शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

पुण्याचा पाणीवापर ७ वर्षांत ७.२१ टीएमसीने वाढला, लोकसंख्या वाढल्याने गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 02:39 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्चित केलेले मापदंड ओलांडून पुणे महापालिकेतर्फे सलग सात वर्षांपासून अधिकचे पाणी वापरले जात आहे.

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्चित केलेले मापदंड ओलांडून पुणे महापालिकेतर्फे सलग सात वर्षांपासून अधिकचे पाणी वापरले जात आहे. त्यात दरवर्षी वाढ होत चालली असून, गेल्या सात वर्षांत पालिकेचा पाणीवापर तब्बल ७.२१ टीएमसीने वाढला आहे. पालिकेला ११.५० टीएमसी पाणी मंजूर असताना पालिकेकडून १८.७१ टीएमसीपर्यंत पाणीवापर केला जात आहे.पुणे शहर व परिसरातील नागरीकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालेली आहे. त्यामुळे शहराची तहान भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. परंतु, पालिकेला प्राधिकरणाने मंजूर केलेल्या ११.५० टीएमसी पाण्याचा वापर पालिकेने केला पाहिजे. मात्र, २०११-१२ पासून २०१७-१८ पर्यंत एकदाही पालिकेने ११.५० टीएमसी पाण्याचा वापर केला नाही. पालिकेने १५.३९ टीएमसीपासून १८.७१ टीएमसीपर्यंत पाण्याचा वापर केल्याचे दिसून आले आहे. जलसंपदा विभागाने महापालिका विरोधातील दाव्यात प्राधिकरणाकडे याबाबतची अधिकृत माहिती दाखल केली आहे. त्यातही दरवर्षी पालिकेकडून वापरल्या जाणाऱ्या अधिकच्या पाण्यातही दरवर्षी वाढ झाल्याचे दिसून येते. २०११-१२ पासून वापरल्या जाणाºया पाण्याचा विचार करता त्यात आत्तापर्यंत २.८१ टीएमसीपर्यंत वाढ झाली आहे.पुणे शहर, कॅन्टोंमेंट व शेजारील गावांची लोकसंख्या ४०.७६ लाख आहे. त्यानुसार प्राधिकरणाने प्रतिदिन माणशी १५५ लिटर मंजूर केले आहे. त्यानुसार ११.५० टीएमसी पाणी वापरणे बंधनकारक आहे. मात्र, २०१७-१८ मध्ये पालिकेचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक पाणीवापर १८.७१ टीएमसीपर्यंत गेला आहे. तसेच नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ आणि जानेवारी ते मार्च २०१८ या पाच महिन्यांतच पालिकेचा सरासरी १६०० एमएलडी असा पाणीवापर आहे. तसेच याच कालावधीमध्ये काही वेळा पालिकेने १७५० एमएलडीपर्यंत पाणी वापरले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने पालिकेला पाणीपुरवठा करणारे पंप पोलीस बंदोबस्तात बंद करण्यात आले. मात्र, तरीही पालिकेचा पाणीवापर कमी झालेला नाही. पालिकेकडून सध्या १३५० एमएलडी पाणी वापरले असून, यामुळे वार्षिक १७.४ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.पालिकेची लोकसंख्या अन् पाणीपुरवठापुणे शहराला 40,76,000 लोखसंख्येला पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यात लष्कर भागासह लगतच्या गावातील १ लाख ५८ हजार लोकसंख्येचा समावेश आहे.जलसंपदा विभागाबरोबर झालेल्या करारानुसार पुणे शहरासाठी ५ टीएमसी पाणी मंजूर आहे. मात्र, पुणे महापालिकेने ६.५० टीएमसी सांडपाणी प्रक्रिया करून हडपसरजवळील कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडले तरच पालिकेला ६.५० टीएमसी पाणी देणे अपेक्षित आहे. त्यामुळे पालिकेला ११.५० टीएमसी पाणी मिळते. परंतु, पालिकेकडून ११.५० टीएमसीपेक्षा अधिक पाणी वापरले जात आहे. त्यामुळे पालिकेने अधिकचे पाणी न वापरता प्राधिकरणाच्या मापदंडानुसार पाणी वापरणे आवश्यक आहे.- सुरेश शिर्के, अध्यक्ष,भारतीय जलसंपत्ती संस्था, पुणे केंद्र.

टॅग्स :Waterपाणी