शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा पाणीवापर ७ वर्षांत ७.२१ टीएमसीने वाढला, लोकसंख्या वाढल्याने गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 02:39 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्चित केलेले मापदंड ओलांडून पुणे महापालिकेतर्फे सलग सात वर्षांपासून अधिकचे पाणी वापरले जात आहे.

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्चित केलेले मापदंड ओलांडून पुणे महापालिकेतर्फे सलग सात वर्षांपासून अधिकचे पाणी वापरले जात आहे. त्यात दरवर्षी वाढ होत चालली असून, गेल्या सात वर्षांत पालिकेचा पाणीवापर तब्बल ७.२१ टीएमसीने वाढला आहे. पालिकेला ११.५० टीएमसी पाणी मंजूर असताना पालिकेकडून १८.७१ टीएमसीपर्यंत पाणीवापर केला जात आहे.पुणे शहर व परिसरातील नागरीकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालेली आहे. त्यामुळे शहराची तहान भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. परंतु, पालिकेला प्राधिकरणाने मंजूर केलेल्या ११.५० टीएमसी पाण्याचा वापर पालिकेने केला पाहिजे. मात्र, २०११-१२ पासून २०१७-१८ पर्यंत एकदाही पालिकेने ११.५० टीएमसी पाण्याचा वापर केला नाही. पालिकेने १५.३९ टीएमसीपासून १८.७१ टीएमसीपर्यंत पाण्याचा वापर केल्याचे दिसून आले आहे. जलसंपदा विभागाने महापालिका विरोधातील दाव्यात प्राधिकरणाकडे याबाबतची अधिकृत माहिती दाखल केली आहे. त्यातही दरवर्षी पालिकेकडून वापरल्या जाणाऱ्या अधिकच्या पाण्यातही दरवर्षी वाढ झाल्याचे दिसून येते. २०११-१२ पासून वापरल्या जाणाºया पाण्याचा विचार करता त्यात आत्तापर्यंत २.८१ टीएमसीपर्यंत वाढ झाली आहे.पुणे शहर, कॅन्टोंमेंट व शेजारील गावांची लोकसंख्या ४०.७६ लाख आहे. त्यानुसार प्राधिकरणाने प्रतिदिन माणशी १५५ लिटर मंजूर केले आहे. त्यानुसार ११.५० टीएमसी पाणी वापरणे बंधनकारक आहे. मात्र, २०१७-१८ मध्ये पालिकेचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक पाणीवापर १८.७१ टीएमसीपर्यंत गेला आहे. तसेच नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ आणि जानेवारी ते मार्च २०१८ या पाच महिन्यांतच पालिकेचा सरासरी १६०० एमएलडी असा पाणीवापर आहे. तसेच याच कालावधीमध्ये काही वेळा पालिकेने १७५० एमएलडीपर्यंत पाणी वापरले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने पालिकेला पाणीपुरवठा करणारे पंप पोलीस बंदोबस्तात बंद करण्यात आले. मात्र, तरीही पालिकेचा पाणीवापर कमी झालेला नाही. पालिकेकडून सध्या १३५० एमएलडी पाणी वापरले असून, यामुळे वार्षिक १७.४ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.पालिकेची लोकसंख्या अन् पाणीपुरवठापुणे शहराला 40,76,000 लोखसंख्येला पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यात लष्कर भागासह लगतच्या गावातील १ लाख ५८ हजार लोकसंख्येचा समावेश आहे.जलसंपदा विभागाबरोबर झालेल्या करारानुसार पुणे शहरासाठी ५ टीएमसी पाणी मंजूर आहे. मात्र, पुणे महापालिकेने ६.५० टीएमसी सांडपाणी प्रक्रिया करून हडपसरजवळील कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडले तरच पालिकेला ६.५० टीएमसी पाणी देणे अपेक्षित आहे. त्यामुळे पालिकेला ११.५० टीएमसी पाणी मिळते. परंतु, पालिकेकडून ११.५० टीएमसीपेक्षा अधिक पाणी वापरले जात आहे. त्यामुळे पालिकेने अधिकचे पाणी न वापरता प्राधिकरणाच्या मापदंडानुसार पाणी वापरणे आवश्यक आहे.- सुरेश शिर्के, अध्यक्ष,भारतीय जलसंपत्ती संस्था, पुणे केंद्र.

टॅग्स :Waterपाणी