शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पुण्याचा पाणीवापर ७ वर्षांत ७.२१ टीएमसीने वाढला, लोकसंख्या वाढल्याने गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 02:39 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्चित केलेले मापदंड ओलांडून पुणे महापालिकेतर्फे सलग सात वर्षांपासून अधिकचे पाणी वापरले जात आहे.

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने निश्चित केलेले मापदंड ओलांडून पुणे महापालिकेतर्फे सलग सात वर्षांपासून अधिकचे पाणी वापरले जात आहे. त्यात दरवर्षी वाढ होत चालली असून, गेल्या सात वर्षांत पालिकेचा पाणीवापर तब्बल ७.२१ टीएमसीने वाढला आहे. पालिकेला ११.५० टीएमसी पाणी मंजूर असताना पालिकेकडून १८.७१ टीएमसीपर्यंत पाणीवापर केला जात आहे.पुणे शहर व परिसरातील नागरीकरणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालेली आहे. त्यामुळे शहराची तहान भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. परंतु, पालिकेला प्राधिकरणाने मंजूर केलेल्या ११.५० टीएमसी पाण्याचा वापर पालिकेने केला पाहिजे. मात्र, २०११-१२ पासून २०१७-१८ पर्यंत एकदाही पालिकेने ११.५० टीएमसी पाण्याचा वापर केला नाही. पालिकेने १५.३९ टीएमसीपासून १८.७१ टीएमसीपर्यंत पाण्याचा वापर केल्याचे दिसून आले आहे. जलसंपदा विभागाने महापालिका विरोधातील दाव्यात प्राधिकरणाकडे याबाबतची अधिकृत माहिती दाखल केली आहे. त्यातही दरवर्षी पालिकेकडून वापरल्या जाणाऱ्या अधिकच्या पाण्यातही दरवर्षी वाढ झाल्याचे दिसून येते. २०११-१२ पासून वापरल्या जाणाºया पाण्याचा विचार करता त्यात आत्तापर्यंत २.८१ टीएमसीपर्यंत वाढ झाली आहे.पुणे शहर, कॅन्टोंमेंट व शेजारील गावांची लोकसंख्या ४०.७६ लाख आहे. त्यानुसार प्राधिकरणाने प्रतिदिन माणशी १५५ लिटर मंजूर केले आहे. त्यानुसार ११.५० टीएमसी पाणी वापरणे बंधनकारक आहे. मात्र, २०१७-१८ मध्ये पालिकेचा आत्तापर्यंतचा सर्वाधिक पाणीवापर १८.७१ टीएमसीपर्यंत गेला आहे. तसेच नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ आणि जानेवारी ते मार्च २०१८ या पाच महिन्यांतच पालिकेचा सरासरी १६०० एमएलडी असा पाणीवापर आहे. तसेच याच कालावधीमध्ये काही वेळा पालिकेने १७५० एमएलडीपर्यंत पाणी वापरले आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने पालिकेला पाणीपुरवठा करणारे पंप पोलीस बंदोबस्तात बंद करण्यात आले. मात्र, तरीही पालिकेचा पाणीवापर कमी झालेला नाही. पालिकेकडून सध्या १३५० एमएलडी पाणी वापरले असून, यामुळे वार्षिक १७.४ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. त्यामुळे मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.पालिकेची लोकसंख्या अन् पाणीपुरवठापुणे शहराला 40,76,000 लोखसंख्येला पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यात लष्कर भागासह लगतच्या गावातील १ लाख ५८ हजार लोकसंख्येचा समावेश आहे.जलसंपदा विभागाबरोबर झालेल्या करारानुसार पुणे शहरासाठी ५ टीएमसी पाणी मंजूर आहे. मात्र, पुणे महापालिकेने ६.५० टीएमसी सांडपाणी प्रक्रिया करून हडपसरजवळील कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडले तरच पालिकेला ६.५० टीएमसी पाणी देणे अपेक्षित आहे. त्यामुळे पालिकेला ११.५० टीएमसी पाणी मिळते. परंतु, पालिकेकडून ११.५० टीएमसीपेक्षा अधिक पाणी वापरले जात आहे. त्यामुळे पालिकेने अधिकचे पाणी न वापरता प्राधिकरणाच्या मापदंडानुसार पाणी वापरणे आवश्यक आहे.- सुरेश शिर्के, अध्यक्ष,भारतीय जलसंपत्ती संस्था, पुणे केंद्र.

टॅग्स :Waterपाणी