्यात सर्वांत बिकट स्थिती असून, पाणीसाठा केवळ १३ टक्के आहे. तर पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पांमध्ये पाणीसाठा ९२ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे सध्या पुणे शहरावर पाण्याचे संकट नाही. तरीही आतापासूनच काटकसरीने पाणी वापरा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

राज्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मंगळवारी (दि. २२) बैठक घेतली. यावेळी राव यांनी विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या पाच जिल्ह्यांतील पावसाची स्थिती, धरणातील साठ्याची माहिती दिली. राज्यात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीतचे गांभीर्य ओळखून टंचाईसदृश परिस्थिती आणि स्थानिक परिस्थितीनुसार त्या-त्या शहरांसह जिल्ह्यांमध्ये विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यावेत; तसेच शहरात पिण्याचे पाणी वापरताना शक्यतो शहरातील नागरिकांनी काटकसरीने वापरावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील स्थिती यंदा बिकट आहे. गेल्यावर्षी उजनी धरणात ९९ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो १३ टक्केच आहे. पुढील महिनाअखेर पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणार होईल. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरताना जलसंपदा विभागाशी समन्वय साधून त्याचे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे राव यांनी सांगितले. वनविभागाबरोबर ग्रामीण भागात ज्या ठिकाणी चारा उपलब्ध आहे त्याचा आढावा घेऊन चारा टंचाई होणार नाही; तसेच चाऱ्याअभावी पशुधन संकटात येणार नाही, याची दक्षता घेण्याचाही त्यांनी यावेळी दिल्या. पुणे विभागात सध्या १५५ टँकर सुरू आहेत. त्यापैकी ४० टँकर पुणे जिल्ह्यात सुरू आहेत. अशीच स्थिती कायम राहिल्यास टँकरची संख्या वाढवावी लागेल. त्यासाठी पुरेसे सरकारी आणि खासगी टँकर उपलब्ध करण्याचे नियोजन करावे लागेल, असेही राव यांनी सांगितले. पाणीटंचाईसदृश स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान योग्य ती पावले उचलण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. स्थानिक परिस्थिती पाहून हा आराखडा तयार करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkhadakwasala-acखडकवासलाWaterपाणी